शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

जीवाश्म इंधन कमी करून अक्षय ऊर्जेची वाढ हाच सुरक्षित पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:12 IST

आयआयटी जोधपूरचे संचालक अविनाश अग्रवाल : नीरीतर्फे ऊर्जा संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हरितगृह वायू (जीएचजी) उत्सर्जनात भारताचा वाटा कमी असला, तरी जागतिक तापमानवाढ थांबविण्यासाठी आणि पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी कोळसा आधारित वीज व जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्याशिवाय पर्याय नाही, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम देशालाही भोगावे लागतील, असा गंभीर इशारा आयआयटी, जोधपूरचे संचालक डॉ. अविनाश अग्रवाल यांनी आज नागपुरात दिला.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (सीएसआयआर नीरी) च्या वतीने ऊर्जा परिवर्तनावर मंथन करण्यासाठी 'ऊर्जा संवाद' या कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी ट्रिपलएस एनआयबीई, कपूरथलाचे महासंचालक डॉ. जी. श्रीधर, सीएसआयआर-एएमपीआरआय, भोपाळचे संचालक डॉ. थल्लदा भास्कर, नीरीचे संचालक डॉ. एस. व्यंकट मोहन, प्रधान वैज्ञानिक डॉ. नितीन लाभशेटवार, संघटक सचिव डॉ. अवनीश अंशुल, मुख्य वैज्ञानिक डॉ. अंकित गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते.

उद्घाटनानंतर झालेल्या सत्रात डॉ. अविनाश अग्रवाल यांनी 'ई-इंधन स्वीकारण्यातील संधी आणि आव्हाने' यावर बोलताना ऊर्जा आणि जीडीपीचा थेट संबंध असल्याचे नमूद केले. ऊर्जा बचत केली, तर देशाचा शाश्वत विकास शक्य असल्याचे ते म्हणाले. भारताचे जीएचजी उत्सर्जन ४ टक्क्यांपेक्षा कमी आहे. मात्र, तापमानवाढ १.५ डिग्रीवर नियंत्रित ठेवण्यासाठी अक्षय ऊर्जेची क्षमता वाढविणे, बायोमासने कार्बन कॅप्चर करण्याचे तंत्र विकसित करण्यावर भर दिला. त्यातून भारत ३६.९ गिगावॅट ऊर्जेची बचत करू शकेल. भारताने २०३० पर्यंत अक्षय ऊर्जेचे उत्पादन ५०० गिगावॅट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

सध्याचा कोळशाचा वापर प्रतिवर्ष ४०० दशलक्ष टन आहे. हा वापर कमी करण्यासाठी कार्यक्षम कोळसा तंत्रज्ञानाचा विकास आणि हायड्रोजन ऊर्जेचा विकास करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. त्यांनी जैवइंधनाचे महत्त्व अधोरेखित करीत मिथेनॉल आणि डायमिथाइल इथर (डीएमई) इंधनाला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. आयात होणाऱ्या जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मिथेनॉल अर्थव्यवस्था महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :nagpurनागपूर