शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
2
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
3
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
4
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
5
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
6
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
7
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
8
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
9
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
10
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
11
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
12
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
13
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
14
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
15
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
16
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
17
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
18
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
19
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

घाेटी-देवलापार बससेवा पूर्ववत सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : काेराेना संक्रमण कमी हाेताच राज्य शासनाच्या आदेशानुसार शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : काेराेना संक्रमण कमी हाेताच राज्य शासनाच्या आदेशानुसार शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रामटेक शहरातील शाळेत जाण्यास व शाळेतून घरी परत येण्यास बसेस उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत असल्याने, घाेटी-देवलापार ही बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे. दुसरीकडे बसेसची कमतरता असल्याचे रामटेक येथील आगार प्रमुखांनी दिले.

देवलापार, बाेरडा (सराखा)सह परिसरातील अनेक गावांमधील शेकडाे विद्यार्थी रामटेक शहरातील शाळा, महाविद्यालयात शिकतात. हे विद्यार्थी, विद्यार्थिनी राेज बसने ये-जा करायचे. काेराेना संक्रमणामुळे शाळांसाेबत बससेवाही बंद करण्यात आली हाेती. संक्रमण कमी हाेताच शाळा, महाविद्यालये १५ डिसेंबर, २०२० पासून व काही प्रमाणात बससेवा सुरू करण्यात आली. मात्र, ग्रामीण भागातील बससेवाही अजूनही बंदच आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना आधी मनसरपर्यंत व नंतर दुसऱ्या बस अथवा वाहनाने रामटेकला यावे लागते, तसेच याच पद्धतीने घरी परत जावे लागते.

या विद्यार्थ्यांची शाळेची वेळ सकाळी ८ ते ११.३० ही आहे. या विद्यार्थ्यांना मनसरहून सकाळी ९ वाजता किंवा त्यानंतर बस मिळते. त्यामुळे त्यांना शाळेत पाेहाेचण्यास राेज किमान एक ते दीड तास उशीर हाेत असल्याने, विद्यार्थ्यांसह शिक्षकांना विविध अडचणींना सामाेरे जावे लागते. विद्यार्थ्यांना पहिल्या व प्रसंगी दुसऱ्या तासिकेला मुकावे लागते. काेराेना संक्रमणापूर्वी सकाळी ७.३० वाजताची घाेटी-रामटेक व दुपारी १२.३० वाजताची रामटेक-देवलापार ही बससेवा सुरू असल्याने ती विद्यार्थ्यांच्या साेयीची हाेती. त्यामुळे ही बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणीही विद्यार्थ्यांसह पालक व एसएफआयच्या पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

...

बसेसची कमतरता

विद्यार्थ्यांची ही समस्या निश्चितच साेडविली जाणार असून, त्याला थाेडा वेळ लागणार असल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली. त्यासाठी काही बसेस ॲडजेस्ट कराव्या लागणार आहेत. रामटेक आगारात पूर्वी ५६ बसेस हाेत्या. यातील नऊ बसेस स्क्रॅप झाल्या असून, पाच बसेस कन्व्हर्षण झाल्या आहेत. त्यामुळे आगारात सध्या ४४ बसेस आहेत, अशी माहिती आगारप्रमुखांनी दिली. विशेष म्हणजे, रामटेक तालुक्यात मानव विकास उपक्रम लागू असतानाही विद्यार्थ्यांची गैरसाेय हाेत आहे. आगारात उपलब्ध असलेल्या बसेस केवळ प्रवाशांसाठीच वापरल्या जात आहेत. ही समस्या साेडविण्यासाठी यापूर्वी तीन गावांमधील विद्यार्थ्यांसह पालकांनी आगार प्रमुखांना निवेदन दिले आहे.