शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जबाबदारी महापौरांवर अन् अधिकार शून्य : विश्वनाथ महाडेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:43 IST

महापालिका  क्षेत्रात समस्या उद्भवली तर महापौरांना जबाबदार धरले जाते. परंतु अधिकाराची मागणी करूनही सरकारकडून मिळत नाही. जबाबदारीचा विचार करता महापौरांना आर्थिक तसेच प्रशासकीय स्वरुपाचे अधिकार द्यावे, महापौरांच्या अधिकारात वाढ करण्यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय होण्याची गरज आहे, अशी भूमिका महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्ष व बृहन्मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शनिवारी मांडली.

ठळक मुद्देआर्थिक व प्रशासकीय अधिकारात वाढ व्हावीमुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका  क्षेत्रात समस्या उद्भवली तर महापौरांना जबाबदार धरले जाते. परंतु अधिकाराची मागणी करूनही सरकारकडून मिळत नाही. जबाबदारीचा विचार करता महापौरांना आर्थिक तसेच प्रशासकीय स्वरुपाचे अधिकार द्यावे, महापौरांच्या अधिकारात वाढ करण्यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय होण्याची गरज आहे, अशी भूमिका महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्ष व बृहन्मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शनिवारी मांडली.महाराष्ट्र राज्य महापौर परिषदेच्यावतीने १८ व्या महापौर परिषदेचे आयोजन वसंतराव नाईक कृषी अनुसंधान केंद्र (वनामती), नागपूर येथे करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनानंतर महाडेश्वर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी परिषदेच्या उपाध्यक्ष महापौर नंदा जिचकार उपस्थित होत्या. महाडेश्वर म्हणाले, सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांनी एखादा प्रस्ताव मंजूर क रून तो अभिप्रायासाठी राज्य सरकारकडे पाठविला तर त्यावर ५ ते १० वर्षे कुठल्याची प्रकारचा निर्णय घेतला जात नाही. प्रस्तावाचे महत्त्व संपून जाते.आयुक्तांना संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. दुसरीकडे अधिकार नसलेल्या नगरसेवकांना व महापौरांना नागरिकांना सामोरे जावे लागते. याचा विचार करता अधिकारात वाढ करण्याची गरज आहे. परिषदेच्या माध्यमातून एखाद्या शहरातील चांगला प्रकल्प अन्य शहरात राबविला जावा, तंत्रज्ञानाचे आदानप्रदान व्हावे, विकास कार्यावर चर्चा व्हावी. यात येणाऱ्या अडचणी शासनापुढे मांडल्या जाव्यात. ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचे अधिकारी ऐकत नाही. महापौरांनाही विश्वासात घेतले जात नाही. अशा प्रश्नाना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न असल्याचे महाडेश्वर यांनी सांगितले.

आर्थिक मदतीत वाढ करावीशहरांचा विस्तार व लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळत नाही. मदत वाढवून शहराच्या विकासाला गती मिळू शकते.

शिवसेनेचा विकासाला विरोध नाहीशिवसेनेचा कोणत्याही विकास कामांना विरोध नााही. मुंबईत मेट्रो रेल्वेमुळे एक हजार झाडे कापली जात आहेत. त्या मोबदल्यात दुसऱ्या ठिकाणी झाडे लागली पाहिजेत. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पासह अन्य प्रकल्पांचा वाटा उचलणे महापालिकांना शक्य होत नाही. याचा विचार करता विकास योजनेत सरकारचा वाटा वाढला पाहिजे, अशी प्रतिक्रिया विश्वनात महाडेश्वर यांनी स्मार्ट सिटी व मेट्रो रेल्वे संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर व्यक्त केली.मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केलेले मुद्दे

  • सामाजिक समस्यांचा निपटारा करण्यासाठी महापौरांना प्रशासकीय व आर्थिक अधिकार मिळावे. काही राज्यात महापौरांना असे अधिकार आहेत.
  • आपत्ती वा तातडीच्या उपाययोजना करण्याचे अधिकार महापौरांना मिळावे.
  • महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याचा अधिकार महापौरांना असावा.
  •  एका वित्त वर्षात बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरांना ७ कोटी तर अन्य महापालिकांच्या महापौरांना २.५० कोटींचा निधी खर्च करण्याचे अधिकार आहेत. यात वाढ करून बृहन्मुंबई महापौरांना २० कोटी तर अन्य महापौरांना १० कोटी करण्यात यावे.
  • आयुक्तांकडून स्थायी समिती अध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींना देण्यात येणाऱ्या प्रस्तावांची प्रत महापौरांनाही मिळावी.
  • महापालिका सभागृहाचा कोणताही निर्णय रद्द करण्यापूर्वी शासनाने महापालिकेची बाजू जाणून घ्यावी.
  • महिला उद्योग भवनासाठी जागा आरक्षित करावी, यासाठी १०० टक्के अनुदान मिळावे.
  • नगर विकास दिन साजरा करण्याचा निर्णय झाला आहे. या दिनानिमित्ताने चांगले काम करणाऱ्या नगर परिषदांना शासनाकडून दरवर्षी ७८ कोटींचा निधी दिला जातो. त्याच धर्तीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या  महापालिकांनाही हा निर्णय लागू करावा.
  • महापालिका शासनाकडे विविध प्रस्ताव पाठवितात. त्यावर ठराविक मुदतीत निर्णय व्हावा.
  •  महापौराच्या आतिथ्य भत्त्यात वाढ करण्यात यावी.
  • आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिण्याचे अधिकार महापौरांना मिळावे.
  •  आमदार-खासदार यांच्या धर्तीवर महापौरांनाही प्रोत्साहन निधी मिळावा.
टॅग्स :MayorमहापौरMaharashtraमहाराष्ट्र