शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

रिझर्व्ह बँकेची आर्थिक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:08 IST

अवतीभवती सारे काही निराशाजनक, हताश व निराश करणारेच घडत असताना, सरकारने किंवा बँकांनी नेमके काय करायला हवे हे मांडण्याइतके ...

अवतीभवती सारे काही निराशाजनक, हताश व निराश करणारेच घडत असताना, सरकारने किंवा बँकांनी नेमके काय करायला हवे हे मांडण्याइतके मानसिक त्राणही सामान्यांच्या अंगात राहिले नसताना रिझर्व्ह बँकेने दिलासादायक घोषणा केल्या आहेत. वैयक्तिक तसेच लघु व मध्यम उद्योगांकडील कर्जांच्या परतफेडीला तीन महिने सवलत, त्या कर्जांची पुनर्रचना तसेच आरोग्य क्षेत्रातील उत्पादकांसाठी ५० हजार कोटींची वित्तीय तरलता ही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा हतबल झालेल्यांसाठी संजीवनी ठरावी. तिचा लाभ गृहकर्जाच्या ओझ्याखाली दबलेला नोकरदार मध्यम व निम्न मध्यमवर्ग, त्याचप्रमाणे अडचणीत आलेल्या उद्योग, व्यवसायांना होईल. २५ कोटींपर्यंतचे कर्ज फेडण्याचा कालावधी त्यांना वाढवून मिळेल. अट इतकीच आहे, की गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी देण्यात आलेल्या सवलतींचा लाभ घेताना या कर्जांची फेररचना केलेली नसावी. गेल्या मार्चअखेरीस, आर्थिक वर्ष संपताना ही कर्जखाती योग्यरीत्या सुरू असावीत.

कोरोना महामारीने माणसे केवळ शारीरिक व मानसिकदृष्ट्याच आतून-बाहेरून घुसळून निघालीत असे नाही. त्यापेक्षा मोठा फटका प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक कुटुंबाच्या बजेटलाही बसला आहे. कामधंदा, व्यवसाय बंद असल्यामुळे उत्पन्नाच्या वाटा जवळपास बंद झाल्या आहेत आणि दुसरीकडे आहार, आरोग्य यावरील खर्च कमालीचा वाढला आहे. पगारातून घर, गाडी अशी स्वप्ने सत्यात उतरविणारे, मुलाबाळांच्या संगोपनाचा व शिक्षणाचा भार त्यातूनच उचलणारे आणि मुलांमुलींचे करिअर उभे करण्याचा प्रयत्न करणारे मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय लोक या संकटात हवालदिल आहेत. खासगी उद्योगांनी त्यांचे जमाखर्चाचे ताळेबंद व्यवस्थित ठेवण्यासाठी नोकरकपात, पगारकपात, कामावर आधारित पगार असे मार्ग शोधले आहेत. त्याच्या फार तपशिलात जाण्याची गरज नाही. गोळाबेरीज इतकीच की घरात येणारा पैसा कमालीचा रोडावला आहे. दुसरीकडे बँकांच्या कर्जाचे हप्ते, मुलांच्या शिक्षणावरील खर्च हा ताण कायम आहेच. त्याशिवाय संक्रमण व त्यावरील उपचार वाट्याला आला तर कंबरडेच मोडण्याची वेळ आहे. रोगराईचा प्रकोप इतका भयंकर, की घरात कुणीतरी बाधित असलेल्या कुटुंबांची संख्या आता देशात दोन कोटींच्या पुढे गेली आहे. त्यामुळे ज्या परिवारांना उपचारासाठी खर्चाची तजवीज करावी लागते ती आर्थिक आघाडीवर बेहाल आहेत.

उद्योग व व्यवसायांची स्थिती आणखी बिकट आहे. सर्वाधिक रोजगारनिर्मिती करणाऱ्या घरबांधणी उद्योगाला मोठा फटका बसला आहे. घरांची विक्री मंदावली आहे. अन्य लघु व मध्यम उद्योग गेले वर्षभर पूर्ण क्षमतेने चालू शकलेले नाहीत. बाजारपेठा विस्कळीत आहेत. सण, उत्सव, विवाह समारंभ व अन्य उपक्रम बंद असल्यामुळे वस्तूंच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे दुकानांमधील वीज, पाणी, नोकरांचे पगार कसे भागवायचे, हा प्रश्न व्यावसायिकांपुढे तर उत्पादित मालाचे काय करायचे, हा प्रश्न छोट्या उद्योगांपुढे आ वासून उभा आहे. व्यवसाय व उद्योग जितका मोठा तितक्या त्यांच्या समस्याही मोठ्या. अशावेळी स्वाभाविकपणे बँकांनी दिलासा द्यावा, अशी मागणी होणार. तथापि, व्यावसायिक व उद्योजकदेखील अवतीभवतीचा कोरोनाचा भयंकर फैलाव, लोकांचे तडफडून मृत्यू यांमुळे इतके अस्वस्थ व हवालदिल झाले आहेत की संघटितपणे अशी काही मागणी करण्याइतकीही उसंत नाही. बँकांनी मात्र ही सर्वसामान्यांची गरज नेमकी ओळखली. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकांसोबत ज्या बैठका घेतल्या त्यातून ही गरज देशाच्या या मुख्य बँकेपर्यंत पोचली. एरव्ही, रिझर्व्ह बँकेचा त्रैमासिक ताळेबंद किंवा बँकांचे व्याजदर वगैरे मुद्यांवर पत्रकार परिषद घेणाऱ्या गव्हर्नरनी तो पायंडा मोडला आणि वैयक्तिक कर्जदार तसेच लघु व मध्यम उद्योगांकडील कर्जांवर दिलासा देणारी घोषणा केली.

यासोबतच सध्याच्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या प्रसंगांमध्ये औषधे, उपकरणे आदींचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांसाठी अर्थसाहाय्याचीही घोषणा रिझर्व्ह बँकेने केली आहे. त्यासाठी बँकांना ५० हजार कोटी रुपये पतपुरवठा जाहीर केला आहे. जीव वाचविणारी औषधे, इंजेक्शन्स, लसींचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना भांडवलाची अडचण भासू नये, ही काळजी या पतपुरवठ्याच्या रूपाने घेण्यात आली आहे. कोरोनावरील लसीइतकीच या लसीचीही गरज देशाला हाेती. ती मिळाल्याने कर्जांचा ताण कमी होऊन कर्जदारांचा आर्थिक श्वासोच्छ्वास व्यवस्थित सुरू राहील, अशी आशा आहे.

-----------------------------------