शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीतील खड्डे आणि अपघाताचे खटले निकाली काढा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 11:10 IST

उपराजधानीतील खड्डे आणि अपघाताचे दोन्ही खटले ३० जानेवारी २०२० पर्यंत निकाली काढावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांनी बुधवारी दिले.

ठळक मुद्देदोषारोपपत्रांसाठी ४ नोव्हेंबरपर्यंत वेळहायकोर्टाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदर व लकडगंज पोलिसांच्या हद्दीतील रोडवरील धोकादायक खड्डे व त्यामुळे झालेल्या अपघात प्रकरणातील आरोपींविरुद्ध येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्रे दाखल करण्यात यावीत व प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने हे दोन्ही खटले ३० जानेवारी २०२० पर्यंत निकाली काढावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांनी बुधवारी दिले.सदर पोलिसांनी मनपा अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध भादंविच्या कलम २८३(सार्वजनिक मार्गावर धोका), ३४१ (अवैध प्रतिरोध) व ३४ (समान उद्देश) तर, लकडगंज पोलिसांनी बीएसएनएल कंत्राटदार व टिप्पर चालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९ (सार्वजनिक रोडवर भरधाव वाहन चालवणे), ३०४-ए (निष्काळजीपणामुळे मृत्यू) व ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांचा तपास संपवून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्रे तयार केली आहेत. दोषारोपपत्रे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात दाखल झाल्यानंतर त्यांची माहिती ८ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाला देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी अ‍ॅड. आर. पी. जोशी व अ‍ॅड. आकांक्षा वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शहरामध्ये रोडवरील धोकादायक खड्ड्यांमुळे गेल्या पाच महिन्यात झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर, २९ व्यक्ती गंभीर व किरकोळ जखमी झाले. रोडवरील खड्डे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत असल्यामुळे न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च फौजदारी याचिका दाखल करून घेतली आहे. शहरात एकूण २२०१.१९ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या २९.८०, राज्य महामार्ग प्राधिकरणच्या ६.७० तर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ८४.४३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश आहे. तसेच, नागपूर सुधार प्रन्यासकडील सात योजना व गुंठेवारी क्षेत्रात काही रस्ते आहेत. यापैकी अनेक रस्त्यांवर धोकादायक खड्डे आहेत. या प्रकरणावर आता ८ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होईल. या प्रकरणात अ‍ॅड. राहिल मिर्झा न्यायालय मित्र असून, सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी तर, मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले.तक्रारींची तातडीने दखल घ्याअपघात व वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत असलेल्या धोकादायक खड्ड्यांसंदर्भात नागरिकांना लेखी तक्रारी नोंदवता याव्यात याकरिता पोलीस आयुक्तांनी जी-मेल (डीसीपीट्रॅफिकनागपूर अ‍ॅट जीमेल डॉट कॉम), व्हॉटस्अ‍ॅप (मोबाईल क्र. ९०११३८७१००) व टिष्ट्वटर (अ‍ॅट ट्रॅफिकएनजीपी) अकाऊंट सुरू केले आहे. यावर नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर त्या तक्रारी योग्य कारवाईसाठी मनपाच्या संबंधित विभागाकडे वर्ग केल्या जाणार आहेत. अशा तक्रारी मिळाल्यानंतर तीन दिवसात खड्डे बुजवण्यात यावेत असे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांना दिले आणि तीन दिवसात तक्रारीचे निराकरण न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा असे सांगितले. आवश्यक तेव्हा पोलिसांनीदेखील तक्रारी नोंदवाव्यात असे आदेश न्यायालयाने दिले.

तक्रारीसाठी मनपाचे मोबाईल अ‍ॅपनागरिकांना खड्ड्यांच्या तक्रारी नोंदवता याव्यात याकरिता महापालिका मोबाईल अ‍ॅप तयार करीत आहे. सध्या त्यांना जीमेल, टिष्ट्वटर व फेसबुकवर तक्रारी मिळत असून त्यांचे निराकरण केले जात आहे. मुख्य अभियंत्याच्या अध्यक्षतेखालील समिती खड्डे बुजवण्याच्या कारवाईचा नियमित आढावा घेत आहे. त्यात हयगय करणारे अधिकारी व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. तसेच, त्यांच्यावर फौजदारी कारवाईदेखील केली जाणार आहे. महापालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय