शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

मनपा प्रशासन झाले गतिमान : महिनाभरात प्रभागांची पुनर्रचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 12:27 IST

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. महिनाभरात तीन सदस्यीय ५० प्रभागांची पुनर्रचना करणार आहे. १५१ सदस्यांचा विचार करता शेवटचा प्रभाग हा चार सदस्यांचा राहणार आहे.

ठळक मुद्देतीन सदस्यांनुसार पुनर्रचना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिका निवडणुका तीन सदस्यीय प्रभागानुसार होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. महिनाभरात तीन सदस्यीय ५० प्रभागांची पुनर्रचना करणार आहे. १५१ सदस्यांचा विचार करता शेवटचा प्रभाग हा चार सदस्यांचा राहणार आहे.

प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आधीच्या आदेशानुसार एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीनुसार प्रभागाची रचना करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. काम अंतिम टप्प्यात असताना राज्य सरकारने तीन सदस्यीय प्रभागानुसार महापालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने सुधारित आदेश जारी केले आहेत.

भाजप -शिवसेना युती सरकारने १९ मे २०१६ रोजी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा आदेश काढला होता. राज्यातील सर्व महापालिकांत ही पद्धती लागू करण्यात आली होती. त्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश काढून नियमात दुरुस्ती केली होती. परंतु, २०१९ ला राज्यात सत्ताबदल झाला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारने बहुसदस्य प्रभाग पद्धतीचा आदेश २०२० मध्ये रद्द केला होता. मात्र, महाविकास आघाडीने हा निर्णय रद्द करून त्रिसदस्यीय प्रभागाचा निर्णय घेतला आहे.

आक्षेपांवरील सुनावणीनंतर अंतिम स्वरुप

मनपा प्रशासनाच्या चमूद्वारे तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार केल्यानंतर, तो निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार आहे. आयोगाकडून तो प्रकाशित केला जाईल. त्यावर आक्षेप व सूचना मागितल्या जातील. यावर सुनावणी झाल्यानंतर प्रभागरचनेला अंतिम स्वरूप दिले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

५० हजार मतदारांच्या आसपास मतदार

चार सदस्यीय प्रभागात ६५ ते ७० हजार मतदार आहेत. याचा विचार करता तीन सदस्यीय प्रभागात ५० हजारांच्या आसपास मतदार राहतील. तीन सदस्यीय प्रभागानुसार निवडणूक होणार असल्याने अपक्ष उमेदवारांच्या इच्छेवर पुन्हा एकदा पाणी फिरले आहे. एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीनुसार निवडणूक होणार असल्याचे गृहीत धरून अनेकांनी गेल्या वर्षभरापासून तयारी सुरू केली होती. मात्र, आता ही निवडणूक त्यांच्या बजेटच्या बाहेर गेली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाElectionनिवडणूकnagpurनागपूर