शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

World Multiple Sclerosis day : दर पाच मिनिटात एकाला ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’ आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 10:49 IST

मेंदू, पाठीच्या कण्यातील थर खराब करतोय मल्टिपल स्क्लेरोसिस

ठळक मुद्देअशक्तपणा ते अक्षमतेपर्यंत

नागपूर : मेंदू व पाठीचा कणामधील ‘मायलिन’चा थर खराब करणारा आजार म्हणून ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’ ओळखला जातो. याचा प्रभाव अशक्तपणापासून ते शारीरिक अक्षमतेपर्यंत होतो. जगात दर पाच मिनिटांनी एकाला या आजाराचे निदान होते अशी माहिती, ‘ट्रॉपिकल न्यूरोलॉजी स्पेशलिटी ग्रुप ऑफ डब्ल्यूएफएन’चे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.

३० मे हा दिवस जागतिक ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’ (एमएसएस) म्हणून पाळला जातो. या रोगाबद्दलच्या जनजागृतीसाठी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. डॉ. मेश्राम म्हणाले, हा आजार होण्यामागे नेमके कारण पुढे आलेले नाही. परंतु, यात अनुवांशिकता व पर्यावरण हे दोन्ही घटक गुंतले आहे.

ही आहेत लक्षणे

या रोगाच्या रुग्णांमध्ये मुंग्या येणे, शरीराच्या एका बाजूला किंवा हातापायांमध्ये कमजोरी येणे, हालचालीमध्ये असंतुलन, थरथरणे, थकवा, वेदना, दृष्टिदोष, दुहेरी दृष्टी, चक्कर येणे, मूत्राशय, पोटाचे विकार व लैंगिक समस्या यासह अनेक लक्षणे आढळतात.

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक आहे. सरासरी २५ ते ३० वयात याची सुरुवात होते. काही रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे काही दिवस किंवा आठवड्यापर्यंतच राहतात. त्यानंतर काही महिने किंवा अनेक वर्षांनंतर पुन्हा रोगाची लक्षणे दिसून येतात. याला ‘रीलेप्सिंग-रेमिटिंग’ म्हटले जाते.

हमखास उपचार नाही

या रोगावर हमखास उपचार नाही. यामुळे लवकर निदान झाल्यास रुग्णाचा त्रास कमी होऊ शकतो. मागील २० वर्षांमध्ये रोग सुधारण्याचे औषध विकसित करण्यात आले आहेत. असेही डॉ. मेश्राम म्हणाले.

डॉ. चंद्रशेखर मेश्राम, न्यूरोलॉजिस्ट

२८ लाखांहून अधिक लोक या रोगाने ग्रस्त

इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजी अध्यक्ष निर्मल सूर्या म्हणाले, जगात २८ लाखांहून अधिक ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’ने ग्रस्त आहेत. या रोगाबद्दल जागरूकता वाढविणे व त्याचा प्रभाव कमी करणे हे संघटनेचे ध्येय आहे.

१० लाख व्यक्तींमागे ५ ते १० रुग्ण

बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथील न्यूरोसायन्सचे संचालक पद्मश्री डॉ. बी. एस. सिंघल म्हणाले, काही दशकांपूर्वी हा रोग भारतात दुर्मीळ मानला जात होता. परंतु, न्यूरोलॉजिस्टची संख्या वाढल्यामुळे या रोगाचे निदान लवकर होत आहे. देशात जवळपास १० लाख व्यक्तींमागे ५ ते १० रुग्ण आढळतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स