शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

देशाला जोडणारा नागपुरातील रिंगरोड धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 2:59 PM

प्रशासनाकडून अपघातमुक्त शहरासंदर्भात विविध योजना राबवित येत असल्या तरी उपराजधानीत २०१७ मध्येदेखील अपघातांचे सत्र सुरूच आहे. या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत शहरात ९०० हून अधिक अपघात झाले.

ठळक मुद्दे९ महिन्यात उपराजधानीत ९०० हून अधिक अपघात

आॅनलाईन लोकमतनागपूर : प्रशासनाकडून अपघातमुक्त शहरासंदर्भात विविध योजना राबवित येत असल्या तरी उपराजधानीत २०१७ मध्येदेखील अपघातांचे सत्र सुरूच आहे. या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत शहरात ९०० हून अधिक अपघात झाले. यातील १८ टक्के अपघात प्राणांतिक ठरले. काही विशिष्ट मार्गांवर अपघातांचे प्रमाण जास्त असल्याचे पोलीस विभागाला आढळून आले आहे. रिंगरोड हा शहरातील अपघातमार्ग ठरत असून सर्वाधिक अपघात येथेच झाले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१७ ते ३० सप्टेंबर २०१७ या कालावधीत शहरात किती अपघात झाले, यातील किती अपघात प्राणांतिक होते, शहरातून जाणाºया राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर किती अपघात झाले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. जनमाहिती अधिकाºयांकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१७ या कालावधीत शहरात एकूण ९०२ अपघात झाले. यातील सर्वाधिक ९० अपघात रिंगरोडवर झाले. त्याखालोखात अमरावती मार्गावर ६१ तर जबलपूर मार्ग व वर्धा मार्ग येथे प्रत्येकी ६० अपघातांची नोंद झाली. शहरात ९ महिन्यांमध्ये १६३ अपघात हे प्राणांतिक ठरले, तर ३४३ अपघात हे गंभीर स्वरूपाचे होते. शहरातील अनेक मार्गांवर विकासकामे सुरू आहेत. रिंग रोडवरील नवीन रस्त्यांच्या बांधकामाची गती संथ असल्यामुळे वाहतुकीला त्याचा फटका बसत आहे.आॅटोचालकांना ६० लाखांचा दंड४दरम्यान, शहरातील विविध भागांमध्ये आॅटोचालकांकडून बेशिस्त पद्धतीने पार्किंग करण्यात येते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो व अपघाताची शक्यता वाढते. वाहतूक पोलिसांनी सप्टेंबरपर्यंत २६३२९ आॅटोंवर वाहतुकीला अडथळा आणल्याबद्दल कारवाई केली. आॅटोचालकांकडून ६० लाख ६३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा