शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

एनएमआरडीएची विकास शुल्काच्या नावाखाली वसुली,लोकांमध्ये प्रचंड रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 22:26 IST

ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या स्वत:च्या जागेत गरजेनुसार बांधकाम केले आहे. बांधकाम नकाशा मंजूर न करता ग्रामीण भागात सर्रास बांधकाम केले जात होते. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एनएमआरडीए) एका फटक्यात अशी गावाठाणाबाहेरील बांधकामे अनधिकृत ठरविलेली आहेत. अशा मालमत्ताधारकांना नोटीस बजावल्या जात आहे. विकास शुल्क भरून बांधकाम नियमित न केल्यास बांधकाम पाडण्याचा इशारा दिला आहे. बांधकाम पाडण्याचा इशारा देऊ न विकास शुल्क वसूल करून ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक लूट सुरू असल्याने लोकांमध्ये प्रचंड रोष आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील लोकांंची आर्थिक लूट थांबवा३० वर्षांपूर्वीचे बांधकाम अनधिकृत कसे ?

लोकमत न्यूज नटेवर्कनागपूर : ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या स्वत:च्या जागेत गरजेनुसार बांधकाम केले आहे. बांधकाम नकाशा मंजूर न करता ग्रामीण भागात सर्रास बांधकाम केले जात होते. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एनएमआरडीए) एका फटक्यात अशी गावाठाणाबाहेरील बांधकामे अनधिकृत ठरविलेली आहेत. अशा मालमत्ताधारकांना नोटीस बजावल्या जात आहे. विकास शुल्क भरून बांधकाम नियमित न केल्यास बांधकाम पाडण्याचा इशारा दिला आहे. बांधकाम पाडण्याचा इशारा देऊ न विकास शुल्क वसूल करून ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक लूट सुरू असल्याने लोकांमध्ये प्रचंड रोष आहे.एनएमआरडीएने महानगर क्षेत्रातील १ हजार ८०१ लोकांना नोटीस बजावल्या आहेत. नोटीस बजावल्यानतंरही विकास शुल्क न भरणाऱ्यांच्या बांधकामाजवळ बुलडोजरसह पथक पोहचते. बुलडोजरचा पंजा उगारून पाच-दहा लाखांचा दंड भरण्याची तंबी दिली जाते. अन्यथा बांधकाम पाडण्याचा इशारा दिला जातो. बांधकामावर लाखो रुपयांचा खर्च झालेला असल्याने कारवाई होऊ नये यासाठी नाईलाज म्हणून जागा मालक दंड वा शुल्क भरण्याची तयारी दर्शवितात. असा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.शहरालगतच्या आठ-दहा किलोमीटर परिसरात बिल्डरकडून लोकांनी फ्लॅट वा जागा खरेदी केली केलेली आहे. आता वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नोटीस बजावल्या जात आहेत. बिल्डरला पूर्ण रक्कम दिली असताना पुन्हा विकास शुल्क कसे भरणार असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. महाराष्ट्र रिजनल अ‍ॅन्ड टाऊन प्लॅनिंग (एमआरटीपी) अधिनियम,१९६६ च्या कलम ५३ अंतर्गत कारवाई केली जात आहे. वास्तविक एनएमआरडीए अस्तित्वात येण्यापूर्वीचे बांधकाम असल्याने जुन्या बांधकामावर कारवाई करण्याचा अधिकार एनएमआरडीएला कुणी दिला असा प्रश्न लोकांना पडला आहे. निवासी बांधकामासोबतच औद्योगिक, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक,रेस्टॉरेन्ट अशा विविध स्वरुपाच्या बांधकामाचा यात समावेश आहे. या सर्वांवर अभिकरण शुल्क आकारले जात आहे.२०१५ मध्ये एनएमआरडीएची स्थापना करण्यात आली. यात नागपूर जिल्ह्यातील ७१९ गावांचा समावेश करण्यात आला. या भागाचा नियोजनबद्ध विकास केला जाणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी एनएमआरडीएने अद्याप कर्मचारी व अधिकाºयांची आकृतिबंधानुसार नियुक्ती केलेली नाही. नासुप्रतील कर्मचारी व अधिकाºयांच्या माध्यमातून या विभागाचा कारभार सुरू आहे.आस्थापना खर्च लोकांच्या खिशातूनएनएमआरडीएला नागपूर महापालिकेप्रमाणे आस्थापना खर्चाकरिता शासनाकडून अनुदान मिळण्याचे प्रावधान नाही. त्यामुळे ‘एनएमआरडीए’ला आस्थापना खर्चाचे प्रावधान स्वत: करावयाचे आहे. अभिकरण तत्त्वावर विकासकामातून एनएमआरडीएला उत्पन्न प्राप्त होणार असले तरी हा निधी प्रामुख्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातूनच वसूल केला जाणार आहे.प्राधिकरणाला अधिकारच नाही३० ते ४० वर्षापूर्वी लोकांनी बांधकाम केले आहे. अतिक्रमण केलेले नाही. एनएमआरडीए अस्तित्वात येण्यापूर्वी लोकांनी बांधकाम केले आहे. जुनी बांधकामे पाडण्याचा अधिकार एनएमआरडीएला नाही. लोकांच्या खिशातून पैसे काढण्याचाच हा प्रकार आहे. नागपूर शहरात अशी बांधकामे ९० टक्के आहेत. संपूर्ण शहरातच कमी अधिक प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले आहे. कुणाकुणावर कारवाई करणार? एनएमआरडीएच्या कारवाईमुळे नागरिकांनी घाबरू नये.प्रशांत पवार, अध्यक्ष जय जवान, जय किसान संघटना

टॅग्स :nagpurनागपूरagitationआंदोलन