शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कडक उन्हापासून दिलासा; विद्यार्थिनींनी तयार केली पक्ष्यांसाठी घरटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 08:00 IST

Nagpur News सेवादल महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पक्ष्यांसाठी घरटी बनवून ती वितरित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

निशांत वानखेडे

नागपूर : उन्हाच्या झळा माणसांप्रमाणे मुक्या पक्ष्यांनाही बसत आहेत. त्यांच्याप्रती नागपूरकरांमध्येही संवेदना आहेत. म्हणूनच अनेकांच्या घरी पक्ष्यांसाठी घरटी व पाण्याची व्यवस्था केलेली दिसते. असा एक सामूहिक प्रयाेग सेवादल महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी चालविला आहे. पाण्यासाठी मातीचे भांडे आणि स्वत: तयार केलेले घरटे लाेकांच्या घरी वितरित करण्यासह झाडे असलेल्या ठिकाणी लावण्याचे कामही या विद्यार्थिनी करीत आहेत.

प्रा. प्रवीण चरडे यांच्या मार्गदर्शनात गेल्या काही वर्षांपासून महाविद्यालयातर्फे हा प्रयाेग सुरू आहे. या माध्यमातून विद्यार्थिनी स्वत: लाकडाचे घरटे तयार करतात, मातीचे भांडे घेतात व ते लाेकांच्या घरी देतात. यावर्षीही या विद्यार्थिनींनी हा प्रयाेग चालविला आहे. प्रा. चरडे यांनी सांगितले, या विद्यार्थिनींनी मेडीकल, विद्यापीठाचा परिसर तसेच सिव्हील लाईन्सच्या परिसरात झाडांवर ही घरटी टांगली आहेत व मातीचे भांडे अडकविले आहेत. त्या भांड्यात पाणी आणि धान्य ठेवण्याचे कामही त्या करतात. गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणी यशस्वी प्रयाेग केल्याचे त्यांनी सांगितले.

रद्दी विकून निधी गाेळा

प्रा. चरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी १ ते १० ऑक्टाेबरदरम्यान काॅलेजतर्फे वन्यजीव सप्ताह साजरा केला जाताे. या काळात काॅलेजचे प्राध्यापक व विद्यार्थिनी घरून रद्दी गाेळा करतात. त्यानंतर ती विकली जाते. त्यातून २० ते २५ हजार रुपयांचा निधी उभा केला जाताे. त्यातून लाकडे विकत आणून किंवा पडलेले गाेळा करून त्याद्वारे घरटी तयार केली जातात. मातीची भांडी घेतली जातात.

राजभवनात माेराचे रेस्टाॅरेंट

काॅलेजच्या एका प्रयाेगाअंतर्गत राजभवन येथे माेरासाठी रेस्टारेंट तयार करण्यात आले. दर महिन्याला १०० ते १५० किलाे धान्य गाेळा करून येथे दिले जाते. या रेस्टारेंटमध्ये इतर पक्ष्यांचीही मेजवानी हाेत आहे.

चिमण्यांसाठी विशेष प्रजनन प्रयाेग

काॅलेजचा सर्वात विशेष प्रयाेग चिमण्यांसाठीचा आहे. प्रा. चरडे यांनी सांगितले, काॅलेजच्या नरसाळा येथील वसतिगृहात ३०-४० घरटी लावण्यात आली. ही सर्व घरटी चिमण्यांच्या गर्दीने फुलली आहेत. या घरट्यांमध्ये चिमण्यांचे यशस्वी प्रजनन हाेत असून त्यांच्यावर अभ्यास केला जात आहे. सिंगापूरचा झुरांग पार्क व इजराईलमधील पार्कच्या धर्तीवर हा प्रयाेग सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी पुन्हा १०० घरटी तयार करून पावसाळ्यात ती लावण्यात येणार असल्याचेही प्रा. चरडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Socialसामाजिक