शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

वाहतूक पोलिसांची तक्रार करा थेट ‘कॉल सेंटर’मध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 10:34 IST

कर्तव्यात कसूर करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांची तात्काळ तक्रार करता यावी, यासाठी आता स्वतंत्र कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्तव्यात कसूर करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांची तात्काळ तक्रार करता यावी, यासाठी आता स्वतंत्र कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. जनहित याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार, वाहतूक पोलिसांनी ही नवी व्यवस्था केली आहे.शहरातील अपघाताला आळा घालण्यासाठी तैनात केलेले वाहतूक पोलीस नेमून दिलेल्या सिग्नलवर उभे न राहता दूर आडोशाला उभे राहतात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, अपघात होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांची चौकाचौकातील सिग्नलवर तैनाती केली जाते. मात्र, ते चौकाच्या बाजूला आडोशाला उभे राहतात. वाहनचालकाने नियम तोडावे आणि आपण त्याला पकडून त्याच्या खिशाचे माप घ्यावे, असा या पोलिसांचा हेतू असतो. सिग्नलवर पोलीस उभा दिसला तर कोणताही वाहनचालक नियम तोडण्याची हिंमत दाखवत नाही. मात्र, वाहतूक पोलीस सावज हेरण्याच्या उद्देशाने कर्तव्यात कसूर करीत असतात. त्यामुळे अपघात होतात अन् नाहक कुणाला जीवघेणी दुखापत होते. यासंबंधाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. रस्त्यावरील अपघाताला आळा बसावा आणि रस्ता सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासंबंधाने दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर सुनावणी करताना २० मार्च २०१९ ला उच्च न्यायालयाने तैनातीच्या ठिकाणी गैरहजर राहणाऱ्या किंवा कर्तव्यात कसूर करणाºया वाहतूक पोलिसाची नागरिकांना तात्काळ तक्रार करता यावी यासाठी स्वतंत्र कॉल सेंटर सुरू करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. त्यानुसार पोलीस नियंत्रण कक्षात वाहतूक शाखेच्या पोलिसांसंबंधीच्या तक्रारींसाठी कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्याचा दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५५५५६६ आणि २५५५५७७ असा आहे.गुणात्मक बदलाची अपेक्षाउपराजधानीत एकूण १६१ वाहतूक सिग्नल लावण्यात आले आहेत. त्यातील ८७ वाहतूक सिग्नल चौकात वर्दळीच्या वेळेत १५४ पोलीस कर्मचारी नेमले जातात. तर, सर्वसाधारण वेळेत १११ कर्मचारी नेमले जातात. वाहतूक सुरळीत राहावी, कोणताही अडथळा अथवा अपघात होऊ नये आणि वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करू नये, असा त्यामागचा हेतू असतो. मात्र, वाहतूक शाखेचे पोलीस या हेतूला हरताळ फासतात. यापुढे असे होऊ नये, वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यात गुणात्मक बदल व्हावा यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रयत्नरत आहेत. कोणत्याही चौकात, सिग्नलवर वाहतूक शाखेचे पोलीस कर्तव्यात कसूर करत असेल, निष्काळजीपणे वागत असेल, व्यवस्थीतपणे आपले कर्तव्य बजावत नसेल तर अशा पोलिसांनी कॉल सेंटरच्या संपर्क क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस