शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सरलमुळे घटणार आरटीईच्या जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 22:26 IST

प्राथमिक शिक्षण संचालनालयाने २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता सरलमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर २५ टक्के जागा आरटीईसाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरटीईच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआरटीईच्या नियमात बदल : प्रवेशासाठी वाढणार स्पर्धा

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : प्राथमिक शिक्षण संचालनालयाने २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता सरलमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर २५ टक्के जागा आरटीईसाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरटीईच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे.राज्यात राईट टु एज्युकेशन अ‍ॅक्ट २००९ (आरटीई) ची अंमलबजावणी २०१२ पासून झाली. तेव्हापासून शिक्षण विभागातर्फे शाळांना मान्यता दिलेल्या पटसंख्येच्या आधारावर आरटीईच्या २५ टक्के जागा आरक्षित करण्यात येत होत्या. गेल्यावर्षी नागपूर जिल्ह्यात सहाशेवर शाळांनी आरटीईत नोंदणी केली होती. जवळपास ७ हजारावर जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. परंतु यावर्षी शिक्षण संचालनालयाने नियमात बदल करून, सरलमधील पटसंख्येच्या आधारावर आरटीईचे आरक्षण निर्धारित करण्यात यावे, असे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. अनेक शाळांमध्ये मान्यतेपक्षा विद्यार्थ्यांचा पट गेल्यावर्षी सरलमध्ये कमी नोंदविल्या गेला. त्यामुळे सरलवरून आरटीईच्या जागा आरक्षित झाल्यास निश्चितच जागा कमी होणार आहे. त्याचा फटका दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना बसणार आहे. कारण नागपुरातून आरटीईसाठी मोठ्या संख्येने अर्ज येतात. आता जागाच कमी होणार असल्याने प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार आहे. पडताळणी समितीचे गठण झाले नाहीआरटीईच्या लॉटरीमध्ये नंबर लागल्यानंतर बरेचदा शाळा कुठलेतरी कारण दाखवून विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करीत होती. हा प्रकार थांबविण्यासाठी संचालनालयाने गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कागदपत्राची तपासणी करण्यासाठी १० सदस्यीय समिती गठित करण्याचे निर्देश दिले होते. जिल्ह्यात आरटीईची शाळा नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. ५ मार्चपासून पालकांना अर्ज करायचे आहे. पडताळणी समितीचा अद्यापही पत्ता नाही, असे आरटीई अ‍ॅक्शन कमिटीचे म्हणणे आहे. विभागात ३५ हजार विद्यार्थ्यांचा बॅकलॉग२०१२ पासून जिल्ह्यात आरटीई प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु आरक्षित जागा कधीच पूर्ण भरल्या नाही. त्यामुळे हा बॅकलॉग ३५ हजारावर गेला आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडून आरटीईचा पैसा उचलला पण बॅगलॉग भरला नाही. शिक्षण विभागाचे आरटीईकडे दूर्लक्षशिक्षण उपसंचालक हे ऑनलाईन अ‍ॅडमिशनचे अध्यक्ष असतात. आरटीईची प्रक्रिया राबवितांना त्यांनी प्रक्रियेचा आढावा घेणे आवश्यक आहे. मार्गदर्शन केंद्राची स्थापना करणे गरजेचे आहे. प्रक्रियेत येत असलेल्या अडचणी सोडविणे गरजेचे आहे. परंतु यावर्षी शिक्षण उपसंचालकासह, शिक्षण अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आरटीईची प्रक्रिया राबविण्यासाठी शिक्षण विभागच गंभीर दिसत नाही.शाहीद शरीफ, अध्यक्ष, आरटीई अ‍ॅक्शन कमिटी

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थी