शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

नागपुरातील विमा रुग्णालयात चतुर्थ कर्मचारी करतो रजिस्ट्रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:47 AM

कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात औषधांचा तुटवडा, यंत्रसामुग्रीचा अभाव व रिक्त पदांमुळे आता रुग्णालय प्रशासनही अडचणीत आले आहे.

ठळक मुद्देअल्प कर्मचाऱ्यांमुळे प्रशासनाचे कामकाज प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात औषधांचा तुटवडा, यंत्रसामुग्रीचा अभाव व रिक्त पदांमुळे आता रुग्णालय प्रशासनही अडचणीत आले आहे. ज्युनिअर क्लार्कच्या १९ जागा मंजूर असताना केवळ सहाच कर्मचारी आहेत. त्यांच्या मदतीला चार कर्मचाऱ्यांना उसनवारी तत्त्वावर देण्यात आले आहे. अल्प कर्मचाऱ्यांमुळे रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांचे रजिस्ट्रेशनची जबाबदारी चतुर्थ कर्मचाऱ्यांवर देण्यात आली आहे.सोमवारीपेठेतील या विमा रुग्णालयाशी तीन लाख कामगार जुळलेले आहेत. त्यांचे कुटुंब धरून सुमारे १२ लाख व्यक्तींच्या आरोग्याची जबाबदारी या रुग्णालयावर आहे. या कामगारांकडून वर्षाला कोट्यवधी रुपये रुग्णालयाला मिळतात. याच पैशांतून रुग्णालयातील डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांचे पगारही होतात. परंतु गेल्या दीड वर्षांपासून असलेला औषधांचा तुटवडा, मोजकेच डॉक्टर, आऊटसोर्सिंग केलेल्या चाचण्या यामुळे कामगार रुग्णांना दुसऱ्या इस्पितळात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत.विशेष म्हणजे, रुग्णालय प्रशासनाचा कणा असलेल्या ज्युनिअर क्लार्कची मंजूर पदेही भरण्यात आलेली नाहीत. तब्बल १३ पदे रिक्त आहेत. सहा कायमस्वरूपी क्लार्कवर तीन लाख कामगारांची भिस्त आहे. त्यांच्या मदतीला गेल्या वर्षी सहा जणांना उसनवारी तत्त्वावर पाठविण्यात आले होते. परंतु जानेवारी महिन्यात या सहाही जणांना परत बोलावून घेतले. यामुळे कामकाज चांगलेच प्रभावित झाले. याची माहिती वरिष्ठांना दिल्यावर त्यांनी पुन्हा चार जणांना ३१ मेपर्यंत उसनावारी तत्त्वावर दिले आहे.रुग्णालयात सोयी नसल्याने येथील रुग्ण खासगीमध्ये जाऊन औषधोपचार करतात. त्याचे बिल कार्यालयात पाठवितात. परंतु अल्प कर्मचाऱ्यांमुळे बिलाचे पैसे मिळण्याकरिता आठ ते नऊ महिन्यावर कालावधी लागत आहे. दहाच कर्मचारी असल्याने रुग्णालयाचे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांचे रजिस्ट्रेशन करण्यास हाताशी कर्मचारी नाहीच. चतुर्थ कर्मचाऱ्यांचा तुटवडा असताना त्यांचे एक काम कमी करून त्यांना रुग्णांच्या रजिस्ट्रेशनसाठी बसविले जात आहे. या कर्मचाऱ्यांच्या कमी शिक्षणामुळे अनेकांची नावे चुकीची लिहिली जात असल्याच्याही तक्रारी आहेत.

समस्या मार्गी लावण्यासाठी उरला एकच महिनानागपूरच्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील पदे, यंत्रसामुग्री व औषधांच्या तुटवड्याची समस्या वेळीच सोडविली असती तर ही वेळ आली नसती, असे स्पष्ट मत राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त ए.बी. धुळाज यांनी जानेवारी महिन्यात या रुग्णालयाला दिलेल्या भेटीत व्यक्त केले होते. पुढील चार महिन्यात या सर्व समस्या मार्गी लागतील, अशी कबुलीही दिली होती. परंतु मागील तीन महिन्यात यातील एकही समस्या सुटलेली नाही. उरलेल्या एक महिन्यात यातील किती समस्या सुटतील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य