शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

घाेटी-देवलापार बससेवा पूर्ववत सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : काेराेना संक्रमण कमी हाेताच राज्य शासनाच्या आदेशानुसार शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : काेराेना संक्रमण कमी हाेताच राज्य शासनाच्या आदेशानुसार शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रामटेक शहरातील शाळेत जाण्यास व शाळेतून घरी परत येण्यास बसेस उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत असल्याने, घाेटी-देवलापार ही बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे. दुसरीकडे बसेसची कमतरता असल्याचे रामटेक येथील आगार प्रमुखांनी दिले.

देवलापार, बाेरडा (सराखा)सह परिसरातील अनेक गावांमधील शेकडाे विद्यार्थी रामटेक शहरातील शाळा, महाविद्यालयात शिकतात. हे विद्यार्थी, विद्यार्थिनी राेज बसने ये-जा करायचे. काेराेना संक्रमणामुळे शाळांसाेबत बससेवाही बंद करण्यात आली हाेती. संक्रमण कमी हाेताच शाळा, महाविद्यालये १५ डिसेंबर, २०२० पासून व काही प्रमाणात बससेवा सुरू करण्यात आली. मात्र, ग्रामीण भागातील बससेवाही अजूनही बंदच आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना आधी मनसरपर्यंत व नंतर दुसऱ्या बस अथवा वाहनाने रामटेकला यावे लागते, तसेच याच पद्धतीने घरी परत जावे लागते.

या विद्यार्थ्यांची शाळेची वेळ सकाळी ८ ते ११.३० ही आहे. या विद्यार्थ्यांना मनसरहून सकाळी ९ वाजता किंवा त्यानंतर बस मिळते. त्यामुळे त्यांना शाळेत पाेहाेचण्यास राेज किमान एक ते दीड तास उशीर हाेत असल्याने, विद्यार्थ्यांसह शिक्षकांना विविध अडचणींना सामाेरे जावे लागते. विद्यार्थ्यांना पहिल्या व प्रसंगी दुसऱ्या तासिकेला मुकावे लागते. काेराेना संक्रमणापूर्वी सकाळी ७.३० वाजताची घाेटी-रामटेक व दुपारी १२.३० वाजताची रामटेक-देवलापार ही बससेवा सुरू असल्याने ती विद्यार्थ्यांच्या साेयीची हाेती. त्यामुळे ही बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणीही विद्यार्थ्यांसह पालक व एसएफआयच्या पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

...

बसेसची कमतरता

विद्यार्थ्यांची ही समस्या निश्चितच साेडविली जाणार असून, त्याला थाेडा वेळ लागणार असल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली. त्यासाठी काही बसेस ॲडजेस्ट कराव्या लागणार आहेत. रामटेक आगारात पूर्वी ५६ बसेस हाेत्या. यातील नऊ बसेस स्क्रॅप झाल्या असून, पाच बसेस कन्व्हर्षण झाल्या आहेत. त्यामुळे आगारात सध्या ४४ बसेस आहेत, अशी माहिती आगारप्रमुखांनी दिली. विशेष म्हणजे, रामटेक तालुक्यात मानव विकास उपक्रम लागू असतानाही विद्यार्थ्यांची गैरसाेय हाेत आहे. आगारात उपलब्ध असलेल्या बसेस केवळ प्रवाशांसाठीच वापरल्या जात आहेत. ही समस्या साेडविण्यासाठी यापूर्वी तीन गावांमधील विद्यार्थ्यांसह पालकांनी आगार प्रमुखांना निवेदन दिले आहे.