शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

 गव्हाच्या निर्यातबंदीनंतर साखरेच्या निर्यातीवर निर्बंध; खाद्यतेलावरील सीमाशुल्क रद्द; डाळींची आयात खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 07:00 IST

Nagpur News गव्हाच्या निर्यातबंदीपाठोपाठ आता साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लावले आहेत. तसेच डाळींच्या आयातीला परवानगी आणि सोयाबीन व सूर्यफुलाच्या आयातीवरील सीमाशुल्क शून्य टक्के केल्यामुळे जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार आहेत.

ठळक मुद्देमहागाईवर सरकारी ‘ब्रेक’उपाययोजनांमुळे सामान्यांना दिलासा

मोरेश्वर मानापुरे

नागपूर : महागाईवर नियंत्रण आणून नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. काही दिवसांपूर्वी पेट्रोल व डिझेलवरील कर कमी केले. गव्हाच्या निर्यातबंदीपाठोपाठ आता साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लावले आहेत. तसेच डाळींच्या आयातीला परवानगी आणि सोयाबीन व सूर्यफुलाच्या आयातीवरील सीमाशुल्क शून्य टक्के केल्यामुळे जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

खाद्यतेल दहा रुपये किलोने कमी होणार

सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क दोन वर्षांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत दरवर्षी २० लाख टन सोया तेल आणि २० लाख टन सूर्यफूल तेल आयात करावे लागेल. या निर्णयामुळे दोन्ही तेलाचे दर प्रति किलो दहा रुपयांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. देशात दरवर्षी १३० लाख टन सोया तेल आणि ४० लाख टन सूर्यफूल तेलाची आयात होते. २० लाख टनांनंतर आयात शुल्क लागणार काय, यावर संभ्रम असल्याचे व्यापारी अनिल अग्रवाल म्हणाले.

साखरेला गोडवा; भाव तीन रुपयांनी उतरणार

यावर्षी १०० लाख टनांपेक्षा जास्त साखर निर्यात करता येणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. पण सरकारची परवानगी घेऊन निर्यातीचा दुसरा मार्ग मोकळा आहे. अर्थात निर्यात बंदी काही प्रमाणात आहेत. या निर्णयामुळे किरकोळमध्ये साखरेचे दर दोन ते तीन रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. तसे पाहता मध्यपूर्व देशांमध्ये उच्चदर्जाच्या साखरेच्या तुलनेत मध्यम व हलक्या दर्जाच्या साखरेला मागणी आहे. त्यामुळे निर्यात बंदीचा व्यवसायावर परिणाम होणार नसल्याचे व्यापारी किरीट पंचमतिया म्हणाले.

आयात खुली केल्याने डाळी स्वस्त

डाळींच्या वाढत्या किमतीवर प्रतिबंध आणण्यासाठी सरकारने डाळींची आयात खुली केली. त्यामुळे देशात सर्वच डाळींचे भाव घसरले. तूर, हरभरा, मूग, उडीद डाळींचे दर ५ ते १० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे सर्वाधिक विक्रीच तूरडाळीचे दर ९५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

- प्रताप मोटवानी, सचिव, धान्य बाजार असोसिएशन विदर्भ.

गहू पाच रुपयांनी स्वस्त

गव्हाच्या निर्यातबंदीमुळे गव्हाच्या दरवाढीला ‘ब्रेक’ लागला आणि सर्व प्रकारच्या गव्हाचे दर प्रतिकिलो तीन ते पाच रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पुढे दरवाढ होणार नाही.

- रमेश उमाठे, धान्य व्यापारी.

डिझेलच्या करकपातीने महागाई कमी

डिझेलचे दर कमी झाल्यामुळे मालवाहतुकीचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. त्यामुळे महागाई निश्चितच कमी होण्यास मदत होईल, शिवाय भाजीपाल्यांचे दरही कमी होतील, असे ट्रान्सपोर्टर कुक्कू मारवाह यांनी सांगितले.

टॅग्स :businessव्यवसाय