शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कालिकतमध्ये १२० दिवसांत रिकार्पेटिंग, नागपूरमध्ये कासवगतीनेच होतेय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 14:43 IST

Nagpur : हायकोर्टाने विमानतळ प्राधिकरण, मिहान इंडियाला मागितले ७ जानेवारीपर्यंत उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केरळमधील कालिकत विमानतळातील धावपट्टीचे १२० दिवसांत रिकार्पेटिंग करण्यात आले आहे; परंतु नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळातील धावपट्टीच्या 'रिकापेंटिंग'चे काम कासव गतीने होत आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी भारतीय विमानतळ प्राधिकरण व मिहान इंडिया कंपनीसह इतर संबंधित प्रतिवादींना यावर येत्या ७ जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. 

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, प्रकरणातील न्यायालय मित्र अॅड. कार्तिक शुकुल यांनी भारतीय  विमानतळ प्राधिकरणचा एक अहवाल सादर करून कालिकतमधील विमान धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे काम १२० दिवसांत पूर्ण झाल्याची माहिती दिली, तसेच नागपुरातील विमान धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे कामही याच गतीने पूर्ण केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. परिणामी, न्यायालयाने हे निर्देश दिले. मिहान इंडियाने या प्रकरणात आधीही एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामध्ये कंपनीने विमान धावपट्टीचे आवश्यक तेव्हा 'रिकार्पेटिंग' करणे आणि 'रिकार्पेटिंग'साठी धावपट्टी बंद ठेवणे ही विमानतळ प्रशासनाच्या अधिकार क्षेत्रातील बाब आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या कामात उच्च न्यायालयासह इतर कोणतेही न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, अशी भूमिका मांडली आहे.

'लोकमत'च्या बातमीची दखल देशाच्या हृदयस्थळी असलेल्या नागपूर विमानतळाच्या धावपट्टीचे रिकार्पेटिंग रखडले आहे. त्यामुळे विमान वाहतूक प्रभावित झाली आहे. प्रवाशांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे, अशी बातमी 'लोकमत'ने प्रकाशित केली होती. उच्च न्यायालयाने त्या बातमीची नोंद घेऊन यासंदर्भात स्वतःच जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.

'जीएमआर'ला प्रतिवादी करण्याची परवानगीअॅड. शुकुल यांनी या प्रकरणामध्ये जीएमआर एअरपोर्ट कंपनीला प्रतिवादी करण्यासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला, तसेच या कंपनीला नोटीस बजावून वाचिकेतील मुद्यांवर भूमिका मांडण्याचा आदेश दिला. नागपूर विमानतळाला जागतिक दर्जाचे स्वरूप देण्याकरिता जीएमआर कंपनीला कंत्राट वाटप करण्यात आले आहे. मिहान इंडियाचा जीएमआर'ला प्रतिवादी करण्यास विरोध होता; पण त्यांचे मुद्दे न्यायालयाला प्रभावित करू शकले नाहीत.

सूक्ष्म नियोजनामुळे विक्रमी कामगिरी

  • भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पथकाने सूक्ष्म नियोजन केल्यामुळे कालिकतमध्ये ही विक्रर्मी कामगिरी घडू शकली, सामान्यतः अडीच किलोमीटरपेक्षा जास्त लांब असलेल्या धावपट्टीचे रिकार्पेटिंग करण्यासाठी आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागतो. 
  • परंतु, कालिकतमध्ये २७ जानेवारी २०२३ रोजी काम सुरू करून २ जून रोजी लक्ष्य पूर्ण करण्यात आले. या कामासाठी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विमान वाहतूक बंद ठेवली जात होती. या वेळेतील सर्व विमानांकरिता रात्रीचे वेळापत्रक तयार करण्यात आले होते.
  • रात्रीच्या विमान वाहतु‌कीकरिता धावपट्टी सज्ज ठेवली जात होती. कालिकत येथे रोज ७० ते ८० विमानांचे आगमन प्रस्थान होते. त्यांपैकी केवळ १० विमाने दिवसाची आहेत.

 

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय