शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

नागपुरातील माफसूच्या पदभरतीत गोलमाल असल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 21:12 IST

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात (माफसू) पुन्हा एकदा पदभरतीमुळे चर्चेत आले आहे. माफसू अंतर्गत वाईल्ड लाईफ रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटरच्या तीन पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदासाठीची जाहिरातच मुळात त्रुटीपूर्ण असल्याचे आक्षेप नोंदविण्यात आले आहे. परंतु एका उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावूनही मुलाखत न घेताच परत पाठवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या विद्यापीठाअंतर्गत असलेली भरती प्रक्रिया पुन्हा एकदा संशयात सापडली आहे.

ठळक मुद्देकॉल पाठविला पण मुलाखतच घेतली नाहीवाईल्ड लाईफ रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटरसाठी पदभरती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात (माफसू) पुन्हा एकदा पदभरतीमुळे चर्चेत आले आहे. माफसू अंतर्गत वाईल्ड लाईफ रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटरच्या तीन पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदासाठीची जाहिरातच मुळात त्रुटीपूर्ण असल्याचे आक्षेप नोंदविण्यात आले आहे. परंतु एका उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावूनही मुलाखत न घेताच परत पाठवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या विद्यापीठाअंतर्गत असलेली भरती प्रक्रिया पुन्हा एकदा संशयात सापडली आहे.गोरेवाडा येथील आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या नियंत्रणाखाली वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र (वाईल्ड लाईफ रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटर) स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यात एकूण २० जागाही मंजूर करण्यात आल्या. यापैकी पशु वैद्यकीय चिकित्सालयीन औषधशास्त्र, पशु प्रजनन शास्त्र आणि पशु जैव तंत्रज्ञान या पदासाठी जाहिरात काढण्यात आली. ही तिन्ही पदे पशु व मत्स्य विद्यापीठाशी संबंधित आहेत. वाईल्ड लाईफशी त्यांचा संबंध नाही. वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी वन्यजीव विज्ञान किंवा वन्यजीव आरोग्य व व्यवस्थापन या विषयाच्या पदव्युत्तरांची आवश्यकता आहे. परंतु हे विषय जाहिरातीतूनच वगळण्यात आले आहेत. यासंबंधात काही जणांनी तक्रारही केली आहे. डॉ. दत्तात्रय इंगोले हे स्वत: एक उमेदवार आहेत. ते मूळचे उस्मानाबाद येथील रहिवासी असून सध्या धुळ्याला राहतात. ते माफसूचेच माजी विद्यार्थी असून वाईल्ड लाईफचे तज्ज्ञ आहेत. वन्यजीव सायन्समध्ये ते पीएचडी आहेत. तसेच नेटसुद्धा झालेले आहेत. वाईल्ड लाईफ सेंटरसाठी पदभरती होत आहे. परंतु या विषयातील तज्ज्ञ असूनही अर्ज करता येत नसल्याने त्यांनी विद्यापीठाला पत्र पाठवून याबाबत आक्षेप घेतला आणि अर्ज करण्याची विनंती केली. विद्यापीठाने त्यांची विनंती मान्य केली. मुलाखतीसाठीही त्यांना बोलावले. बुधवारी मुलाखत होती. परंतु त्यांची मुलाखतच घेण्यात आली नाही. याबाबत विचारणा केली असता कुणी काहीही बोलायला तयार नव्हते. मुलाखत न घेताच त्यांना परत पाठविण्यात आले. मुलाखत घ्यायचीच नव्हती तर मग कॉल लेटर पाठवलेच का, असा प्रश्न यातून उपस्थित झाला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर