शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कलावंतांची जबाबदारी पूर्णत: राज्यशासनाची : प्रेमानंद गज्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:30 IST

नाट्य परिषद म्हणा वा अन्य कोणत्याही कलावंतांच्या संस्था, कलावंतांवर विसंबून असतात. मात्र, कलावंतांची जबाबदारी कुणी घ्यावी... हा प्रश्न आहे. कलावंत वाऱ्यावरच राहतील का? कोणताही कलावंत जगावा ही राज्यशासनाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करावी... अशी भावना ज्येष्ठ नाटककार व ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमुलाखत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाट्य परिषद म्हणा वा अन्य कोणत्याही कलावंतांच्या संस्था, कलावंतांवर विसंबून असतात. मात्र, कलावंतांची जबाबदारी कुणी घ्यावी... हा प्रश्न आहे. कलावंत वाऱ्यावरच राहतील का? कोणताही कलावंत जगावा ही राज्यशासनाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करावी... अशी भावना ज्येष्ठ नाटककार व ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केली.कलावंत जगला पाहिजे, त्यासाठी काय करावे?कलावंत रसिकांच्या मनोरंजनाची आणि विद्वत्तेची भूक भागवतो. मात्र, असे करताना त्याच्या खिशात दीड दमडीही राहत नाही. तो जगेल तरच कला जिवंत राहतील. म्हणून, प्रत्येक कलावंताला शासनाकडून एक घर मिळायला हवे, तो घर चालवू शकत असेल तरच कलेसाठी वेळ देऊ शकतो म्हणून, त्याच्या खात्यात दहा लाख ठेवीस्वरूपात शासनानेच ठेवायला हवे आणि त्याच्या व्याजातून तो घर चालवू शकेल. त्याला त्याच्या प्रत्येक संशोधन कार्यात वा कलाविष्कारासाठी फेलोशिप मिळायला हवी.नाट्य परिषदेच्या कामावर संतुष्ट आहात का?बिल्कूल नाही.. नाट्य परिषद काम करीत नाही, ही तक्रार माझी स्वत:ची आहे. आज परिषदेच्या ६२ शाखा बृहन्महाराष्ट्रात आहेत. मात्र, अनेक शाखा बंद पडल्या आहेत. मध्यवर्तीने विविध उपक्रमांसाठी परिषदेच्या शाखांना निधी उपलब्ध करून द्यावा. मात्र, नाट्य परिषदेला सरकारकडून किती अनुदान मिळते, याबाबत कुणालाच काही सांगता येत नाही. तेव्हा शासनानेही याकडे लक्ष पुरवावे.नाट्य लेखिकांची संख्या कशी वाढेल?नाटक वगळता साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रात महिला लेखिका पुढे येत असल्याचे दिसून येते. यावरून नाटकासाठीच्या चिंतनाबाबत महिला कुठेतरी कमी पडत असल्याचे स्पष्ट होते. त्यासाठी कार्यशाळा घेत आहोत. नागपुरात महिला लेखिकांची कार्यशाळा आयोजित केली जाते, महिला नाट्य महोत्सव घेतले जातात. मात्र, त्याचा प्रभाव पुणे-मुंबईकडे पडायला हवा... तसे होत नाही. त्याअनुषंगाने महिला नाट्य लेखिकांच्या अभिव्यक्तीला चिंतनाची धार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.नाट्य संस्थांकडून उपक्रम होत नाही, त्याबाबत...नाट्य संस्थांकडून उपक्रम होत नाही, ही बाब खरी आहे. त्या अनुषंगाने प्रयत्न व्हायला हवे. त्यासाठी नाट्य परिषदेच्या शाखांनी पुढाकार घ्यावा आणि नाट्य संस्था शासनदरबारी नोंदणीकृत होतील, याचे प्रयत्न करावे. उपक्रमांसाठी प्रत्येक नोंदणीकृत नाट्य संस्थेला विशेष तरतुदीअंतर्गत दरसाल ५० हजार रुपये अनुदान द्यावे आणि उपक्रमांचा आराखडा सादर करण्यास बाध्य करावे. तर आपोआप नाट्य संस्थांना उभारी मिळेल. शेवटी कलावंतांना पैसा लागतो आणि त्याशिवाय कोणतेच उपक्रम होत नाही, हे सत्य आहे.अध्यक्ष या नात्याने कोणते प्रयत्न सुरू आहेत?संमेलनाध्यक्ष असल्यापासून पुणे, एरोली, नाशिक, कोल्हापूर व अहमदनगर येथे नाट्यलेखन कार्यशाळा घेतल्या आहेत. नागपुरात ही सहावी कार्यशाळा आहे. मात्र, त्यासाठीचा निधी अपुरा पडतो. मला अध्यक्ष या नात्याने मिळालेल्या निधीतून ते शक्य नाही, तरीदेखील स्थानिक शाखांच्या मदतीने घेतो आहे.

 

टॅग्स :Natakनाटकinterviewमुलाखत