शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

स्त्री भ्रूण हत्येकरिता ८२ जणांना सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 18:28 IST

स्त्री भ्रूणहत्या रोखण्याकरिता केलेल्या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल मे २०१८ अखेर ८२ व्यक्तींना सश्रम कारावासाची शिक्षा झाली असून ७२ डॉक्टरांची सनद निलंबित केली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे. विधान परिषदेत गुरुवारी प्रश्नोत्तराचा तास पुकारला गेला. मात्र गोंधळात प्रश्नोत्तरे झाली नाहीत.

ठळक मुद्देविधान परिषदेत माहिती : ७२ डॉक्टरांची सनद निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्त्री भ्रूणहत्या रोखण्याकरिता केलेल्या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल मे २०१८ अखेर ८२ व्यक्तींना सश्रम कारावासाची शिक्षा झाली असून ७२ डॉक्टरांची सनद निलंबित केली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे. विधान परिषदेत गुरुवारी प्रश्नोत्तराचा तास पुकारला गेला. मात्र गोंधळात प्रश्नोत्तरे झाली नाहीत.संजय दत्त, शरद रणपिसे आदी सदस्यांनी नीती आयोगाचा हवाला देत मुलींचा जन्मदर २०१६ मध्ये १००० मुलांच्या मागे ९०४ इतका असल्याबाबत विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लेखी उत्तरात नमूद केले की, स्त्री भ्रूणहत्या रोखण्याकरिता केलेल्या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल मे २०१८ अखेर ५८५ कोर्ट केसेस दाखल केल्या आहेत. त्यापैकी अंतिम केलेल्या ३५० प्रकरणांपैकी ९९ प्रकरणांमध्ये ११३ जणांना शिक्षा झाली. त्यापैकी ८२ व्यक्तींना सश्रम कारावासाची शिक्षा व १७ प्रकरणांमध्ये दंड ठोठावला आहे. यामध्ये गुंतलेल्या २०७ वैद्यकीय व्यावसायिकांची नावे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला कळवली असून ७२ डॉक्टरांची सनद निलंबित करण्यात आली तर ५८ डॉक्टरांना ताकीद देण्यात आली.१७ महिन्यांत २६ हजार ६१९ बालमृत्यूराज्याच्या एचएमआयएस अहवालानुसार आॅक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१८ या १७ महिन्यांच्या कालावधीत एकूण २६ हजार ६१९ बालमृत्यूंची नोंद झाल्याची कबुली महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी लेखी उत्तरात दिली आहे. यामध्ये ० ते १ वर्ष वयोगटातील २३ हजार ८६५ व १ ते ५ वर्षे वयोगटातील २७५४ बालकांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात (धारणी व चिखलदरा तालुक्यात) सप्टेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत ० ते १ वर्ष वयोगटातील १०६ तर १ ते ५ वर्षे वयोगटातील २७ बालके असे एकूण १३३ बालमृत्यू झाले. तसेच नंदूरबार जिल्ह्यात याच कालावधीत ४६ बालमृत्यू झाले. एचएमआयएसच्या अहवालानुसार २०१७-१८ मध्ये २४ तासाच्या आत एकूण ३७७८ अर्भकांचा मृत्यू झाला तसेच मुंबईमध्ये ४८३ बालकांच्या मृत्यूची नोंद झाली. किरण पावसकर, हेमंत टकले आदी सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावरील लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील पोषण आहाराबाबत गिरीशचंद्र व्यास, प्रा. अनिल सोले आदी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावरील लेखी उत्तरात मुंडे यांनी पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेकरिता २०१८-१९ या आर्थिक वर्षात १६५४ कोटींचा आराखडा केंद्र सरकारला सादर केला होता. त्यापैकी ११०१ कोटी १० लाख रुपये मंजूर झाले असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Vidhan Parishadविधान परिषद