शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

नुकसानभरपाईचा तिढा कायम

By admin | Updated: July 7, 2014 01:00 IST

तालुक्यात गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. यासाठी शासनाने २२ हजार ६२४ शेतकऱ्यांना पात्र ठरवित १४ कोटी ७० लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली.

अतिवृष्टीमुळे नुकसान : एक हजार शेतक ऱ्यांचे ५१ लाख २१ हजार रुपये बँकेत पडून उमरेड : तालुक्यात गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. यासाठी शासनाने २२ हजार ६२४ शेतकऱ्यांना पात्र ठरवित १४ कोटी ७० लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली. यातील एक हजार शेतक ऱ्यांचे ५१ लाख २१ हजार रुपयांचे धनादेश बँकेत पडून आहे.महसूल व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण केले. त्या अनुषंगाने महसूल विभागाने या पात्र शेतकऱ्यांना या नुकसानभरपाईची रक्कम धनादेशाच्या माध्यमातून वितरित केली. परंतु, शेतकऱ्यांच्या बँक खाते क्रमांक व नावातील घोळ चव्हाट्यावर आल्याने संबंधित धनादेश वटण्यास अडथळे निर्माण झाले. त्यामुळे बँकांनी सदर धनादेश तहसील कार्यालयात परत पाठविले. या संपूर्ण प्रकाराला स्थानिक तलाठी जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते क्रमांक व बँकेचे नाव व्यवस्थित न दिल्याने हा घोळ झाल्याचे महसूल विभागातील अधिकारी सांगतात.काही शेतकऱ्यांचे धनादेश महसूल विभागाने नागपूर येथील विदर्भ कोकण बँक, गांधीबाग येथे पाठविले होते. संबधित शेतकऱ्यांचे या बँकेत खाते नसल्याने ते धनादेश परत पाठविण्यात आले. अशाच प्रकारचा घोळ उमरेड शहरातील इतर बँकेत सुरू आहे. हा तिढा सोडविण्यासाठी ज्या बँकेचा धनादेश तयार करण्यात आला, त्या बँकेत संबंधित शेतकऱ्यांनी त्यांचे खाते उघडावे, असा तगादा महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे लावला असल्याचे काहींनी सांगितले. या संदर्भात महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक व बँकेचे नाव शाखा लिहिताना तलाठ्यांची गफलत झाल्याचे त्यांनी मान्य केले. संयुक्त खातेदार असल्यास ज्या शेतकऱ्याच्या नावे शेतीचा सातबारा आहे, त्यांच्याच नावे धनादेश देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. परिणामी, सातबारा हा मृत शेतकऱ्याच्या नावे असल्यास (नोंदीअभावी) त्याच्या वारसांना ही रक्कम मिळविण्यासाठी कागदी घोडे नाचवित कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. सध्या पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यातच धनादेशाचे नवे संकट निर्माण झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)