शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा
2
तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएल फायनलमध्ये नेणाऱ्या श्रेयस अय्यरचे घर पाहिले का...?
3
Gold Silver Price 2 June: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, पाहा १० ग्रॅमसाठी किती करावा लागणार खर्च?
4
सी सेक्शन सोपं? सुनील शेट्टीच्या वक्तव्यावर गौहर खानचा संताप, म्हणाली, "एका पुरुष सेलिब्रिटी..."
5
बलुच आर्मीचा पाकिस्तानी आयएसआयवर तगडा वार; महत्वाचा एजंट मुहम्मद हसनीला उडविले...
6
बांगलादेशच्या नोटांवरून हटवला शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो, आता देशाच्या चलनावर दिसणार मंदिरे! 
7
गाडी चालवताना झोप लागली अन्...; 'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ताचा अपघात, थोडक्यात वाचली अभिनेत्री
8
नक्षलवाद्यांविरुद्ध मोठे यश, सुकमामध्ये १६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; ६ जणांवर २५ लाख रुपयांचे होते बक्षीस
9
तुर्कीचा भ्रमाचा भोपळा फुटला! अभेद्य समजला जाणारा बायरकतार ड्रोन भारताने पाडला अन्...
10
५०० रुपयांची नोट खरंच बंद होणार का? 'ही' आहेत ३ मोठी कारणे, RBI चं म्हणणं काय?
11
"लगेच निवडणुका लागणार होत्या म्हणून..."; अपात्र 'लाडक्या बहिणीं'ना दिलेल्या पैशाबाबत अजित'दादां'चं मोठं विधान
12
Whatsapp युजर्सना एसबीआयचा इशारा, याकडे लक्ष दिलं नाही तर होईल मोठं नुकसान
13
Video: 'कोड नेम? हनुमान चालीसा...', शोमध्ये आलेल्या पाकिस्तानी व्यक्तीची घेतली फिरकी
14
सावधान...! पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना, मृतांचा आकडा 28 वर पोहोचला; सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळ
15
फक्त एका कारणामुळे आंबा उत्पादकांना बसणार ५०० कोटींचा फटका! लोणच्यासाठी विकण्याची वेळ!
16
विश्वचषकात द्विशतक झळकावणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलची अचानक निवृत्तीची घोषणा; कारण काय..?
17
'रामायण'मध्ये भोलेनाथचं दर्शन होणार, टीव्हीवरील 'हा' अभिनेता पुन्हा महादेवाच्या भूमिकेत दिसणार
18
एम एफ हुसेन यांची २५ चित्रे १७ वर्षांपासून बँकेच्या तिजोरीत धूळ खात पडून, आता होणार लिलाव
19
तुम्हाला माहित्येय? पब-रेस्टॉरंटसुद्धा चालवतो विराट कोहली! आता पोलिसांनी केली मोठी कारवाई; स्टार क्रिकेटर अडचणीत

जीवाश्म इंधन कमी करून अक्षय ऊर्जेची वाढ हाच सुरक्षित पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:12 IST

आयआयटी जोधपूरचे संचालक अविनाश अग्रवाल : नीरीतर्फे ऊर्जा संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हरितगृह वायू (जीएचजी) उत्सर्जनात भारताचा वाटा कमी असला, तरी जागतिक तापमानवाढ थांबविण्यासाठी आणि पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी कोळसा आधारित वीज व जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्याशिवाय पर्याय नाही, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम देशालाही भोगावे लागतील, असा गंभीर इशारा आयआयटी, जोधपूरचे संचालक डॉ. अविनाश अग्रवाल यांनी आज नागपुरात दिला.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (सीएसआयआर नीरी) च्या वतीने ऊर्जा परिवर्तनावर मंथन करण्यासाठी 'ऊर्जा संवाद' या कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी ट्रिपलएस एनआयबीई, कपूरथलाचे महासंचालक डॉ. जी. श्रीधर, सीएसआयआर-एएमपीआरआय, भोपाळचे संचालक डॉ. थल्लदा भास्कर, नीरीचे संचालक डॉ. एस. व्यंकट मोहन, प्रधान वैज्ञानिक डॉ. नितीन लाभशेटवार, संघटक सचिव डॉ. अवनीश अंशुल, मुख्य वैज्ञानिक डॉ. अंकित गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते.

उद्घाटनानंतर झालेल्या सत्रात डॉ. अविनाश अग्रवाल यांनी 'ई-इंधन स्वीकारण्यातील संधी आणि आव्हाने' यावर बोलताना ऊर्जा आणि जीडीपीचा थेट संबंध असल्याचे नमूद केले. ऊर्जा बचत केली, तर देशाचा शाश्वत विकास शक्य असल्याचे ते म्हणाले. भारताचे जीएचजी उत्सर्जन ४ टक्क्यांपेक्षा कमी आहे. मात्र, तापमानवाढ १.५ डिग्रीवर नियंत्रित ठेवण्यासाठी अक्षय ऊर्जेची क्षमता वाढविणे, बायोमासने कार्बन कॅप्चर करण्याचे तंत्र विकसित करण्यावर भर दिला. त्यातून भारत ३६.९ गिगावॅट ऊर्जेची बचत करू शकेल. भारताने २०३० पर्यंत अक्षय ऊर्जेचे उत्पादन ५०० गिगावॅट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

सध्याचा कोळशाचा वापर प्रतिवर्ष ४०० दशलक्ष टन आहे. हा वापर कमी करण्यासाठी कार्यक्षम कोळसा तंत्रज्ञानाचा विकास आणि हायड्रोजन ऊर्जेचा विकास करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. त्यांनी जैवइंधनाचे महत्त्व अधोरेखित करीत मिथेनॉल आणि डायमिथाइल इथर (डीएमई) इंधनाला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. आयात होणाऱ्या जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मिथेनॉल अर्थव्यवस्था महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :nagpurनागपूर