शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

सरकारच्या दबावातूनच राजीनामे, विरोधकांचा हल्लाबोल; राज्य मागासवर्ग आयोग अध्यक्षांच्या राजीनाम्याचे पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 06:06 IST

राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, सदस्यांनी राजीनामा का दिला, त्यांच्यावर कोणता दबाव होता, असा प्रश्न विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला.

नागपूर : राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, सदस्यांनी राजीनामा का दिला, त्यांच्यावर कोणता दबाव होता, असा प्रश्न विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. याबाबतची माहिती सभागृहाला कळली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या मुद्यावर बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्रमक होत सरकारला याबाबत जाब विचारला.

  राज्य मागासवर्गीय आयोग हा ओबीसी रक्षणासाठी आहे. हा आयोग स्वायत्त आहे. चार तारखेला या आयोगाचे अध्यक्ष न्या. निरगुडे यांनी राजीनामा दिला. नऊ तारखेला राजीनामा स्वीकारला. स्वायत्त आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा देण्याआधी तीन सदस्यांनी राजीनामा दिला. या सदस्यांनी सांगितले आमच्यावर दबाव टाकला जातो. आमच्याकडून विशिष्ट काम करून घेतले जात आहे. याबाबत सभागृहाला माहिती मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

या सगळ्या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली जाईल. माझ्यावर दबाव होता असे न्या. निरगुडे यांनी कुठेही सांगितले नाही. आम्ही त्यांच्याशी संपर्क करू आणि त्यांनी राजीनामा का दिला, याची माहिती घेऊन विधानसभा अध्यक्षांना देऊ.  

              - शंभूराज देसाई, उत्पादन शुल्क मंत्री

स्वतःची पोळी भाजण्यासाठी ज्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेप केला जात होता ते दिसत होते. आरक्षणाची हुल उठवून लोकांना खेळविण्याचे काम चालू आहे.  राजकीय दबाव वाढवून आयोगाच्या पायात दोरखंड बांधणार असाल तर कुठला आयोगाचा सदस्य काम करू शकतो?

- अनिल परब, शिवसेना नेते

आयोग  स्वतंत्र असताे. त्यांच्यावर दबाव येत असेल तर ही गंभीर बाब आहे. जोपर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढविली जात नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. प्रश्न सोडवायचा नसल्याने आयोग नेमायचा. त्यांना राजीनामा द्यायला लावायचा, हे नाटक थांबले पाहिजे

-जयंत पाटील, आमदार

मागील सरकारने न्यायमूर्ती निरगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागास आयोग स्थापन केला व सदस्यांच्या नेमणुका केल्या. सरकार बदलले, तेव्हाच सदस्यांनी राजीनामा देणे अपेक्षित होते. आता सरकारने काम वेळेत पूर्ण करण्याचे सांगितले, म्हणून राजीनामा देेणे चुकीचे आहे.

- विनोद पाटील, मराठा आरक्षण याचिकाकर्ते.

एकामागून एक सदस्य राजीनामा देत आहेत. शासनाचा राजकीय हस्तक्षेप सुरू आहे म्हणून आता अध्यक्षांनी राजीनामा दिला. आयोगाचे काम हे अर्धन्यायिक पद्धतीचे आहे, शासनाकडून हस्तक्षेप होत असेल तर नि:पक्ष काम कसे होईल, याबाबत खुलासा करावा. 

              - अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री

पाॅलिटिकल मास्टर्स काेण?

महाविकास आघाडी काळात गठीत झालेल्या राज्य मागासवर्ग आयोगात तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते त्यात सदस्य झाले. आम्ही मागासवर्ग आयोग तयार केला, तेव्हा त्यात अभ्यासक घेतले होते. किल्लारीकर यांनी मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिल्यावर पहिली भेट शरद पवार यांची घेतली. सर्वेक्षण कसे करावे आणि त्याची पद्धती काय असावी, हे मागासवर्ग आयोग ठरवीत असते, सरकार नाही. मराठा आरक्षणाचा विषय पूर्णत्वास जाऊ नये आणि तो खोळंबलेल्या राहावा अशी ज्या लोकांची इच्छा आहे, तेच यांचे ‘पॉलिटिकल मास्टर्स’ आहेत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एसआयटी चौकशी करा

आठ दिवसांपूर्वी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, ही बाब सरकारने लपवून ठेवली. त्यांच्यावर कोणत्या दोन मंत्र्यांचा दबाव होता. त्यांच्या राजीनाम्यात काय दडलंय, हे पुढे यायला हवे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात केली.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनcongressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार