शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

World Multiple Sclerosis day : दर पाच मिनिटात एकाला ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’ आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 10:49 IST

मेंदू, पाठीच्या कण्यातील थर खराब करतोय मल्टिपल स्क्लेरोसिस

ठळक मुद्देअशक्तपणा ते अक्षमतेपर्यंत

नागपूर : मेंदू व पाठीचा कणामधील ‘मायलिन’चा थर खराब करणारा आजार म्हणून ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’ ओळखला जातो. याचा प्रभाव अशक्तपणापासून ते शारीरिक अक्षमतेपर्यंत होतो. जगात दर पाच मिनिटांनी एकाला या आजाराचे निदान होते अशी माहिती, ‘ट्रॉपिकल न्यूरोलॉजी स्पेशलिटी ग्रुप ऑफ डब्ल्यूएफएन’चे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.

३० मे हा दिवस जागतिक ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’ (एमएसएस) म्हणून पाळला जातो. या रोगाबद्दलच्या जनजागृतीसाठी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. डॉ. मेश्राम म्हणाले, हा आजार होण्यामागे नेमके कारण पुढे आलेले नाही. परंतु, यात अनुवांशिकता व पर्यावरण हे दोन्ही घटक गुंतले आहे.

ही आहेत लक्षणे

या रोगाच्या रुग्णांमध्ये मुंग्या येणे, शरीराच्या एका बाजूला किंवा हातापायांमध्ये कमजोरी येणे, हालचालीमध्ये असंतुलन, थरथरणे, थकवा, वेदना, दृष्टिदोष, दुहेरी दृष्टी, चक्कर येणे, मूत्राशय, पोटाचे विकार व लैंगिक समस्या यासह अनेक लक्षणे आढळतात.

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक आहे. सरासरी २५ ते ३० वयात याची सुरुवात होते. काही रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे काही दिवस किंवा आठवड्यापर्यंतच राहतात. त्यानंतर काही महिने किंवा अनेक वर्षांनंतर पुन्हा रोगाची लक्षणे दिसून येतात. याला ‘रीलेप्सिंग-रेमिटिंग’ म्हटले जाते.

हमखास उपचार नाही

या रोगावर हमखास उपचार नाही. यामुळे लवकर निदान झाल्यास रुग्णाचा त्रास कमी होऊ शकतो. मागील २० वर्षांमध्ये रोग सुधारण्याचे औषध विकसित करण्यात आले आहेत. असेही डॉ. मेश्राम म्हणाले.

डॉ. चंद्रशेखर मेश्राम, न्यूरोलॉजिस्ट

२८ लाखांहून अधिक लोक या रोगाने ग्रस्त

इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजी अध्यक्ष निर्मल सूर्या म्हणाले, जगात २८ लाखांहून अधिक ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’ने ग्रस्त आहेत. या रोगाबद्दल जागरूकता वाढविणे व त्याचा प्रभाव कमी करणे हे संघटनेचे ध्येय आहे.

१० लाख व्यक्तींमागे ५ ते १० रुग्ण

बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथील न्यूरोसायन्सचे संचालक पद्मश्री डॉ. बी. एस. सिंघल म्हणाले, काही दशकांपूर्वी हा रोग भारतात दुर्मीळ मानला जात होता. परंतु, न्यूरोलॉजिस्टची संख्या वाढल्यामुळे या रोगाचे निदान लवकर होत आहे. देशात जवळपास १० लाख व्यक्तींमागे ५ ते १० रुग्ण आढळतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स