शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

बौद्ध उद्योजकांना चालना देण्याचा संकल्प : ६५०० उद्योजकांना जोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 23:03 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जेमतेम ६२ वर्षे लोटली आहेत. महामानवाच्या प्रेरणेतून या पाच दशकात या समाजाने शिक्षण क्षेत्रात वेगाने प्रगती केली आहे. आता उद्योग क्षेत्रातही हा समाज पुढे येण्यासाठी धडपड करीत आहे. अपुरे भांडवल आणि भक्कम पाठबळ नसल्याने अनेक अडचणी आहेत. मात्र या अडचणींचे निराकरण करीत कल्पक उद्योजकांकडून वाटचाल केली जात आहे. अशा कल्पक उद्योजकांना चालना देण्यासाठी रत्नदीप कांबळे या तरुण उद्योजकाच्या संकल्पनेतून ‘बुद्धिस्ट उद्योजक’ समूहाचा उदय झाला आहे.

ठळक मुद्देरत्नदीप कांबळे यांच्या संकल्पनेला यश

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जेमतेम ६२ वर्षे लोटली आहेत. महामानवाच्या प्रेरणेतून या पाच दशकात या समाजाने शिक्षण क्षेत्रात वेगाने प्रगती केली आहे. आता उद्योग क्षेत्रातही हा समाज पुढे येण्यासाठी धडपड करीत आहे. अपुरे भांडवल आणि भक्कम पाठबळ नसल्याने अनेक अडचणी आहेत. मात्र या अडचणींचे निराकरण करीत कल्पक उद्योजकांकडून वाटचाल केली जात आहे. अशा कल्पक उद्योजकांना चालना देण्यासाठी रत्नदीप कांबळे या तरुण उद्योजकाच्या संकल्पनेतून ‘बुद्धिस्ट उद्योजक’ समूहाचा उदय झाला आहे.बौद्ध समाजातील तरुणांना व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी सहा वर्षापूर्वी रत्नदीप यांनी ‘बुद्धिस्ट एन्टरप्रीनर्स असोसिएशन आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ या ग्रुपची स्थापना केली. लहान मोठा व्यवसाय करणाऱ्या बौद्ध उद्योजकांना एकत्रित करायचे हा मूळ उद्देश यामागे होता. बौद्ध तरुणाकडून झालेला अशाप्रकारचा पहिलाच प्रयत्न होता. पुढे कार्याचाही विस्तार होत गेला. एखादा व्यवसाय करण्यास इच्छुक तरुणाला त्याबाबत आवश्यक मार्गदर्शन, बँक फायनान्ससाठी मदत, रितसर नोंदणी करण्यापासून व्यवसाय वाढीसाठी आवश्यक गोष्टींचा पाठपुरावा या समूहातर्फे करण्याचे कार्य होत गेले. रत्नदीप आणि त्यांना जुळलेल्या सहकाºयांच्या प्रामाणिक प्रयत्नातून हळूहळू अनेक लहानमोठे उद्योजक त्यांच्याशी जुळले तर या संघटनेच्या मदतीने अनेक उद्योजक निर्माण झाले. विशेष म्हणजे अनेक बौद्ध महिला उद्योजिकासुद्धा या संघटनेशी जुळल्या असून संचालक म्हणून संघटनेची धुरा स्वीटी कांबळे या सांभाळत आहेत.या सहा वर्षात या संघटनेसोबत साडेसहा हजार उद्योजकांना जोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्व प्रकारचे व्यावसायिक या संघटनेसोबत आहेत. आपल्या सहकाºयांना व्यवसाय मिळवून देणे, कोणते प्रोडक्ट कुठे चांगल्या प्रकारे विकले जाईल याची माहिती देणे आणि सामान्य ग्राहकांना या सहकाºयापर्यंत पोहचविणे याचे प्रयत्न संघटनेने चालविले आहेत. अभय, अनंत, पूरब, विश्लेष, समीर, सुशील, संजय, अमोल, सविता, नितेश, पवन आदी सहकारी उद्योजक या कार्यात दिवसरात्र झटत आहेत. या प्रयत्नातून आज बौद्ध उद्योजकांचे जाळे देशातील १२ राज्यांसह जपान, श्रीलंका, आॅस्ट्रेलिया, युएई, इंग्लंड, युक्रेन आदी देशात पसरले आहेत. १४० व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि वेबसाईटच्या माध्यमातून हे उद्योजक एकमेकांशी जुळले आहेत. विशेष म्हणजे संघटनेच्या माध्यमातूनच वर्षाला ५ कोटींचा व्यवसाय या उद्योजकांना मिळत आहे. रत्नदीप यांच्या संकल्पनेतून बाबासाहेबांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी बौद्ध उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे मोठे अभियानच उदयाला आले आहे.

 

 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर