शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
5
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
6
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
7
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
8
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
9
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
10
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
11
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
12
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
13
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
14
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
15
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
16
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
17
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
18
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
19
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
20
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

घटस्फोट झाला नसताना दुसरे लग्न करणे क्रूरताच - उच्च न्यायालय 

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: December 5, 2022 14:11 IST

कायद्याचा व्यापक अर्थ मांडणारा निर्णय दिला

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात कायदेमंडळाची भूमिका लक्षात घेता भारतीय दंड विधानातील ४९८-अ कलमामधील तरतुदीचा व्यापक अर्थ मांडणारा निर्णय दिला. पतीने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नसताना तिच्या संमतीशिवाय दुसरे लग्न करणे ही क्रूरताच होय, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व महेंद्र चांदवाणी यांनी हा निर्णय दिला. कायदेमंडळाने पती व त्याच्या नातेवाइकांकडून विवाहितेचा छळ होऊ नये या भूमिकेतून भारतीय दंड विधानामध्ये ४९८-अ कलमाचा समावेश केला आहे. या कलमातील तरतुदीनुसार, विवाहित महिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होईल किंवा तिच्या जिवाला, शारीरिक अवयवांना किंवा शारीरिक-मानसिक आरोग्याला धोका उत्पन्न होईल, अशी कृती करणे क्रूरता ठरते. तसेच, मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तूंची मागणी बळजबरीने पूर्ण करण्याकरिता महिला किंवा तिच्या नातेवाइकांवर दबाव आणणेही या कलमानुसार गुन्हा आहे. पतीने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नसताना व तिची संमती नसताना दुसरे लग्न करणे, ही कृती तिच्या मानसिक आरोग्यावर आघात करणारी आहे. परिणामी, ही कृतीही कलम ४९८-अ अंतर्गतची क्रूरताच ठरते, असे न्यायालयाने निर्णयात सविस्तरपणे नमूद केले.

पतीविरुद्धचा एफआयआर रद्द करण्यास नकार

पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून नागपुरातील जरीपटका पोलिसांनी भादंविच्या कलम ४९८-अ, ४९४, ३२३, ५०६ इत्यादी गुन्ह्यांतर्गत दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी आरोपी पतीसह इतरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने त्यावर हा निर्णय दिला. तसेच, वादग्रस्त एफआयआर रद्द करण्यास नकार देऊन ही याचिका फेटाळून लावली.

२५ हजार रुपये दावा खर्च बसविला

रेकॉर्डवर ठोस पुरावे असताना एफआयआर रद्द करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केल्यामुळे याचिकाकर्त्यांवर उच्च न्यायालयाने २५ हजार रुपये दावा खर्चही बसवला. ही रक्कम चार आठवड्यांमध्ये उच्च न्यायालय विधि सेवा उपसमितीच्या बँक खात्यात जमा करण्याचा आदेश याचिकाकर्त्यांना देण्यात आला आहे. त्यांनी या आदेशाचे पालन केले नाही, तर ही रक्कम वसूल करण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देशही समिती सचिवांना देण्यात आले आहेत.

पती-पत्नीने प्रामाणिक राहणे अपेक्षित

भारतामध्ये लग्नाला संस्कार मानले जाते. लग्न करणाऱ्यांनी एकमेकांसोबत प्रामाणिक राहणे व विश्वासाने वागणे अपेक्षित असते. त्यांनी लग्न धोका ठरेल, अशा गोष्टी एकमेकांपासून लपवून ठेवायला नको. प्रामाणिकपणा, विश्वास व प्रेम नसेल तर कोणतेही लग्न टिकू शकत नाही, असे मतसुद्धा न्यायालयाने व्यक्त केले. आरोपी पतीने दुसऱ्या पत्नीला पहिल्या पत्नीचे निधन झाल्याची खोटी माहिती दिली होती. त्यामुळे पतीने दोन्ही महिलांचा विश्वासघात केला, असे ताशेरेदेखील न्यायालयाने ओढले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयmarriageलग्न