शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

..मग दलबदलू नेत्यांकरिता शिक्षेचा कायदा का नाही, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. फिरदौस मिर्झा यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2022 13:00 IST

सामान्य व्यक्तीने फसवणूक केल्यानंतर त्याच्यावर तातडीने कारवाई केली जाते. मग दलबदलू नेत्यांकरिता शिक्षेचा कायदा का नाही, असे ॲड. मिर्झा म्हणाले.

नागपूर :राजकारणातील घोडेबाजार थांबविण्यासाठी दलबदलू नेत्यांना कडक शिक्षा होणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. फिरदौस मिर्झा यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

जनमंच या सामाजिक संस्थेच्या वतीने माजी न्यायमूर्ती अशोक देसाई यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त शंकरनगर येथील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहामध्ये 'राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकांमधील घोडेबाजार' विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे अध्यक्षस्थानी तर, जनमंचचे अध्यक्ष राजीव जगताप, उपाध्यक्ष मनोहर रडके व दादासाहेब झोडे व्यासपीठावर उपस्थित होते.

नेत्यांनी एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणे हा केवळ दिवाणी वा राजकीय मुद्दा नाही, हा फौजदारी गुन्हादेखील आहे. मतदार पक्षाचे धोरण पाहून उमेदवाराला निवडून देतात. त्यामुळे संबंधित उमेदवार वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष बदलतो तेव्हा, मतदारांची फसवणूक होते. परिणामी, अशा उमेदवाराला कारावासाची शिक्षा होणे गरजेचे आहे. त्याकरिता कायदा तयार केला गेला पाहिजे. संबंधित उमेदवाराला केवळ अपात्र ठरवून काहीही साध्य होणार नाही. सामान्य व्यक्तीने फसवणूक केल्यानंतर त्याच्यावर तातडीने कारवाई केली जाते. मग दलबदलू नेत्यांकरिता शिक्षेचा कायदा का नाही, असे ॲड. मिर्झा म्हणाले.

राज्यसभा व विधान परिषदेमध्ये लोकसभा व विधानसभेतील पक्षनिहाय संख्येच्या प्रमाणात त्या-त्या पक्षाचे प्रतिनिधी पाठविणे, हादेखील घोडेबाजार थांबविण्याचा प्रभावी उपाय होऊ शकतो. हा उपाय अंमलात आणण्याकरिता सर्वांनी एकजूट होऊन आवाज उचलणे आवश्यक आहे, असेही ॲड. मिर्झा यांनी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार वेंद्र गावंडे यांनीसुद्धा राजकारणातील घोडेबाजारावर प्रहार केला. मतदार पक्ष केंद्रित होण्याऐवजी व्यक्तीकेंद्रित झाले आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :SocialसामाजिकPoliticsराजकारणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ