शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

देशाला जोडणारा नागपुरातील रिंगरोड धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 15:07 IST

प्रशासनाकडून अपघातमुक्त शहरासंदर्भात विविध योजना राबवित येत असल्या तरी उपराजधानीत २०१७ मध्येदेखील अपघातांचे सत्र सुरूच आहे. या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत शहरात ९०० हून अधिक अपघात झाले.

ठळक मुद्दे९ महिन्यात उपराजधानीत ९०० हून अधिक अपघात

आॅनलाईन लोकमतनागपूर : प्रशासनाकडून अपघातमुक्त शहरासंदर्भात विविध योजना राबवित येत असल्या तरी उपराजधानीत २०१७ मध्येदेखील अपघातांचे सत्र सुरूच आहे. या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत शहरात ९०० हून अधिक अपघात झाले. यातील १८ टक्के अपघात प्राणांतिक ठरले. काही विशिष्ट मार्गांवर अपघातांचे प्रमाण जास्त असल्याचे पोलीस विभागाला आढळून आले आहे. रिंगरोड हा शहरातील अपघातमार्ग ठरत असून सर्वाधिक अपघात येथेच झाले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१७ ते ३० सप्टेंबर २०१७ या कालावधीत शहरात किती अपघात झाले, यातील किती अपघात प्राणांतिक होते, शहरातून जाणाºया राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर किती अपघात झाले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. जनमाहिती अधिकाºयांकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१७ या कालावधीत शहरात एकूण ९०२ अपघात झाले. यातील सर्वाधिक ९० अपघात रिंगरोडवर झाले. त्याखालोखात अमरावती मार्गावर ६१ तर जबलपूर मार्ग व वर्धा मार्ग येथे प्रत्येकी ६० अपघातांची नोंद झाली. शहरात ९ महिन्यांमध्ये १६३ अपघात हे प्राणांतिक ठरले, तर ३४३ अपघात हे गंभीर स्वरूपाचे होते. शहरातील अनेक मार्गांवर विकासकामे सुरू आहेत. रिंग रोडवरील नवीन रस्त्यांच्या बांधकामाची गती संथ असल्यामुळे वाहतुकीला त्याचा फटका बसत आहे.आॅटोचालकांना ६० लाखांचा दंड४दरम्यान, शहरातील विविध भागांमध्ये आॅटोचालकांकडून बेशिस्त पद्धतीने पार्किंग करण्यात येते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो व अपघाताची शक्यता वाढते. वाहतूक पोलिसांनी सप्टेंबरपर्यंत २६३२९ आॅटोंवर वाहतुकीला अडथळा आणल्याबद्दल कारवाई केली. आॅटोचालकांकडून ६० लाख ६३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा