शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

सरलमुळे घटणार आरटीईच्या जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 22:26 IST

प्राथमिक शिक्षण संचालनालयाने २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता सरलमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर २५ टक्के जागा आरटीईसाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरटीईच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआरटीईच्या नियमात बदल : प्रवेशासाठी वाढणार स्पर्धा

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : प्राथमिक शिक्षण संचालनालयाने २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता सरलमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर २५ टक्के जागा आरटीईसाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरटीईच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे.राज्यात राईट टु एज्युकेशन अ‍ॅक्ट २००९ (आरटीई) ची अंमलबजावणी २०१२ पासून झाली. तेव्हापासून शिक्षण विभागातर्फे शाळांना मान्यता दिलेल्या पटसंख्येच्या आधारावर आरटीईच्या २५ टक्के जागा आरक्षित करण्यात येत होत्या. गेल्यावर्षी नागपूर जिल्ह्यात सहाशेवर शाळांनी आरटीईत नोंदणी केली होती. जवळपास ७ हजारावर जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. परंतु यावर्षी शिक्षण संचालनालयाने नियमात बदल करून, सरलमधील पटसंख्येच्या आधारावर आरटीईचे आरक्षण निर्धारित करण्यात यावे, असे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. अनेक शाळांमध्ये मान्यतेपक्षा विद्यार्थ्यांचा पट गेल्यावर्षी सरलमध्ये कमी नोंदविल्या गेला. त्यामुळे सरलवरून आरटीईच्या जागा आरक्षित झाल्यास निश्चितच जागा कमी होणार आहे. त्याचा फटका दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना बसणार आहे. कारण नागपुरातून आरटीईसाठी मोठ्या संख्येने अर्ज येतात. आता जागाच कमी होणार असल्याने प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार आहे. पडताळणी समितीचे गठण झाले नाहीआरटीईच्या लॉटरीमध्ये नंबर लागल्यानंतर बरेचदा शाळा कुठलेतरी कारण दाखवून विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करीत होती. हा प्रकार थांबविण्यासाठी संचालनालयाने गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कागदपत्राची तपासणी करण्यासाठी १० सदस्यीय समिती गठित करण्याचे निर्देश दिले होते. जिल्ह्यात आरटीईची शाळा नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. ५ मार्चपासून पालकांना अर्ज करायचे आहे. पडताळणी समितीचा अद्यापही पत्ता नाही, असे आरटीई अ‍ॅक्शन कमिटीचे म्हणणे आहे. विभागात ३५ हजार विद्यार्थ्यांचा बॅकलॉग२०१२ पासून जिल्ह्यात आरटीई प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु आरक्षित जागा कधीच पूर्ण भरल्या नाही. त्यामुळे हा बॅकलॉग ३५ हजारावर गेला आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडून आरटीईचा पैसा उचलला पण बॅगलॉग भरला नाही. शिक्षण विभागाचे आरटीईकडे दूर्लक्षशिक्षण उपसंचालक हे ऑनलाईन अ‍ॅडमिशनचे अध्यक्ष असतात. आरटीईची प्रक्रिया राबवितांना त्यांनी प्रक्रियेचा आढावा घेणे आवश्यक आहे. मार्गदर्शन केंद्राची स्थापना करणे गरजेचे आहे. प्रक्रियेत येत असलेल्या अडचणी सोडविणे गरजेचे आहे. परंतु यावर्षी शिक्षण उपसंचालकासह, शिक्षण अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आरटीईची प्रक्रिया राबविण्यासाठी शिक्षण विभागच गंभीर दिसत नाही.शाहीद शरीफ, अध्यक्ष, आरटीई अ‍ॅक्शन कमिटी

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थी