शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत थंडीची ‘रिएन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 10:03 IST

मध्य भारतात थंडीची लाट पसरल्याने दोन दिवसात पारा १० अंशाने घटला आहे.

ठळक मुद्दे पारा पुन्हा घसरलारविवारी किमान तापमान ६.३ डिग्री सेल्सिअस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य भारतात थंडीची लाट पुन्हा पसरली आहे. त्याचा परिणाम उपराजधानीवरही झाला आहे. डिसेंबर महिन्या थंडीने रेकॉर्ड केला होता. तापमान ३.४ पर्यंत पोहोचले होते. जानेवारीच्या शेवटीही पारा घसरला होता. फेब्रुवारी उजाडताच पारा पुन्हा चढला. मध्य भारतात थंडीची लाट पसरल्याने दोन दिवसात पारा १० अंशाने घटला आहे.जानेवारीच्या शेवटी शेवटी थंडीने उपराजधानीला चांगलेच गारठले होते. तेव्हा किमान तापमान ३.४ डिग्रीने खाली घसरले होते. कमाल तापमानही १०.८ डिग्री सेल्सिअसपर्यंत आले होते. पण फेब्रुवारी उजाडताच तापमानात वाढ झाली.१ फेब्रुवारीला उपराजधानीचे किमान तापमान ६.३ सेल्सिअस नोंदविण्यात आले. त्यानंतर पारा वाढतच गेला. २ फेब्रुवारीला किमान तापमान ९.२, ३ व ४ फेब्रुवारीला १२.१, ५ फेब्रुवारीला ११.३, ६ व ७ फेब्रुवारीला ११.२ नोंदविण्यात आले. ८ फेब्रुवारीचे तर किमान तापमान १७ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. मात्र मध्य भारतात थंडीची लाट पसरली. अनेक भागांमध्ये बर्फवृष्टीही झाली. त्यामुळे गार वारे वाहू लागले. दुपारच्या वेळीही थंडी जाणवू लागली. त्यामुळे ९ फेब्रुवारीला ८.९ व १० फेब्रुवारीला ६.३ डिग्री सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येणारे दोन दिवस उपराजधानीचे वातावरण कायम राहणार आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन