शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या सरकारी निर्णयांचा विरोध करा : कन्नन गोपिनाथन यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 21:04 IST

चुकीच्या निर्णयाचा कायदेशीर मार्गाने विरोध करावा, असे आवाहन कलम-३७० रद्द करण्याच्या विरोधात राजीनामा देणारे सनदी अधिकारी कन्नन गोपिनाथन यांनी केले.

ठळक मुद्दे‘संविधान जागर’वर व्याख्यान

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : केंद्र सरकार ऐतिहासिकच्या नावावर मूर्खपणाचे निर्णय घेत आहे. कलम-३७०, सीएए व एनआरसी हे निर्णय छुप्या धोरणाच्या अंमलबजावणीचे संकेत देत आहेत. या परिस्थितीत संविधानाचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांनी सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात करावी. चुकीच्या निर्णयाचा कायदेशीर मार्गाने विरोध करावा, असे आवाहन कलम-३७० रद्द करण्याच्या विरोधात राजीनामा देणारे सनदी अधिकारी कन्नन गोपिनाथन यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना व फ्रेन्डस् ऑफ डेमोक्रेसी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी धरमपेठेतील वनराई परिसरस्थित वसंतराव नाईक सभागृहामध्ये आयोजित ‘संविधान जागर’ विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.गोपिनाथन यांनी नोटाबंदी, कलम ३७० रद्द करणे, जीएसटी, सीएए व एनआरसीचा विरोध केला. हे सरकार १९५० मध्ये निश्चित केलेल्या धोरणाची हळूहळू अंमलबजावणी करीत आहे. सरकारचे मनसुबे शुद्ध नाहीत. नागरिकांनी त्यांना पारदर्शी कारभारासाठी निवडून दिले, पण ते चाणक्यनीतीने वागत आहेत. त्यांना वेळीच थांबवणे आवश्यक आहे. सरकारने जनतेच्या कल्याणाकरिता कार्य करणे अपेक्षित आहे. परंतु, हे सरकार आधी जनतेचे अधिकार हिसकावून त्रास देते व त्यानंतर तेच अधिकार परत करून आपला मोठेपणा मिरवते. ही कला अधिक काळ टिकणार नाही. सरकारने ऐतिहासिकच्या नावावर आतापर्यंत घेतलेल्या एकाही निर्णयाने काहीच चांगले साध्य केले नाही. उलट देशाला अस्थिरतेच्या खाईत लोटले. नोटाबंदी झाल्यानंतर १२५ नागरिकांना प्राण गमवावे लागले. कलम ३७० रद्द झाल्यानंतर दहशतवाद संपला नाही. पण काश्मिरी नागरिकांच्या मनात कटुता निर्माण झाली, असे गोपिनाथन यांनी सांगितले. संघटनेचे अध्यक्ष भूषण वाघमारे यांनी प्रास्ताविक तर, घापेश ढवळे यांनी गोपिनाथन यांचे स्वागत केले.नागरिकांना आंदोलन करण्याचा अधिकारनागरिकांना कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. अशा आंदोलनाला दडपले जाऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी सरकारच्या कारवाईची भीती सोडून देशाच्या कल्याणाकरिता चुकीच्या धोरणाविरुद्ध आंदोलने केली पाहिजेत, असे मत गोपिनाथन यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Governmentसरकारnagpurनागपूर