शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

दलित युवकांवरील गुन्हे मागे घ्या :  नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुठल्याही सामाजिक हिंसाचाराचा काँग्रेस पक्ष निषेध करते. मात्र, आपल्या हक्कासाठी शांततेच्या मार्गाने भारत बंद करणाऱ्या दलित युवकांवर पोलीस व प्रशासनाकडून होत असलेल्या अत्याचाराचाही निषेध कराल तेवढा कमी आहे. खोट्या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या दलित युवकांवरील गुन्हे मागे घेऊन त्यांची तत्काळ सुटका करावी. शांततेत आंदोलन करणाऱ्या दलित ...

ठळक मुद्देभाजपाचे लोक पोलिसांना नावे देत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुठल्याही सामाजिक हिंसाचाराचा काँग्रेस पक्ष निषेध करते. मात्र, आपल्या हक्कासाठी शांततेच्या मार्गाने भारत बंद करणाऱ्या दलित युवकांवर पोलीस व प्रशासनाकडून होत असलेल्या अत्याचाराचाही निषेध कराल तेवढा कमी आहे. खोट्या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या दलित युवकांवरील गुन्हे मागे घेऊन त्यांची तत्काळ सुटका करावी. शांततेत आंदोलन करणाऱ्या दलित युवकांना मारहाण करणाऱ्यांना अटक करावी, अशी मागणी अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांनी केली आहे.राऊत यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीच्या विरोधात २ एप्रिल २०१८ रोजी भारत बंद आंदोलनात शांततापूर्ण सहभागी होणाऱ्या दलितांविरोधात भाजपाशासित राज्यांमध्ये कारवाई करण्यात आली. भाजप नेते आणि कार्यकर्ते पोलिसांना दलित युवकांची यादी देत आहेत. काँग्रेस व अन्य राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना पोलीस रात्री पकडत असून त्यांना मारहाण करीत आहेत. खोट्याप्रकरणी खटला दाखल केला जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.महिला, मुली आणि मुलांना त्यांच्या घरातून रात्रीच पोलीस ठाण्यात बोलाविले जात आहे. पोलिसांच्या छळापासून सुटण्यासाठी अनेक युवक आपल्या घरातून पळून गेले आहेत. २ एप्रिलच्या आंदोलनादरम्यान सुमारे १० दलित मारले जातात. या राज्यांमध्ये पोलीस दलितांना ठार मारणाऱ्यांना शोधून काढत नाहीत. त्याऐवजी, भाजपाच्या कार्यालयातून नियंत्रण ठेवणारे पोलीस निर्दोष दलितांवर कारवाई करीत आहेत. अटक केलेल्या युवकांना पोलिसांनी मारहाण केली आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांविरोधात पोलीस आणि प्रशासन बदल्याची कारवाई करीत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदCrimeगुन्हा