शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
3
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
4
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
5
₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
6
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
7
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
8
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
9
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
10
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
11
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
12
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
13
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
14
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
15
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
16
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
17
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
18
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
19
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
20
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

गरजा कमी करा, जीवनाचे गणित सुटेल

By admin | Updated: March 16, 2015 02:35 IST

घरची परिस्थिती बेताची. वडील कपडे डोक्यावर घेऊन बाजारात विकायला जायचे. हळुहळू परिस्थिती बदलली अन् वडिलांनी चांगले दुकान थाटले.

नागपूर : घरची परिस्थिती बेताची. वडील कपडे डोक्यावर घेऊन बाजारात विकायला जायचे. हळुहळू परिस्थिती बदलली अन् वडिलांनी चांगले दुकान थाटले. पैसाही मिळू लागला. परंतु वडिलांनी मेहनत कमी केली नाही. एवढा पैसा कशाला हवा, असा विचार मनात आला आणि पैशांचा तिरस्कार वाटायला लागला. त्यामुळे गरजा कमी केल्या की जीवनाचे गणित नक्की सुटते, असे मत प्रयार सेवांकुर संस्थेचे अविनाश सावजी यांनी व्यक्त केले.प्रयास सेवांकुर, मुंडले एज्युकेशन ट्रस्ट व स्व. अच्युतराव महाजन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बी. आर. ए. मुंडले सभागृहात आयोजित ‘आम्ही बिघडलो ! तुम्ही बी घडाना’ या प्रगट मुलाखतीत ते बोलत होते. आल्हाद काशीकर आणि मनोज गोविंदवार यांनी हसतखेळत त्यांना बोलते केले. अविनाश सावजी म्हणाले, बुलडाण्यातील सिंदखेडराजात मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला. घरात आईवडिल, चार बहिणी आणि दोन भाऊ होते. वडील शिकलेले नसले तरी मुलांना शिकविले. दुकानात वडिलांना एकेका पैशाचा हिशेब जुळल्याशिवाय जमत नव्हते. त्यांच्यामुळे माझेही जीवनाचे गणित पक्के झाले. वडिलांच्या स्वभावात अहंकार होता. तोच स्वभाव मला लाभला. काही लोकांचा अहंकार त्यांना मोठा करतो. परंतु अहंकार कुठे बाळगायचा याचे भान हवे. बारावीत चांगले गुण मिळाल्याने नागपुरात एमबीबीएसला प्रवेश घेतला. चार मित्रांचा ग्रुप जमला. परंतु चांगले बोलता येत नसल्यामुळे कमीपणा वाटायचा. इंग्रजीतून शिकवत असल्यामुळे दोन महिने काहीच कळाले नाही. पहिल्याच युनिट टेस्टमध्ये पहिला आलो. आत्मविश्वास वाढू लागला. बाबा आमटे, संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराजांना मोठे व्यक्ती म्हणून नव्हे तर बालपणी ते कसे होते या दृष्टीने पाहुन त्यांनाच जीवनाचे कन्सलटंट केले. वडिलांच्या १५० रुपयांच्या मनिआॅर्डरमध्ये विवेकानंदांची पुस्तके घेतली. त्यामुळे जीवनच बदलले. उपाशी राहायला शिकलो. एमबीबीएस झाल्यावर पुढे शिक्षणाची इच्छा नव्हती. घरच्यांच्या दबावामुळे नोकरी स्वीकारली. ती सोडून अमळनेरला मोबाईल हॉस्पिटलमध्ये रुजू झालो. त्यांनी भोपाळला कॅम्प घेतला. तेथे सोहोनीशी भेट झाली. तिच्या भावाचा मोठे हॉस्पिटल थाटण्याचा सल्ला आवडला नाही. सोहोनीच्या गावातच दवाखाना सुरू केला. आपल्या गरजा कमी करून सोहोनीशी लग्नाचा निर्णय घेतला. लग्न झाल्यानंतर अमरावतीत एका खेड्यात १२०० रुपये महिन्यात काम सुरू केले. व्यवस्थापनाशी संघर्ष झाला. चांदूरबाजारला १८०० रुपये महिन्याने खोली भाड्याने घेतली. १९९४ ला प्रयास संस्था सुरू केली. सुरुवातीला ३ हजार वेतन मिळत होते. सध्या १२५०० रुपये वेतन घेतो. मागील वर्षी संस्थेची पहिली इमारत अमरावतीत उभारली. संस्थेतर्फे विविध सामाजिक कार्य करण्यात येतात. जीवनात परीक्षा घेणारे अनेक क्षण येतात त्यामुळेच माणसाचा खरा विकास होतो. पुढे आपण सुधारणार असे सोहोनीला वाटले त्यामुळे तिने लग्नास होकार दिला. परंतु तसे झाले नसल्यामुळे आजही आमची भांडणे होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ‘हृदय संवाद’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रगट मुलाखतीला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)