शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

घराघरातील लीडरशिपमुळे रिपब्लिकन चळवळ वाटली गेली : गंगाराम इंदिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:36 IST

रिपब्लिकन चळवळ ही घराघरातील लिडरशिपमुळे वाटली गेली आहे. चळवळीला उपजीविकेचे साधन म्हणून वापरले जात असल्यानेच चळवळीची अधोगती झाली आहे, अशी टीका आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(एकतावादी)चे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाराम ऊर्फ नाना इंदिसे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देनिवडणुका दुय्यम, संघटन मजबुतीवरच हवा भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिपब्लिकन चळवळ ही घराघरातील लिडरशिपमुळे वाटली गेली आहे. चळवळीला उपजीविकेचे साधन म्हणून वापरले जात असल्यानेच चळवळीची अधोगती झाली आहे, अशी टीका आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(एकतावादी)चे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाराम ऊर्फ नाना इंदिसे यांनी व्यक्त केली.पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविभवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी ते नागपुरात आले असता पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत मुंबईचे नगरसेवक विकास निकम, पक्षाचे महासचिव उत्तम खडसे उपस्थित होते. इंदिसे म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचे अनेक तुकडे झाले. प्रत्येक घरात लीडरशिप तयार झाल्याने ती वाटल्या गेली आहे. रिपाइंचे ऐक्य व्हावे, अशी आपली भूमिका राहिली आहे. त्यासाठी मागील अनेक वर्षांपासून आपण प्रयत्न करीत आहोत. आपल्यासाठी निवडणुका दुय्यम आहेत. संघटना मजबूत करण्यावर आपला भर असल्याने एक दिवस रिपाइंचे ऐक्य नक्कीच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समाजाच्या विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात अनेक ठराव मंजूर झाल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये ईव्हीएमने निवडणुका या पारदर्शी नसल्याने यापुढील निवडणुका या बॅलेट पेपरद्वारेच घेण्यात याव्यात, रेशन दुकानातून वाटण्यात येणाऱ्या विविध वस्तू पूर्वीप्रमाणेच वाटण्यात याव्या, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वापरण्यात येणारी बहुसदस्यीय पद्धत त्वरित रद्द करून त्याऐवजी पूर्वीची एकसदस्यीय पद्धत लागू करण्यात यावी, आदींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अ‍ॅड. राजेंद्र पाटील, भाईलाल गोहेल, प्रा. राहुल मून, बनवारीलाल सोनी, रामदास म्हात्रे, हरिदास टेंभुर्णे, नटवरलाल परमार, डॉ. सुनीलकुमार भार्गव, प्रल्हाद सोनवणे, दत्ता शिंदे, डॉ. चरणदास जनबंधू, मनोहर ओगळे आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते.रिपाइंसाठी आपला गट विसर्जित करणारविविध गटांमध्ये विभागल्या गेलेली रिपाइं ही एकसंघ राहावी. मूळ रिपब्लिकन पक्ष जो आहे, तो कायम राहावा, त्यात सर्व गटांनी एकत्र यावे, यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. त्याची सुरुवात आपण स्वत: करणार असून, मूळ रिपाइंमध्ये आपण आपला गट विसर्जित करून रिपाइंला मजबूत करणार असल्याचे इंदिसे यांनी यावेळी जाहीर केले.

टॅग्स :Politicsराजकारणnagpurनागपूर