शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कलाकृतीचा आनंद व्यक्त करण्यासाठीच समीक्षा

By admin | Updated: November 12, 2014 00:55 IST

अखिल भारतीय आणि विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद म्हणजे एखाद्या पारितोषिकासारखेच आहे. पण हा सन्मान मिळावा म्हणून मी लेखन केले नाही. लेखनामागे तो उद्देशही नव्हता.

अक्षयकुमार काळे : ६४ व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवडीबद्दल सत्कार नागपूर : अखिल भारतीय आणि विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद म्हणजे एखाद्या पारितोषिकासारखेच आहे. पण हा सन्मान मिळावा म्हणून मी लेखन केले नाही. लेखनामागे तो उद्देशही नव्हता. लिहिल्याशिवाय राहावत नाही म्हणून प्रत्येक साहित्यिक लिहितो. समीक्षकाचीही तीच भावना असते. आतापर्यंत कलाकृतींचे समीक्षण केले, पण तत्पूर्वी रसिक म्हणून त्या कलाकृतीचा आनंदही घेतला. या कलाकृतींचा आनंद व्यक्त करण्यासाठीच समीक्षा लिहिली आणि समीक्षा त्यासाठीच असते, असे मत सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांनी व्यक्त केले. वरुड परिसर मित्र परिवार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, गिरीश गांधी प्रतिष्ठान, स्नातकोत्तर मराठी विभाग माजी विद्यार्थी संघटना, आकांक्षा प्रकाशन आणि मित्र परिवाराच्यावतीने विदर्भ साहित्य संमेलनाच्या आगामी ६४ व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. अक्षयकुमार काळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना काळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश गांधी तर प्रमुख अतिथी म्हणून अजय पाटील, बाळ कुळकर्णी, अरुणा सबाने, अनिल नितनवरे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे पार पडला. डॉ. काळे म्हणाले, समीक्षक काव्याचा, कलाकृतीचा आस्वाद घेऊ शकत नाही, असे काहींना वाटते पण समीक्षेसाठी प्रथम रसिक होता आले पाहिजे. रसिक म्हणून कलाकृतीचा आस्वाद घेता येणे, हीच समीक्षेची अट आहे. कवीच्या आयुष्यातही अनेक संघर्ष असतात, पण कलाकृतीच्या निर्मितीच्या धुंदीत ते गळून पडतात. समीक्षक निर्मिती करीत नसला तरी कलेचा आनंद व्यक्त करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. तोच आनंद मी व्यक्त केला आहे. कलाकृतींचे सारतत्त्व समजून ते वाटण्याचा आणि त्याचा आस्वाद पोहोचविण्याचा माझा प्रयत्न राहिला. त्यातच खरा आनंद आहे. संमेलनाध्यक्षपद मिळाले याचे समाधान आहेच, असे ते म्हणाले. याप्रसंगी गिरीश गांधी म्हणाले, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे दर्जेदार कार्यक्रम आयोजित करणे असो वा एखाद्या कलाकृतीवर बोलणे असो; अक्षयकुमार काळे यांनी आपल्या अभ्यासाने आणि वाणीने अनेकांना जिंकून घेतले आहे. महाराष्ट्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. अशा योग्य व्यक्तीला संमेलनाध्यक्षपदी आरूढ होण्याचा मान मिळतो, ही आनंदाची बाब आहे. एरवी प्राध्यापक मंडळी काम टाळत असताना राष्ट्रसंतांचे अध्यासन आवडीने ते चालवीत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात त्यांच्या वडिलांचे मोठे स्थान आहे. वडिलांनी वाचनासाठी आणि शिक्षणासाठी दिलेल्या प्रोत्साहनामुळे अक्षयकुमार काळे घडले. याप्रसंगी त्यांचे वडील असते तर त्यांच्या संमेलनाध्यक्ष होण्याचा आनंद त्यांना झाला असता. त्यांच्या हातून अधिक लिखाण होवो आणि अधिकाधिक चांगले कार्य होवो, अशा शुभेच्छा गांधी यांनी काळे यांना दिल्यात. याप्रसंगी रमेश बोरकुटे, अनिल नितनवरे, अजय पाटील, अरुणा सबाने, ज्ञानेश्वर रक्षक, बाळ कुळकर्णी, तीर्थराज कापगते यांनीही डॉ. अक्षयकुमार काळे यांचा गुणगौरव केला. कार्यक्रमाचे संचालन मनीषा साधू यांनी तर आभार डॉ. कोमल ठाकरे यांनी मानले. (प्रतिनिधी)