शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
3
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
4
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
5
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
6
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
7
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
8
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
9
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
10
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
11
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
12
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
13
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
14
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 23:12 IST

विदर्भातील बहुतांश जिल्हे ऑरेंज अलर्टवर आहेत. पण २१ आणि २२ मे या दिवशी विदर्भात रेड अलर्ट राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या दिवशी चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, गडचिरोली, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात गरमीचा प्रकोप वाढणार आहे.

ठळक मुद्देउकाडा वाढला : रात्रीचे तापमान वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्हे ऑरेंज अलर्टवर आहेत. पण २१ आणि २२ मे या दिवशी विदर्भात रेड अलर्ट राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या दिवशी चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, गडचिरोली, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात गरमीचा प्रकोप वाढणार आहे.नागपुरात गेल्या २४ तासात कमाल तापमानात दीड अंश सेल्सिअस घसरण होऊन ४३.९ अंशावर स्थिरावले. पण रात्रीच्या तापमानात नागपूर सर्वात पुढे असून किमान तापमान ३२.७ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. ते सामान्यापेक्षा ५ अंश जास्त आहे. गेल्या २४ तासात रात्रीचे तापमान २.६ अंश सेल्सिअसने वाढले आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार मेच्या दुसऱ्या आठवड्यात गरमीचा प्रकोप सर्वाधिक असतो. सध्या गरमीपासून सुटका मिळण्याची कोणतीही शक्यता दिसून येत नाही. रेड अलर्टदरम्यान अनेक शहरांमध्ये तापमान ४७ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून चंद्रपूरचे तापमान सर्वाधिक आहे. शनिवारी चंद्रपूरमध्ये कमाल तापमान ४५.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. ब्रह्मपुरीमध्ये ४५.५, वर्धा ४४, अकोला ४३.६, गडचिरोली ४३.४, गोंदिया ४३.२, अमरावती ४३, वाशिम ४२.६, यवतमाळ ४२.५, बुलडाणा ४०.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

टॅग्स :TemperatureतापमानVidarbhaविदर्भ