शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

‘पेट’च्या पात्रता गुणांमध्ये आरक्षित प्रवर्गाला सूट नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 10:40 IST

मागील महिन्यात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ‘पेट’चे आयोजन केले होते. १६ सप्टेंबर रोजी निकाल घोषित करण्यात आले. आरक्षित प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांना ४५ ते ४९ टक्के गुण प्राप्त झाले. यासंबंधात पडताळणी केली असता विद्यापीठाद्वारे २०२१ सालच्या दिशानिर्देशांमध्ये आरक्षित विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी वेगळी व्यवस्थाच केली नसल्याची बाब समोर आली.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठातील प्रकार : सर्वांसाठी एकच मापदंड, अनेकजण अनुत्तीर्ण

आशिष दुबे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पीएच.डी. नोंदणीपूर्व प्रवेश परीक्षा असलेल्या पेटमध्ये आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसोबत अन्याय झाला आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी गुणांची कुठलीही सूट देण्यात आली नाही. त्यामुळे ‘पेट’मध्ये सहभागी झालेले अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.

‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार मागील महिन्यात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ‘पेट’चे आयोजन केले होते. १६ सप्टेंबर रोजी निकाल घोषित करण्यात आले. आरक्षित प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांना ४५ ते ४९ टक्के गुण प्राप्त झाले. यासंबंधात पडताळणी केली असता विद्यापीठाने पीएच.डी.साठी तयार करण्यात आलेल्या २०२१ सालच्या दिशानिर्देशांमध्ये आरक्षित विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी वेगळी व्यवस्थाच केली नसल्याची बाब समोर आली.

आरक्षित विद्यार्थ्यांनादेखील सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणेच उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी ५० टक्के गुणांची अट ठेवण्यात आली. कायद्यानुसार आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पेटमध्ये यशस्वी होण्यासाठी कमीत कमी ४५ टक्के गुणांची अट ठेवायला हवी होती. २०१८ सालच्या दिशानिर्देशांत ही तरतूद होती.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्यासह इतर विद्यापीठांनी आरक्षित प्रवर्गासाठी उत्तीर्ण होण्यासाठी ४५ टक्के गुणांची अट ठेवली. असे असताना नागपूर विद्यापीठाने आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसोबत अन्याय का केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डायरेक्शन ११ ऑफ २०२१ नुसारच निकाल घोषित झाल्याचे स्पष्ट केले.

कुलगुरु म्हणतात, अन्याय नाही  

या संदर्भात कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी २०२१ सालच्या डायरेक्शन ११ मधील तरतुदी योग्य असल्याचा दावा केला. कोणत्याही विद्यार्थ्यासोबत अन्याय झालेला नाही. पेटसाठी अर्ज करण्यासाठी त्यांना गुणांच्या टक्केवारीत सूट देण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठ