शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

नागपुरातील  रोडवरचे यमदूत हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 22:17 IST

रोडवर धोकादायकरीत्या उभे असलेले विजेचे खांब व ट्रान्सफार्मर्स नागरिकांसाठी यमदूत ठरत आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक अपघात होऊन नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची गंभीर दखल घेऊन स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देविजेच्या खांबांविरुद्ध याचिका : हायकोर्टाची मनपाला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रोडवर धोकादायकरीत्या उभे असलेले विजेचे खांब व ट्रान्सफार्मर्स नागरिकांसाठी यमदूत ठरत आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक अपघात होऊन नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची गंभीर दखल घेऊन स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे.न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांनी या प्रकरणात नगर विकास विभागाचे सचिव, ऊर्जा विभागाचे सचिव, महाराष्ट्र वीज नियामक आयोग, महावितरण कंपनी, महापारेषण कंपनी, एसएनडीएल कंपनी व महापालिका यांना नोटीस बजावून १० आॅक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी या विषयावर तयार केलेल्या याचिकेमध्ये शहरातील २२ रोडवर २२ धोकादायक विजेचे खांब व ट्रान्सफार्मर्स असल्याची माहिती देण्यात आली आहे. १७ वर्षांपूर्वी एकात्मिक रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील रोड रुंद करण्यात आले. त्यामुळे विजेचे खांब व ट्रान्सफार्मस रोडवर आले. असे धोकादायक विजेचे खांब व ट्रान्सफार्मर्स तात्काळ हटविणे आवश्यक होते. परंतु, महापालिकेने यासंदर्भात अक्षम्य उदासीनता दाखवली. परिणामी, धोकादायक विजेचे खांब व ट्रान्सफार्मस्र् िआजही यमदूत बनून रोडवर उभे आहेत. याविषयी यापूर्वी दाखल करण्यात आलेली रिट याचिका उच्च न्यायालयाने २१ नोव्हेंबर २००५ रोजी निकाली काढताना रोडवरील धोकादायक विजेचे खांब व ट्रान्सफार्मर्स हटविण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्या आदेशाचे पालन करण्यात आले नाही. मनपाने न्यायालयाचा अवमान केला. तसेच, २००१ मध्ये धोकादायक विजेचे खांब व ट्रान्सफार्मर्स हटविण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्या रकमेमध्ये भ्रष्टाचार करण्यात आला. परिणामी परिस्थिती जैसे थे आहे. भविष्यातील धोके टाळण्यासाठी धोकादायक विजेचे खांब व ट्रान्सफार्मर्स तात्काळ हटविण्याचे आदेश देण्यात यावेत व जबाबदार अधिकाऱ्यांवर कायद्यानुसार करवाई करण्यात यावी, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयelectricityवीज