शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

घराघरातील लीडरशिपमुळे रिपब्लिकन चळवळ वाटली गेली : गंगाराम इंदिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:36 IST

रिपब्लिकन चळवळ ही घराघरातील लिडरशिपमुळे वाटली गेली आहे. चळवळीला उपजीविकेचे साधन म्हणून वापरले जात असल्यानेच चळवळीची अधोगती झाली आहे, अशी टीका आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(एकतावादी)चे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाराम ऊर्फ नाना इंदिसे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देनिवडणुका दुय्यम, संघटन मजबुतीवरच हवा भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिपब्लिकन चळवळ ही घराघरातील लिडरशिपमुळे वाटली गेली आहे. चळवळीला उपजीविकेचे साधन म्हणून वापरले जात असल्यानेच चळवळीची अधोगती झाली आहे, अशी टीका आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(एकतावादी)चे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाराम ऊर्फ नाना इंदिसे यांनी व्यक्त केली.पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविभवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी ते नागपुरात आले असता पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत मुंबईचे नगरसेवक विकास निकम, पक्षाचे महासचिव उत्तम खडसे उपस्थित होते. इंदिसे म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचे अनेक तुकडे झाले. प्रत्येक घरात लीडरशिप तयार झाल्याने ती वाटल्या गेली आहे. रिपाइंचे ऐक्य व्हावे, अशी आपली भूमिका राहिली आहे. त्यासाठी मागील अनेक वर्षांपासून आपण प्रयत्न करीत आहोत. आपल्यासाठी निवडणुका दुय्यम आहेत. संघटना मजबूत करण्यावर आपला भर असल्याने एक दिवस रिपाइंचे ऐक्य नक्कीच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समाजाच्या विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात अनेक ठराव मंजूर झाल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये ईव्हीएमने निवडणुका या पारदर्शी नसल्याने यापुढील निवडणुका या बॅलेट पेपरद्वारेच घेण्यात याव्यात, रेशन दुकानातून वाटण्यात येणाऱ्या विविध वस्तू पूर्वीप्रमाणेच वाटण्यात याव्या, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वापरण्यात येणारी बहुसदस्यीय पद्धत त्वरित रद्द करून त्याऐवजी पूर्वीची एकसदस्यीय पद्धत लागू करण्यात यावी, आदींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अ‍ॅड. राजेंद्र पाटील, भाईलाल गोहेल, प्रा. राहुल मून, बनवारीलाल सोनी, रामदास म्हात्रे, हरिदास टेंभुर्णे, नटवरलाल परमार, डॉ. सुनीलकुमार भार्गव, प्रल्हाद सोनवणे, दत्ता शिंदे, डॉ. चरणदास जनबंधू, मनोहर ओगळे आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते.रिपाइंसाठी आपला गट विसर्जित करणारविविध गटांमध्ये विभागल्या गेलेली रिपाइं ही एकसंघ राहावी. मूळ रिपब्लिकन पक्ष जो आहे, तो कायम राहावा, त्यात सर्व गटांनी एकत्र यावे, यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. त्याची सुरुवात आपण स्वत: करणार असून, मूळ रिपाइंमध्ये आपण आपला गट विसर्जित करून रिपाइंला मजबूत करणार असल्याचे इंदिसे यांनी यावेळी जाहीर केले.

टॅग्स :Politicsराजकारणnagpurनागपूर