शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

रिपोर्ट द्या; अन्यथा अ‍ॅक्शन : सत्तापक्षाची मनपा प्रशासनाला तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 22:09 IST

तोतलाडोह धरणामधील पाण्याचा ‘डेड स्टॉक’ कमी झाला आहे. शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ४० ते ४५ एमएलडीने घट झाली आहे. शहरात पाण्याची समस्या आहे. नागरिक त्रस्त आहेत. सहा महिन्यापूर्वी डिसेंबर महिन्यात सभागृहात पाणीटंचाईवर चर्चा झाली. परंतु जलप्रदाय विभागाने ‘अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट’ अद्याप सादर केलेला नाही. पाणीकपात व दूषित पाण्याच्या मुद्यावर गुरुवारी सभागृहात वादळी चर्चा झाली. यामुळे सत्ता पक्षनेते संदीप जोशी नाराज झाले. २८ जूनपूर्वी सभागृहात रिपोर्ट ठेवला नाही तर शहरातील पाणीटंचाईला आयुक्तांना जबाबदार धरू, तसेच सर्वोच्च सभागृहाच्या आदेशाचे पालन न केल्याने अधिकाऱ्यांनी निलंबन कारवाईसाठी तयार राहावे, असा इशारा जोशी यांनी दिला.

ठळक मुद्देसात दिवसात रिपोर्ट न दिल्यास निलंबन : पाणीटंचाईवर विरोधक आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तोतलाडोह धरणामधील पाण्याचा ‘डेड स्टॉक’ कमी झाला आहे. शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ४० ते ४५ एमएलडीने घट झाली आहे. शहरात पाण्याची समस्या आहे. नागरिक त्रस्त आहेत. सहा महिन्यापूर्वी डिसेंबर महिन्यात सभागृहात पाणीटंचाईवर चर्चा झाली. परंतु जलप्रदाय विभागाने ‘अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट’ अद्याप सादर केलेला नाही. पाणीकपात व दूषित पाण्याच्या मुद्यावर गुरुवारी सभागृहात वादळी चर्चा झाली. यामुळे सत्ता पक्षनेते संदीप जोशी नाराज झाले. २८ जूनपूर्वी सभागृहात रिपोर्ट ठेवला नाही तर शहरातील पाणीटंचाईला आयुक्तांना जबाबदार धरू, तसेच सर्वोच्च सभागृहाच्या आदेशाचे पालन न केल्याने अधिकाऱ्यांनी निलंबन कारवाईसाठी तयार राहावे, असा इशारा जोशी यांनी दिला.तीन महिन्यानंतर आयोजित सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे व भाजपाचे धरमपाल मेश्राम यांनी स्थगन प्रस्ताव आणून पाणीटंचाईवर चर्चेची मागणी केली. चर्चेला सुरुवात झाली, परंतु सभागृहात सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना जलप्रदाय विभागातील अधिकारी समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. यामुळे विरोधकांसोबतच सत्तापक्षाने प्रशासनाला धारेवर धरले.डिसेंबर महिन्यात पाणीटंचाई निवारणासाठी चर्चा झाली होती. आता जूनचा दुसरा पंधरवडा सुरू आहे. परंतु अद्याप प्रशासनाने अ‍ॅक्शन रिपोर्ट सादर केलेला नाही. मोर्चे, धरणे व निदर्शने होत नाहीत. याचा अर्थ शहरात पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होतोय असा नाही. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा सदस्यांनी दिला.शहराला आता ७३० ऐवजी ६७० एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. चर्चेदरम्यान गुडधे व धरमपाल मेश्राम यांच्यात वारंवार खडाजंगी झाली. भाजपाचे वरिष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.शहरात समान पाणी वितरण होत नाही. चेहरा बघून पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते तानाची वनवे यांनी केला. ज्या भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे, अशा भागातील दोषी अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. पाणी गळती वेळीच रोखली असती तर १५ दिवस पुरेल इतके पाणी वाचले असते, असे मत त्यांनी मांडले. काँग्रेसचे नगरसेवक पार्षद जुल्फेकार भुट्टो यांनी मोमीनपुरा भागातील पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाwater scarcityपाणी टंचाई