शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

माहिती अधिकार कायद्याचा उपयोग जनहितासाठी व्हावा : राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 12:26 IST

माहितीचा कायदा ठराविक मर्यादेत न राहता व्यापक जनहिताच्या दृष्टीने सर्वांनीच या कायद्याचा वापर करावा, असे आवाहन नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केले.

नागपूर : आधी सामान्य नागरिकांना प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळत नव्हती. माहितीचा अधिकार कायद्यामुळे ही समस्या दूर झाली. हा एक प्रभावी कायदा आहे. या कायद्याचा केवळ जनहितासाठी उपयोग होणे गरजेचे आहे, असे मत राज्य माहिती आयोगाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचे आयुक्त राहुल पांडे यांनी मंगळवारी ‘माध्यम संवाद’ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. हा कार्यक्रम माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. 

सध्या अनेक जण वाईट हेतू साध्य करण्यासाठी या कायद्याचा उपयोग करीत आहेत. अशा प्रवृत्तीवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे. याशिवाय अनेक जण विविध माहितीसाठी दरवर्षी हजारो अर्ज दाखल करतात. अशा व्यक्तींमुळे प्रशासनाला मनस्ताप सहन करावा लागतो. औरंगाबाद खंडपीठांतर्गतच्या १३ व्यक्तींनी वेगवेगळ्या विभागांमध्ये आठ हजारावर अर्ज दाखल केले आहेत. परिणामी, एका व्यक्तीने किती अर्ज दाखल करावे, यावर मर्यादा आणणे आवश्यक झाले आहे, असेही पांडे यांनी सांगितले.

याप्रसंगी आयोगाच्या उपसचिव रोहिणी जाधव, कक्ष अधिकारी नंदकुमार राऊत, दीपाली शाहारे, माहिती विभागाचे माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके उपस्थित होते.

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकारCourtन्यायालयSocialसामाजिक