शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

निवडणुका आल्यामुळेच राममंदिराची आठवण : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 8:34 PM

तीन राज्यांत मिळालेल्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची अस्वस्थता वाढली आहे. १९९२ नंतर राममंदिराच्या राजकारणाने जोर पकडला. १९९६ मध्ये आम्हाला त्याचा फटकादेखील बसला. मात्र वारंवार एकच मुद्दा समोर करून यश मिळविता येत नाही. जनतेला सत्य माहीत झाले आहे. निवडणुका आल्यामुळेच भाजपाने आपल्या चुका लपविण्यासाठी राममंदिराचा मुद्दा समोर केला आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याला नागपुरातील दीक्षाभूमी येथून सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. 

ठळक मुद्देकाँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याला दीक्षाभूमीहून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन राज्यांत मिळालेल्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची अस्वस्थता वाढली आहे. १९९२ नंतर राममंदिराच्या राजकारणाने जोर पकडला. १९९६ मध्ये आम्हाला त्याचा फटकादेखील बसला. मात्र वारंवार एकच मुद्दा समोर करून यश मिळविता येत नाही. जनतेला सत्य माहीत झाले आहे. निवडणुका आल्यामुळेच भाजपाने आपल्या चुका लपविण्यासाठी राममंदिराचा मुद्दा समोर केला आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याला नागपुरातील दीक्षाभूमी येथून सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. 

पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि अमरावती विभाग येथे जनसंघर्ष यात्रेचे चार टप्पे झाले. पाचव्या टप्प्याची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींना अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर गणेश टेकडी व ताजबाग येथेदेखील दर्शन घेण्यात आले. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, नसीम खान, अनिस अहमद, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुवा प्रामुख्याने उपस्थित होते. 
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. आता निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे राजकीय हेतूने सवर्ण आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले. मात्र जनतेने मागील साडेचार वर्षांत बराच त्रास भोगला आहे. त्यामुळे सवर्ण आरक्षणाने केंद्राला निवडणुकांत फारसा फायदा होणार नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केंद्राकडून जुमलेबाजी सुरू आहे. सवर्ण आरक्षणामुळेदेखील केंद्राला निवडणुकांत फारसा फायदा होणार नाही. येत्या काही दिवसांत पंतप्रधानांची जुमलेबाजी वाढेल. राफेल प्रकरणातील अंतिम सत्य लवकरच समोर येईल, असे प्रतिपादन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.यावेळी नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे, माजी आमदार मुझफ्फर हुसैन, आशिष देशमुख, अनंत घारड, प्रदेश मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष डॉ.राजू वाघमारे, प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस रामकिशन ओझा, डॉ.बबन तायवाडे, अमोल देशमुख, प्रा.प्रकाश सोनावणे, श्याम उमाळकर, सचिव तौफिक मुल्लाणी, शाह आलम शेख यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मोदींच्या काळात जनतेची अधोगती : राधाकृष्ण विखे पाटीलतीन राज्यांत पराभव झाल्यामुळे सवर्ण आरक्षण, जीएसटीचे दर कमी करणे इत्यादी पावले केंद्र शासनाने उचलली. मात्र प्रत्यक्षात नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सामान्य जनता, शेतकरी, व्यापारी यांची अधोगतीच झाली आहे. सरकारच्या लोकविरोधी कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठीच आम्ही जनसंघर्ष करत आहोत, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्रा