शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

सरपंचपदाचे आरक्षण गेले ५० टक्क्यांवर, ग्रामपंचायत निवडणुकीला हायकोर्टात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 12:38 IST

३ ऑक्टोबर रोजी राज्यातील दोन हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला

नागपूर : नरखेड तालुक्यातील जलालखेडाचे सरपंच गुणवंत काळे यांनी राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. नागपूरसह इतर काही जिल्ह्यांमधील सरपंचपदाचे आरक्षण ५० टक्क्यांवर गेल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

या प्रकरणावर शुक्रवारी न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने ५ मार्च व २५ नोव्हेंबर २०२० रोजी अधिसूचना जारी करून राज्यातील सरपंच पदांचे आरक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार, नागपूर जिल्ह्यातील सरपंचाची ७६८ पैकी ४३७ पदे मागासवर्गीयांसाठी आरक्षित केली गेली आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गात केवळ ३३१ पदे शिल्लक राहिली आहेत. मागासवर्गीयांचे आरक्षण ५० टक्क्यांवर गेले आहे. इतर काही जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती आहे.

सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा साहनी प्रकरणात दिलेल्या निर्णयानुसार ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिले जाऊ शकत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक घेण्यापूर्वी सरपंचपदाच्या आरक्षणामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. अक्षय नाईक व ॲड. राहुल कलंगीवाले, सरकारतर्फे ॲड. निवेदिता मेहता तर, निवडणूक आयोगातर्फे ॲड. जेमिनी कासट कामकाज पाहतील.

निवडणूक घेतली जाऊ शकत नाही

आरक्षणामध्ये सुधारणा करण्याच्या मागणीवर निर्णय होईपर्यंत ग्रामपंचायत निवडणूक घेतली जाऊ शकत नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमाला आव्हान दिले आहे. राज्य निवडणूक आयोगाने ३ ऑक्टोबर रोजी राज्यातील दोन हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यानुसार, या निवडणुकीमध्ये ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालयgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकHigh Courtउच्च न्यायालय