शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री भ्रूण हत्येकरिता ८२ जणांना सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 18:28 IST

स्त्री भ्रूणहत्या रोखण्याकरिता केलेल्या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल मे २०१८ अखेर ८२ व्यक्तींना सश्रम कारावासाची शिक्षा झाली असून ७२ डॉक्टरांची सनद निलंबित केली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे. विधान परिषदेत गुरुवारी प्रश्नोत्तराचा तास पुकारला गेला. मात्र गोंधळात प्रश्नोत्तरे झाली नाहीत.

ठळक मुद्देविधान परिषदेत माहिती : ७२ डॉक्टरांची सनद निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्त्री भ्रूणहत्या रोखण्याकरिता केलेल्या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल मे २०१८ अखेर ८२ व्यक्तींना सश्रम कारावासाची शिक्षा झाली असून ७२ डॉक्टरांची सनद निलंबित केली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे. विधान परिषदेत गुरुवारी प्रश्नोत्तराचा तास पुकारला गेला. मात्र गोंधळात प्रश्नोत्तरे झाली नाहीत.संजय दत्त, शरद रणपिसे आदी सदस्यांनी नीती आयोगाचा हवाला देत मुलींचा जन्मदर २०१६ मध्ये १००० मुलांच्या मागे ९०४ इतका असल्याबाबत विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लेखी उत्तरात नमूद केले की, स्त्री भ्रूणहत्या रोखण्याकरिता केलेल्या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल मे २०१८ अखेर ५८५ कोर्ट केसेस दाखल केल्या आहेत. त्यापैकी अंतिम केलेल्या ३५० प्रकरणांपैकी ९९ प्रकरणांमध्ये ११३ जणांना शिक्षा झाली. त्यापैकी ८२ व्यक्तींना सश्रम कारावासाची शिक्षा व १७ प्रकरणांमध्ये दंड ठोठावला आहे. यामध्ये गुंतलेल्या २०७ वैद्यकीय व्यावसायिकांची नावे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला कळवली असून ७२ डॉक्टरांची सनद निलंबित करण्यात आली तर ५८ डॉक्टरांना ताकीद देण्यात आली.१७ महिन्यांत २६ हजार ६१९ बालमृत्यूराज्याच्या एचएमआयएस अहवालानुसार आॅक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१८ या १७ महिन्यांच्या कालावधीत एकूण २६ हजार ६१९ बालमृत्यूंची नोंद झाल्याची कबुली महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी लेखी उत्तरात दिली आहे. यामध्ये ० ते १ वर्ष वयोगटातील २३ हजार ८६५ व १ ते ५ वर्षे वयोगटातील २७५४ बालकांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात (धारणी व चिखलदरा तालुक्यात) सप्टेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत ० ते १ वर्ष वयोगटातील १०६ तर १ ते ५ वर्षे वयोगटातील २७ बालके असे एकूण १३३ बालमृत्यू झाले. तसेच नंदूरबार जिल्ह्यात याच कालावधीत ४६ बालमृत्यू झाले. एचएमआयएसच्या अहवालानुसार २०१७-१८ मध्ये २४ तासाच्या आत एकूण ३७७८ अर्भकांचा मृत्यू झाला तसेच मुंबईमध्ये ४८३ बालकांच्या मृत्यूची नोंद झाली. किरण पावसकर, हेमंत टकले आदी सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावरील लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील पोषण आहाराबाबत गिरीशचंद्र व्यास, प्रा. अनिल सोले आदी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावरील लेखी उत्तरात मुंडे यांनी पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेकरिता २०१८-१९ या आर्थिक वर्षात १६५४ कोटींचा आराखडा केंद्र सरकारला सादर केला होता. त्यापैकी ११०१ कोटी १० लाख रुपये मंजूर झाले असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Vidhan Parishadविधान परिषद