शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिलासा

By admin | Updated: June 21, 2014 02:44 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या ..

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या (मुख्य शाखा) प्राचार्या डॉ. विभा महाजनी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तात्पुरता दिलासा दिला आहे. यामुळे त्या संबंधित रिट याचिका प्रलंबित असताना प्राचार्यपदी कायम राहणार आहेत. दरम्यान, त्यांना वेतन व भत्तेही मिळणार आहेत.महाजनी वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यामुळे नियमानुसार गेल्या २१ जानेवारी रोजी निवृत्त होणार होत्या. सेवेची २ वर्षे वाढवून देण्यासंदर्भातील त्यांचा दावा विद्यापीठाने फेटाळला होता. त्या १३ पैकी ७ निकष पूर्ण करीत नसल्याचे विद्यापीठाचे म्हणणे होते. विद्यापीठाने त्यांना २१ जानेवारी रोजी निवृत्तीची नोटीस पाठविली होती. याविरुद्ध महाजनी यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने गेल्या २६ फेब्रुवारी रोजी नोटीसवर स्थगनादेश दिला होता. यामुळे महाजनी वेतनाशिवाय पदावर कायम होत्या. आता न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांनी रिट याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतल्यानंतर महाजनी यांना वेतन व भत्त्यांसह पदावर कायम राहण्याची परवानगी दिली आहे.(प्रतिनिधी)मुख्यालयी जाण्यास माध्यमिक विभागाची टाळाटाळनागपूर : कामकाजाच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेची सर्व कार्यालये मुख्यालयाच्या नवीन व जुन्या इमारतीत असावी, या हेतूने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)शिवाजी जोंधळे यांनी गेल्या महिन्यात माध्यमिक शिक्षण विभागाचे कार्यालय जुन्या इमारतीत हलविण्याचे आदेश दिले आहे. परंतु या आदेशानुसार कार्यवाही न करता शिक्षण विभाग कार्यालय हलविण्याला टाळाटाळ करीत आहे. जि.प.च्या जुन्या इमारतीतील कार्यालये नवीन इमारतीत हलविण्यात आल्याने जुन्या इमारतीचा पहिला व दुसरा माळा रिकामा झाला आहे. ग्रामीण भागातील लोकांना सुविधा व्हावी यासाठी े माध्यमिक शिक्षण विभागाचे कार्यालय स्थलांतरित करण्याचे आदेश जोंधळे यांनी दिले आहे. परंतु जुन्या इमारतीत प्रशस्त जागा असली तरी या इमारतीत कार्यालय आल्यास आपल्या मर्जीनुसार कारभार करता येणार नाही. संस्था चालकांशी मनमोकळी चर्चा करता येणार नाही, अशी शंका माध्यमिक विभागातील काही अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे त्यांनी नको ती कारणे पुढे केली आहे. जुन्या इमारतीत लिफ्ट नसल्याने कामानिमित्त येणाऱ्या अपंगांची गैरसोय होईल. माध्यमिक विभागात कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने पार्किंगची असुविधा होईल, असा अफलातून शोध या विभागातील अधिकाऱ्यांनी लावला आहे. वास्तविक अपंगांचा एवढा कळवळा असेल तर विभागातील अधिकारी वा कर्मचारी कामानिमित्त येणाऱ्या अपंगांना भेटण्यासाठी तळमजल्यावर येऊ शकतात. जुन्या इमारतीत जागा अपुरी पडली तर नवीन इमारतीत पार्किगसाठी प्रशस्त जागा आहे. इच्छा नसल्याने माध्यमिक विभाग ही कारणे पुढे करीत असल्याची चर्चा आहे. शिक्षण विभागातच नव्हे तर इतर विभागातही कामानिमित्त अपंग व्यक्ती येतात. आजवर त्यांना याची अडचणी आली नाही. मग माध्यमिक विभागातील अधिकाऱ्यांनाच अपंगांची चिंता कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सीईओंचे आदेश माध्यमिक विभाग टाळत असल्याने याचा इतर विभागावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या संदर्भात जोंधळे काय भूमिका घेतात याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)