शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

घटस्फोट झाला नसताना दुसरे लग्न करणे क्रूरताच - उच्च न्यायालय 

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: December 5, 2022 14:11 IST

कायद्याचा व्यापक अर्थ मांडणारा निर्णय दिला

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात कायदेमंडळाची भूमिका लक्षात घेता भारतीय दंड विधानातील ४९८-अ कलमामधील तरतुदीचा व्यापक अर्थ मांडणारा निर्णय दिला. पतीने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नसताना तिच्या संमतीशिवाय दुसरे लग्न करणे ही क्रूरताच होय, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व महेंद्र चांदवाणी यांनी हा निर्णय दिला. कायदेमंडळाने पती व त्याच्या नातेवाइकांकडून विवाहितेचा छळ होऊ नये या भूमिकेतून भारतीय दंड विधानामध्ये ४९८-अ कलमाचा समावेश केला आहे. या कलमातील तरतुदीनुसार, विवाहित महिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होईल किंवा तिच्या जिवाला, शारीरिक अवयवांना किंवा शारीरिक-मानसिक आरोग्याला धोका उत्पन्न होईल, अशी कृती करणे क्रूरता ठरते. तसेच, मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तूंची मागणी बळजबरीने पूर्ण करण्याकरिता महिला किंवा तिच्या नातेवाइकांवर दबाव आणणेही या कलमानुसार गुन्हा आहे. पतीने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नसताना व तिची संमती नसताना दुसरे लग्न करणे, ही कृती तिच्या मानसिक आरोग्यावर आघात करणारी आहे. परिणामी, ही कृतीही कलम ४९८-अ अंतर्गतची क्रूरताच ठरते, असे न्यायालयाने निर्णयात सविस्तरपणे नमूद केले.

पतीविरुद्धचा एफआयआर रद्द करण्यास नकार

पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून नागपुरातील जरीपटका पोलिसांनी भादंविच्या कलम ४९८-अ, ४९४, ३२३, ५०६ इत्यादी गुन्ह्यांतर्गत दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी आरोपी पतीसह इतरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने त्यावर हा निर्णय दिला. तसेच, वादग्रस्त एफआयआर रद्द करण्यास नकार देऊन ही याचिका फेटाळून लावली.

२५ हजार रुपये दावा खर्च बसविला

रेकॉर्डवर ठोस पुरावे असताना एफआयआर रद्द करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केल्यामुळे याचिकाकर्त्यांवर उच्च न्यायालयाने २५ हजार रुपये दावा खर्चही बसवला. ही रक्कम चार आठवड्यांमध्ये उच्च न्यायालय विधि सेवा उपसमितीच्या बँक खात्यात जमा करण्याचा आदेश याचिकाकर्त्यांना देण्यात आला आहे. त्यांनी या आदेशाचे पालन केले नाही, तर ही रक्कम वसूल करण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देशही समिती सचिवांना देण्यात आले आहेत.

पती-पत्नीने प्रामाणिक राहणे अपेक्षित

भारतामध्ये लग्नाला संस्कार मानले जाते. लग्न करणाऱ्यांनी एकमेकांसोबत प्रामाणिक राहणे व विश्वासाने वागणे अपेक्षित असते. त्यांनी लग्न धोका ठरेल, अशा गोष्टी एकमेकांपासून लपवून ठेवायला नको. प्रामाणिकपणा, विश्वास व प्रेम नसेल तर कोणतेही लग्न टिकू शकत नाही, असे मतसुद्धा न्यायालयाने व्यक्त केले. आरोपी पतीने दुसऱ्या पत्नीला पहिल्या पत्नीचे निधन झाल्याची खोटी माहिती दिली होती. त्यामुळे पतीने दोन्ही महिलांचा विश्वासघात केला, असे ताशेरेदेखील न्यायालयाने ओढले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयmarriageलग्न