शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

घटस्फोट झाला नसताना दुसरे लग्न करणे क्रूरताच - उच्च न्यायालय 

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: December 5, 2022 14:11 IST

कायद्याचा व्यापक अर्थ मांडणारा निर्णय दिला

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात कायदेमंडळाची भूमिका लक्षात घेता भारतीय दंड विधानातील ४९८-अ कलमामधील तरतुदीचा व्यापक अर्थ मांडणारा निर्णय दिला. पतीने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नसताना तिच्या संमतीशिवाय दुसरे लग्न करणे ही क्रूरताच होय, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व महेंद्र चांदवाणी यांनी हा निर्णय दिला. कायदेमंडळाने पती व त्याच्या नातेवाइकांकडून विवाहितेचा छळ होऊ नये या भूमिकेतून भारतीय दंड विधानामध्ये ४९८-अ कलमाचा समावेश केला आहे. या कलमातील तरतुदीनुसार, विवाहित महिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होईल किंवा तिच्या जिवाला, शारीरिक अवयवांना किंवा शारीरिक-मानसिक आरोग्याला धोका उत्पन्न होईल, अशी कृती करणे क्रूरता ठरते. तसेच, मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तूंची मागणी बळजबरीने पूर्ण करण्याकरिता महिला किंवा तिच्या नातेवाइकांवर दबाव आणणेही या कलमानुसार गुन्हा आहे. पतीने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नसताना व तिची संमती नसताना दुसरे लग्न करणे, ही कृती तिच्या मानसिक आरोग्यावर आघात करणारी आहे. परिणामी, ही कृतीही कलम ४९८-अ अंतर्गतची क्रूरताच ठरते, असे न्यायालयाने निर्णयात सविस्तरपणे नमूद केले.

पतीविरुद्धचा एफआयआर रद्द करण्यास नकार

पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून नागपुरातील जरीपटका पोलिसांनी भादंविच्या कलम ४९८-अ, ४९४, ३२३, ५०६ इत्यादी गुन्ह्यांतर्गत दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी आरोपी पतीसह इतरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने त्यावर हा निर्णय दिला. तसेच, वादग्रस्त एफआयआर रद्द करण्यास नकार देऊन ही याचिका फेटाळून लावली.

२५ हजार रुपये दावा खर्च बसविला

रेकॉर्डवर ठोस पुरावे असताना एफआयआर रद्द करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केल्यामुळे याचिकाकर्त्यांवर उच्च न्यायालयाने २५ हजार रुपये दावा खर्चही बसवला. ही रक्कम चार आठवड्यांमध्ये उच्च न्यायालय विधि सेवा उपसमितीच्या बँक खात्यात जमा करण्याचा आदेश याचिकाकर्त्यांना देण्यात आला आहे. त्यांनी या आदेशाचे पालन केले नाही, तर ही रक्कम वसूल करण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देशही समिती सचिवांना देण्यात आले आहेत.

पती-पत्नीने प्रामाणिक राहणे अपेक्षित

भारतामध्ये लग्नाला संस्कार मानले जाते. लग्न करणाऱ्यांनी एकमेकांसोबत प्रामाणिक राहणे व विश्वासाने वागणे अपेक्षित असते. त्यांनी लग्न धोका ठरेल, अशा गोष्टी एकमेकांपासून लपवून ठेवायला नको. प्रामाणिकपणा, विश्वास व प्रेम नसेल तर कोणतेही लग्न टिकू शकत नाही, असे मतसुद्धा न्यायालयाने व्यक्त केले. आरोपी पतीने दुसऱ्या पत्नीला पहिल्या पत्नीचे निधन झाल्याची खोटी माहिती दिली होती. त्यामुळे पतीने दोन्ही महिलांचा विश्वासघात केला, असे ताशेरेदेखील न्यायालयाने ओढले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयmarriageलग्न