शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या तेलातील समोसा नकोच! पुनर्वापर झालेले तेल बाझो-डिझेलनिर्मिती कंपनीला द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 19:53 IST

Nagpur News अनेक घरांत तळणीसाठी वापरलेले तेल उरल्यानंतर ते अनेकदा फोडणी किंवा इतर कोणत्याही प्रकारे वापरात आणले जाते, पण एकदा वापरून झाल्यावर उरलेल्या तेलाचा असा पुनर्वापर करणे आरोग्याला घातक ठरू शकतो.

ठळक मुद्देखाद्यतेलाचा वारंवार वापर गुन्हाचहोऊ शकतो कॅन्सर

नागपूर: भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये तेलाचे महत्त्व खूप जास्त आहे. तेलामुळे जेवण स्वादिष्ट आणि चवदार बनते. अनेक घरांत तळणीसाठी वापरलेले तेल उरल्यानंतर ते अनेकदा फोडणी किंवा इतर कोणत्याही प्रकारे वापरात आणले जाते, पण एकदा वापरून झाल्यावर उरलेल्या तेलाचा असा पुनर्वापर करणे आरोग्याला घातक ठरू शकतो.

वापर केलेल्या तेलाचा पुन्हा वापर करणे हा गुन्हा आहे. असे असताना हॉटेलमध्ये या तेलाचा सर्रास वापर केला जातो. यामुळे असे पदार्थ खाणाऱ्यांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. या तेलामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे काळ्या तेलातील समोसा नकोच! तेलाचा पुनर्वापर अन्न व सुरक्षा कायद्यानुसार नियमबाह्य आहे.

तेलातील टीपीसी २५ डिग्रीपेक्षा कमी असावा

उकळलेल्या तेलातील टोटल पोलर इंडेक्स (टीपीसी) हा २५ डिग्रीपेक्षा कमी असावा. २५ डिग्रीपेक्षा जास्त असल्यास तेल तळण्यासाठी वा खाण्यासाठी योग्य ठरत नाही. अशा तेलाचा पुनर्वापर न करता, बाझो-डिझेलची निर्मिती करणाऱ्या कंपनीला विकावे, असा अन्न व औषध प्रशासन विभागाचा नियम आहे.

तेल किती वेळा वापरावे?

हॉटेलपेक्षा हातठेल्यावर खाद्यपदार्थ स्वस्त असल्यामुळे अनेक जण उघड्यावर समोसे, कचोरी आणि इतर पदार्थ आवडीने खातात. या ठिकाणी तेलाचा अनेकदा पुनर्वापर केला जातो. तेलाचा रंग काळा पडेपर्यंत त्याचा वारंवार वापर केला जातो. उकळलेले तेल तळण्यासाठी दोन किंवा तीनदा वापरावे.

काळसर तेलात तळलेले पदार्थ हानिकारक

काळसर तेलातून तळलेल्या पदार्थांमुळे अनेकांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक असतो. एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरल्यावर कॅन्सर, ॲसिडिटी, हृदयासंबंधित आजार, अल्झायमर, पार्किंसन्सचे आजार आणि घशाची जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

पाच महिन्यांत २२ नमुने तपासले

अन्न व औषध प्रशासन विभागाने पाच महिन्यांत तेलाचे २२ नमुने घेतले असून, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी काही नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली आहे.

काळे तेल वापराल तर होईल दंड

शक्यतो हातठेल्यावर तळलेले पदार्थ लोकांनी टाळायला हवे. तेलाचा पुनर्वापर करणे हा गुन्हा ठरतो. कारवाईदरम्यान अन्नसुरक्षा अधिकाऱ्याकडे टोटल पोलर इंडेक्स (टीपीसी) मोजण्याचे उपकरण असते. टीपीसी २५ डिग्रीपेक्षा जास्त असल्यास जागेवरच दंड आकारण्यात येतो.

तेलाचा पुनर्वापर केल्यास कारवाई

अन्न प्रशासन विभागाकडे नोंदणी हॉटेल व रेस्टॉरंटने, तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तेलाचा पुनर्वापर करू नये. अधिकाऱ्यांना त्रुटी आढळून आल्यास दंड, कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतात.

अभय देशपांडे, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन विभाग.

टॅग्स :Healthआरोग्य