शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाचे आरक्षण गेले ५० टक्क्यांवर, ग्रामपंचायत निवडणुकीला हायकोर्टात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 12:38 IST

३ ऑक्टोबर रोजी राज्यातील दोन हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला

नागपूर : नरखेड तालुक्यातील जलालखेडाचे सरपंच गुणवंत काळे यांनी राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. नागपूरसह इतर काही जिल्ह्यांमधील सरपंचपदाचे आरक्षण ५० टक्क्यांवर गेल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

या प्रकरणावर शुक्रवारी न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने ५ मार्च व २५ नोव्हेंबर २०२० रोजी अधिसूचना जारी करून राज्यातील सरपंच पदांचे आरक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार, नागपूर जिल्ह्यातील सरपंचाची ७६८ पैकी ४३७ पदे मागासवर्गीयांसाठी आरक्षित केली गेली आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गात केवळ ३३१ पदे शिल्लक राहिली आहेत. मागासवर्गीयांचे आरक्षण ५० टक्क्यांवर गेले आहे. इतर काही जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती आहे.

सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा साहनी प्रकरणात दिलेल्या निर्णयानुसार ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिले जाऊ शकत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक घेण्यापूर्वी सरपंचपदाच्या आरक्षणामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. अक्षय नाईक व ॲड. राहुल कलंगीवाले, सरकारतर्फे ॲड. निवेदिता मेहता तर, निवडणूक आयोगातर्फे ॲड. जेमिनी कासट कामकाज पाहतील.

निवडणूक घेतली जाऊ शकत नाही

आरक्षणामध्ये सुधारणा करण्याच्या मागणीवर निर्णय होईपर्यंत ग्रामपंचायत निवडणूक घेतली जाऊ शकत नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमाला आव्हान दिले आहे. राज्य निवडणूक आयोगाने ३ ऑक्टोबर रोजी राज्यातील दोन हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यानुसार, या निवडणुकीमध्ये ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालयgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकHigh Courtउच्च न्यायालय