शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

जबाबदारी महापौरांवर अन् अधिकार शून्य : विश्वनाथ महाडेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:43 IST

महापालिका  क्षेत्रात समस्या उद्भवली तर महापौरांना जबाबदार धरले जाते. परंतु अधिकाराची मागणी करूनही सरकारकडून मिळत नाही. जबाबदारीचा विचार करता महापौरांना आर्थिक तसेच प्रशासकीय स्वरुपाचे अधिकार द्यावे, महापौरांच्या अधिकारात वाढ करण्यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय होण्याची गरज आहे, अशी भूमिका महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्ष व बृहन्मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शनिवारी मांडली.

ठळक मुद्देआर्थिक व प्रशासकीय अधिकारात वाढ व्हावीमुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका  क्षेत्रात समस्या उद्भवली तर महापौरांना जबाबदार धरले जाते. परंतु अधिकाराची मागणी करूनही सरकारकडून मिळत नाही. जबाबदारीचा विचार करता महापौरांना आर्थिक तसेच प्रशासकीय स्वरुपाचे अधिकार द्यावे, महापौरांच्या अधिकारात वाढ करण्यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय होण्याची गरज आहे, अशी भूमिका महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्ष व बृहन्मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शनिवारी मांडली.महाराष्ट्र राज्य महापौर परिषदेच्यावतीने १८ व्या महापौर परिषदेचे आयोजन वसंतराव नाईक कृषी अनुसंधान केंद्र (वनामती), नागपूर येथे करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनानंतर महाडेश्वर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी परिषदेच्या उपाध्यक्ष महापौर नंदा जिचकार उपस्थित होत्या. महाडेश्वर म्हणाले, सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांनी एखादा प्रस्ताव मंजूर क रून तो अभिप्रायासाठी राज्य सरकारकडे पाठविला तर त्यावर ५ ते १० वर्षे कुठल्याची प्रकारचा निर्णय घेतला जात नाही. प्रस्तावाचे महत्त्व संपून जाते.आयुक्तांना संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. दुसरीकडे अधिकार नसलेल्या नगरसेवकांना व महापौरांना नागरिकांना सामोरे जावे लागते. याचा विचार करता अधिकारात वाढ करण्याची गरज आहे. परिषदेच्या माध्यमातून एखाद्या शहरातील चांगला प्रकल्प अन्य शहरात राबविला जावा, तंत्रज्ञानाचे आदानप्रदान व्हावे, विकास कार्यावर चर्चा व्हावी. यात येणाऱ्या अडचणी शासनापुढे मांडल्या जाव्यात. ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचे अधिकारी ऐकत नाही. महापौरांनाही विश्वासात घेतले जात नाही. अशा प्रश्नाना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न असल्याचे महाडेश्वर यांनी सांगितले.

आर्थिक मदतीत वाढ करावीशहरांचा विस्तार व लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळत नाही. मदत वाढवून शहराच्या विकासाला गती मिळू शकते.

शिवसेनेचा विकासाला विरोध नाहीशिवसेनेचा कोणत्याही विकास कामांना विरोध नााही. मुंबईत मेट्रो रेल्वेमुळे एक हजार झाडे कापली जात आहेत. त्या मोबदल्यात दुसऱ्या ठिकाणी झाडे लागली पाहिजेत. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पासह अन्य प्रकल्पांचा वाटा उचलणे महापालिकांना शक्य होत नाही. याचा विचार करता विकास योजनेत सरकारचा वाटा वाढला पाहिजे, अशी प्रतिक्रिया विश्वनात महाडेश्वर यांनी स्मार्ट सिटी व मेट्रो रेल्वे संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर व्यक्त केली.मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केलेले मुद्दे

  • सामाजिक समस्यांचा निपटारा करण्यासाठी महापौरांना प्रशासकीय व आर्थिक अधिकार मिळावे. काही राज्यात महापौरांना असे अधिकार आहेत.
  • आपत्ती वा तातडीच्या उपाययोजना करण्याचे अधिकार महापौरांना मिळावे.
  • महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याचा अधिकार महापौरांना असावा.
  •  एका वित्त वर्षात बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरांना ७ कोटी तर अन्य महापालिकांच्या महापौरांना २.५० कोटींचा निधी खर्च करण्याचे अधिकार आहेत. यात वाढ करून बृहन्मुंबई महापौरांना २० कोटी तर अन्य महापौरांना १० कोटी करण्यात यावे.
  • आयुक्तांकडून स्थायी समिती अध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींना देण्यात येणाऱ्या प्रस्तावांची प्रत महापौरांनाही मिळावी.
  • महापालिका सभागृहाचा कोणताही निर्णय रद्द करण्यापूर्वी शासनाने महापालिकेची बाजू जाणून घ्यावी.
  • महिला उद्योग भवनासाठी जागा आरक्षित करावी, यासाठी १०० टक्के अनुदान मिळावे.
  • नगर विकास दिन साजरा करण्याचा निर्णय झाला आहे. या दिनानिमित्ताने चांगले काम करणाऱ्या नगर परिषदांना शासनाकडून दरवर्षी ७८ कोटींचा निधी दिला जातो. त्याच धर्तीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या  महापालिकांनाही हा निर्णय लागू करावा.
  • महापालिका शासनाकडे विविध प्रस्ताव पाठवितात. त्यावर ठराविक मुदतीत निर्णय व्हावा.
  •  महापौराच्या आतिथ्य भत्त्यात वाढ करण्यात यावी.
  • आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिण्याचे अधिकार महापौरांना मिळावे.
  •  आमदार-खासदार यांच्या धर्तीवर महापौरांनाही प्रोत्साहन निधी मिळावा.
टॅग्स :MayorमहापौरMaharashtraमहाराष्ट्र