शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

माहिती अधिकार कायद्याचा उपयोग जनहितासाठी व्हावा : राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 12:26 IST

माहितीचा कायदा ठराविक मर्यादेत न राहता व्यापक जनहिताच्या दृष्टीने सर्वांनीच या कायद्याचा वापर करावा, असे आवाहन नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केले.

नागपूर : आधी सामान्य नागरिकांना प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळत नव्हती. माहितीचा अधिकार कायद्यामुळे ही समस्या दूर झाली. हा एक प्रभावी कायदा आहे. या कायद्याचा केवळ जनहितासाठी उपयोग होणे गरजेचे आहे, असे मत राज्य माहिती आयोगाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचे आयुक्त राहुल पांडे यांनी मंगळवारी ‘माध्यम संवाद’ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. हा कार्यक्रम माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. 

सध्या अनेक जण वाईट हेतू साध्य करण्यासाठी या कायद्याचा उपयोग करीत आहेत. अशा प्रवृत्तीवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे. याशिवाय अनेक जण विविध माहितीसाठी दरवर्षी हजारो अर्ज दाखल करतात. अशा व्यक्तींमुळे प्रशासनाला मनस्ताप सहन करावा लागतो. औरंगाबाद खंडपीठांतर्गतच्या १३ व्यक्तींनी वेगवेगळ्या विभागांमध्ये आठ हजारावर अर्ज दाखल केले आहेत. परिणामी, एका व्यक्तीने किती अर्ज दाखल करावे, यावर मर्यादा आणणे आवश्यक झाले आहे, असेही पांडे यांनी सांगितले.

याप्रसंगी आयोगाच्या उपसचिव रोहिणी जाधव, कक्ष अधिकारी नंदकुमार राऊत, दीपाली शाहारे, माहिती विभागाचे माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके उपस्थित होते.

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकारCourtन्यायालयSocialसामाजिक