शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

कालिकतमध्ये १२० दिवसांत रिकार्पेटिंग, नागपूरमध्ये कासवगतीनेच होतेय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 14:43 IST

Nagpur : हायकोर्टाने विमानतळ प्राधिकरण, मिहान इंडियाला मागितले ७ जानेवारीपर्यंत उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केरळमधील कालिकत विमानतळातील धावपट्टीचे १२० दिवसांत रिकार्पेटिंग करण्यात आले आहे; परंतु नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळातील धावपट्टीच्या 'रिकापेंटिंग'चे काम कासव गतीने होत आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी भारतीय विमानतळ प्राधिकरण व मिहान इंडिया कंपनीसह इतर संबंधित प्रतिवादींना यावर येत्या ७ जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. 

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, प्रकरणातील न्यायालय मित्र अॅड. कार्तिक शुकुल यांनी भारतीय  विमानतळ प्राधिकरणचा एक अहवाल सादर करून कालिकतमधील विमान धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे काम १२० दिवसांत पूर्ण झाल्याची माहिती दिली, तसेच नागपुरातील विमान धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे कामही याच गतीने पूर्ण केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. परिणामी, न्यायालयाने हे निर्देश दिले. मिहान इंडियाने या प्रकरणात आधीही एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामध्ये कंपनीने विमान धावपट्टीचे आवश्यक तेव्हा 'रिकार्पेटिंग' करणे आणि 'रिकार्पेटिंग'साठी धावपट्टी बंद ठेवणे ही विमानतळ प्रशासनाच्या अधिकार क्षेत्रातील बाब आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या कामात उच्च न्यायालयासह इतर कोणतेही न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, अशी भूमिका मांडली आहे.

'लोकमत'च्या बातमीची दखल देशाच्या हृदयस्थळी असलेल्या नागपूर विमानतळाच्या धावपट्टीचे रिकार्पेटिंग रखडले आहे. त्यामुळे विमान वाहतूक प्रभावित झाली आहे. प्रवाशांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे, अशी बातमी 'लोकमत'ने प्रकाशित केली होती. उच्च न्यायालयाने त्या बातमीची नोंद घेऊन यासंदर्भात स्वतःच जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.

'जीएमआर'ला प्रतिवादी करण्याची परवानगीअॅड. शुकुल यांनी या प्रकरणामध्ये जीएमआर एअरपोर्ट कंपनीला प्रतिवादी करण्यासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला, तसेच या कंपनीला नोटीस बजावून वाचिकेतील मुद्यांवर भूमिका मांडण्याचा आदेश दिला. नागपूर विमानतळाला जागतिक दर्जाचे स्वरूप देण्याकरिता जीएमआर कंपनीला कंत्राट वाटप करण्यात आले आहे. मिहान इंडियाचा जीएमआर'ला प्रतिवादी करण्यास विरोध होता; पण त्यांचे मुद्दे न्यायालयाला प्रभावित करू शकले नाहीत.

सूक्ष्म नियोजनामुळे विक्रमी कामगिरी

  • भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पथकाने सूक्ष्म नियोजन केल्यामुळे कालिकतमध्ये ही विक्रर्मी कामगिरी घडू शकली, सामान्यतः अडीच किलोमीटरपेक्षा जास्त लांब असलेल्या धावपट्टीचे रिकार्पेटिंग करण्यासाठी आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागतो. 
  • परंतु, कालिकतमध्ये २७ जानेवारी २०२३ रोजी काम सुरू करून २ जून रोजी लक्ष्य पूर्ण करण्यात आले. या कामासाठी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विमान वाहतूक बंद ठेवली जात होती. या वेळेतील सर्व विमानांकरिता रात्रीचे वेळापत्रक तयार करण्यात आले होते.
  • रात्रीच्या विमान वाहतु‌कीकरिता धावपट्टी सज्ज ठेवली जात होती. कालिकत येथे रोज ७० ते ८० विमानांचे आगमन प्रस्थान होते. त्यांपैकी केवळ १० विमाने दिवसाची आहेत.

 

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय