शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

संघ स्मृतिमंदिरात ‘इफ्तार’ला नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 12:11 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत मुस्लीम राष्ट्रीय मंचकडून ‘रमजान’च्या निमित्ताने देशभरातील विविध ठिकाणी ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात येत आहे. संघ स्मृतिमंदिर परिसरातदेखील ‘इफ्तार’चे आयोजन करण्याची विनंती मंचकडून करण्यात आली होती. मात्र संघ पदाधिकाऱ्यांनी ही विनंती फेटाळून लावली. एकीकडे सामाजिक समरसतेचे सूत्र घेऊन देशभरात कार्यविस्तार सुरू असताना ‘इफ्तार’ला नकार देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकशी वाढणार समरसता? : मुस्लीम राष्ट्रीय मंचची विनंती फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत मुस्लीम राष्ट्रीय मंचकडून ‘रमजान’च्या निमित्ताने देशभरातील विविध ठिकाणी ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात येत आहे. संघ स्मृतिमंदिर परिसरातदेखील ‘इफ्तार’चे आयोजन करण्याची विनंती मंचकडून करण्यात आली होती. मात्र संघ पदाधिकाऱ्यांनी ही विनंती फेटाळून लावली. एकीकडे सामाजिक समरसतेचे सूत्र घेऊन देशभरात कार्यविस्तार सुरू असताना ‘इफ्तार’ला नकार देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.मुस्लीम समुदायाशी फारसे जुळवून घेत नाही, अशा पद्धतीचा सर्वसाधारण समज आहे. हा समज खोडून काढण्यासाठी मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे गेल्या काही काळापासून ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे देशातील अनेक भागात संघाचे पदाधिकारीदेखील यात सहभागी होताना दिसून आले. अगदी नागपुरातदेखील मागील वर्षी ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात आले होते. यंदा हा कार्यक्रम संघ स्मृतिमंदिरात व्हावा, अशी मंचच्या पदाधिकाºयांची इच्छा होती. यामुळे जगभरात एकतेचा संदेश जाईल, ही त्यामागची भावना होती. मात्र संघ पदाधिकाऱ्यांनी ही विनंती फेटाळून लावली.शहरात दोन ठिकाणी झाले आयोजनसंघ स्मृतिमंदिरात आयोजनाची विनंती नाकारण्यात आल्यानंतर मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे नागपुरात दोन ठिकाणी ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात आले. २४ मे रोजी बुद्धूखां मिनार, गांधीबाग येथे तर १ जून रोजी संजीवनीनगर कॉलनी, यशोधरानगर येथे हे आयोजन करण्यात आले. मंचचे राष्ट्रीय संयोजक विराग पाचपोर, महाराष्ट्र प्रदेश संयोजक मोहम्मद फारुक शेख, युवा प्रकोष्ट संयोजक दिवानशाद अली, नागपूर संयोजक रियाज अहमद खान, शाहिद खान, फरह वासीम हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते....तर गेला असता मजबूत संदेशयासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश संयोजक मोहम्मद फारुक शेख यांना संपर्क केला असता त्यांनी अशाप्रकारची विनंती केल्याचे मान्य केले. संघ स्मृतिमंदिरमध्ये कार्यक्रम झाला असता तर सामाजिक समरसतेचा संदेश जगामध्ये गेला असता. मात्र आम्ही ज्या पदाधिकाऱ्यांजवळ गेलो, त्यांनी आमच्या विनंतीचा विचार केला. मात्र आम्हाला परवानगी मिळू शकली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘इफ्तार’ला विरोध नाहीच. परंतु सद्यस्थितीत रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात संघाचा तृतीय वर्ष वर्ग सुरू आहे. त्यामुळे येथे ‘इफ्तार’चे आयोजन करणे शक्य झाले नसते. संघाचा असे मत एका संघ पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRamzanरमजान