शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

‘पेट’च्या पात्रता गुणांमध्ये आरक्षित प्रवर्गाला सूट नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 10:40 IST

मागील महिन्यात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ‘पेट’चे आयोजन केले होते. १६ सप्टेंबर रोजी निकाल घोषित करण्यात आले. आरक्षित प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांना ४५ ते ४९ टक्के गुण प्राप्त झाले. यासंबंधात पडताळणी केली असता विद्यापीठाद्वारे २०२१ सालच्या दिशानिर्देशांमध्ये आरक्षित विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी वेगळी व्यवस्थाच केली नसल्याची बाब समोर आली.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठातील प्रकार : सर्वांसाठी एकच मापदंड, अनेकजण अनुत्तीर्ण

आशिष दुबे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पीएच.डी. नोंदणीपूर्व प्रवेश परीक्षा असलेल्या पेटमध्ये आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसोबत अन्याय झाला आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी गुणांची कुठलीही सूट देण्यात आली नाही. त्यामुळे ‘पेट’मध्ये सहभागी झालेले अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.

‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार मागील महिन्यात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ‘पेट’चे आयोजन केले होते. १६ सप्टेंबर रोजी निकाल घोषित करण्यात आले. आरक्षित प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांना ४५ ते ४९ टक्के गुण प्राप्त झाले. यासंबंधात पडताळणी केली असता विद्यापीठाने पीएच.डी.साठी तयार करण्यात आलेल्या २०२१ सालच्या दिशानिर्देशांमध्ये आरक्षित विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी वेगळी व्यवस्थाच केली नसल्याची बाब समोर आली.

आरक्षित विद्यार्थ्यांनादेखील सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणेच उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी ५० टक्के गुणांची अट ठेवण्यात आली. कायद्यानुसार आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पेटमध्ये यशस्वी होण्यासाठी कमीत कमी ४५ टक्के गुणांची अट ठेवायला हवी होती. २०१८ सालच्या दिशानिर्देशांत ही तरतूद होती.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्यासह इतर विद्यापीठांनी आरक्षित प्रवर्गासाठी उत्तीर्ण होण्यासाठी ४५ टक्के गुणांची अट ठेवली. असे असताना नागपूर विद्यापीठाने आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसोबत अन्याय का केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डायरेक्शन ११ ऑफ २०२१ नुसारच निकाल घोषित झाल्याचे स्पष्ट केले.

कुलगुरु म्हणतात, अन्याय नाही  

या संदर्भात कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी २०२१ सालच्या डायरेक्शन ११ मधील तरतुदी योग्य असल्याचा दावा केला. कोणत्याही विद्यार्थ्यासोबत अन्याय झालेला नाही. पेटसाठी अर्ज करण्यासाठी त्यांना गुणांच्या टक्केवारीत सूट देण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठ