शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

महेश भट यांच्या हस्ते 'प्यार का राग सुनो' पुस्तकाचे प्रकाशन

By संजय घावरे | Updated: March 13, 2024 19:47 IST

हिंदी सिनेसृष्टीतील काही अभिनेत्यांनी आपल्या बहारदार अभिनयशैलीने रसिकांवर मोहिनी घालण्याचे काम केले आहे.

मुंबई- हिंदी सिनेसृष्टीतील काही अभिनेत्यांनी आपल्या बहारदार अभिनयशैलीने रसिकांवर मोहिनी घालण्याचे काम केले आहे. देव आनंद, शम्मी कपूर, राजेश खन्ना, ऋषी कपूर, शाहरुख खान या सुपरस्टार्सची सिनेप्रेमींमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यांच्या लोकप्रियतेचे गमक उलगडणाऱ्या 'प्यार का राग सुनो' या पुस्तकाचे प्रकारशन ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट यांच्या हस्ते करण्यात आले आहे. विले पार्ले येथील लोकमान्य सेवा संघ आणि एजेस फेडरलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात 'प्यार का राग सुनो' हे द्वारकानाथ संझगिरी, मीना कर्णिक आणि हेमंत कर्णिक लिखित पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या सोहळ्याला ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

यावेळी मीना कर्णिक आणि द्वारकानाथ संझगिरी यांनी पुस्तक तयार करतानाचे अनुभव सांगितले. संझगिरी पहिल्यापासून देव आनंदचे चाहते आहेत. मीना कर्णिक यांनी मागील दोन वर्षांमध्ये देव आनंद यांचे सिनेमे बघितले. त्यांना शाहरुख आणि देव आनंदमध्ये बऱ्याच गोष्टी सारख्या वाटल्या. हा धागा पकडून पुस्तक लिहायचे नक्की झाल्यावर राज कपूर यांचे चाहते असलेले मीना यांचे बंधू हेमंत कर्णिक सोबतीला आले. तिघांनी चर्चा, संवाद आणि अभ्यासाद्वारे 'प्यार का राग सुनो' लिहिले आहे. यात देव आनंद ते शाहरुखपर्यंतचा रोमँटिक प्रवास उलगडला आहे. शम्मी, शशी, ऋषी हे तीन कपूर आणि राजेश खन्नांचाही परामर्ष घेतला गेला आहे. नूतन आसगावकर यांनी या पुस्तकासाठी खूप मेहनत घेतली असून, गौतम राजाध्यक्ष यांनी काढलेल्या छायाचित्रांमुळे पुस्तक अधिकच सुंदर बनले आहे. 'प्यार का राग सुनो' हे पुस्तक आणि विषय आवडल्याचे सांगत महेश भट म्हणाले की, स्वातंत्र्य मिळाल्यावर सगळीकडेच आनंद, जिव्हाळा, आपुलकी, प्रेम आणि पवित्र वातावरण होते. त्यातून  प्रतिभाशाली निर्माते, दिग्दर्शक आणि सिने तारे-तारका यांनी एक खास वातावरण तयार केले. त्यात निरागसता होती. चित्रपट असोशीने काढले जात होते. प्रेम आणि प्रणयाला प्राधान्य दिले जात होते. या पुस्तकातील नायकांमधील देव आनंद, राजेश, ऋषी आणि शाहरुख यांच्यासोबत मी वावरलो आहे. त्यांचे वलय अनुभवले आहे. माझ्या आईला चित्रपट आणि गाण्यांचे खूप वेड होते. मला त्याचे नवल वाटायचे. ती म्हणायची तू जेव्हा वयात येशील तेव्हा तुला हे वेड समजेल आणि पुढे तसेच झाले. मला वाटते की, तो काळ परत आणायला हवा. त्यादृष्टीने हे पुस्तक प्रेरणादायी वाटते. 'प्यार का राग सुनो...' या लोकप्रिय गाण्यावर आधारलेले शीर्षक असलेले हे पुस्तक सर्वाना आवडेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

पुस्तक प्रकाशनानंतर पाच हीरोंसह शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची काही गाणी सादर केली गेली. राजेश आजगावकर आणि द्वारकानाथ संझगिरी यांनी निवेदन करत आणि दृकश्राव्य माध्यमातून गाण्यांना उठाव आणला. राणा चटर्जी, डॉ. जय आजगावकर आणि प्राजक्त सातर्डेकर यांनी गाणी सादर केली. संजय मराठे आणि वादकांनी साथ केली. लोकमान्य सेवा संघाने १०१वा वर्धापन दिन साजरा करत हे पहिले पुष्प रसिकांना अर्पण केले.

टॅग्स :nagpurनागपूरMahesh Bhatमहेश भट