शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

धर्म नेहमीच न्यायसंगत नसतो - सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:06 IST

मूल्य निष्ठा त्यागाच्या दिशेने जाणाऱ्या असतात तर धर्मनिष्ठा समूह आणि जातीच्या दिशेने जाणाऱ्या असतात. मात्र न्याय निष्ठा त्यागाच्या दिशेने जाणाऱ्या असतात. असे असले तरी धर्म हा नेहमीच न्यायाची भूमिका घेत नसतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देयुगांतर व्याख्यानमाला : ‘न्याय’ विषयावर तिसरे प्रवचन पुष्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मूल्य निष्ठा त्यागाच्या दिशेने जाणाऱ्या असतात तर धर्मनिष्ठा समूह आणि जातीच्या दिशेने जाणाऱ्या असतात. मात्र न्याय निष्ठा त्यागाच्या दिशेने जाणाऱ्या असतात. असे असले तरी धर्म हा नेहमीच न्यायाची भूमिका घेत नसतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राच्या वतीने युगांतर व्याख्यानमाला अंतर्गत प्रा. द्वादशीवार यांचे ‘न्याय’ या विषयावर तिसरे प्रवचनपुष्प मंगळवारी पार पडले. त्याप्रसंगी त्यांनी साक्रेटिस आणि प्लेटो यांच्या न्यायासंदर्भातील संकल्पाना सांगितल्या. फॅसिमॉकस हा विचारवंत सत्ताधारी सांगतील तोच न्याय, असे म्हणतो. त्याच्या बाजूने बोलणारे न्यायी, विरोधात बोलणारे देशद्रोही ठरतात. कॅसिकल्स तत्वज्ञही हेच सांगतो. प्लेटोच्या राज्यकर्ता होण्याच्या संकल्पना वेगळ्या आहेत. त्यानुसार धर्म नेहमीच न्यायाची भूमिका घेत नाही. साक्रेटिकसच्या न्याय संकल्पना गुणवत्ता असेल तरच टिकेल, असे सांगते. त्यामुळे गुणवता  ही  सन्मानाचा विषय झाली पाहिजे.ते म्हणाले, घटना जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तयार झाली आहे. न्यायाचा विचार करताना व्यक्ती सर्व श्रेष्ठ आहे. जगात १४ हजार युद्ध झालीत, त्यामध्ये लाखो माणसे मारल्या गेली. १६ कोटी ९० लाख वैचारिक दुराग्रहापोटी मारली गेलीत. इच्छा व वासना संपल्यावर युद्ध करण्यास आपले तत्वज्ञान सांगते. खरे तर त्यानंतर युद्धाची इच्छाच राहात नाही. म्हणूनच कुरूक्षेत्रावर सांगितलेली भगवत्गीता हा युद्ध सांगणारा ग्रंथ नसून अहिंसा सांगणारा ग्रंथ ठरतो.न्याय ही माणसाला मिळालेली संजीवनी आहे. याचं संजीवनीच्या आधारावर माणूस जगत असतो. आपण ज्या विचारांनी जगतो, त्याची चिकित्सा कधी करत नाही. माणूस म्हणून एकारलेपणाचा विचार करणे हाच न्यायाचा खरा मार्ग आहे.न्याय व्यवस्थेत समतोल साधला पाहिजे. नागरिकांना घटनादत्त अधिकार आहेत. ते निर्माण करणारी व्यवस्था राज्यांनी निर्माण करायला हवी. कोणताही धर्म स्त्रियांना न्याय देत नाही, ईश्वर सुद्धा नाही. आपली गुणवत्ता निर्माण करणे, गुणवत्ता मानणे हा न्याय आहे. न्याय व्यवस्थेत समतोल साधला पाहिजे. घटनेने नागरिकांना अधिकार दिले आहेत. ते निर्माण करण्याची व्यवस्था राज्यांनी निर्माण करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या व्याख्यानाला माजी न्यायमूर्ती विकास शिरपूरकर, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, साहित्यिक महेश एलकुंचवार, गिरीष गांधी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूरliteratureसाहित्य