शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

खरंच नागपूरला आशा भोसले, गुलजार येणार की गर्दीसाठीच खटाटोप?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 10:03 IST

गुलजार आणि आशा भोसले म्हटले की, ‘मेरा कुछ सामान...’, ‘कतरा कतरा मिलती है...’ अशी अनेक गाणी मनात तरळू लागतात. एक भावनांना शब्दरूप देणारा जादूगर तर दुसरी सुरेल स्वरांनी या शब्दांना पुन्हा भावना देणारी आशा.

ठळक मुद्देसाहित्य क्षेत्रालाही सवंग लोकप्रियतेची लागण आयोजकांनाच कल्पना नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुलजार आणि आशा भोसले म्हटले की, ‘मेरा कुछ सामान...’, ‘कतरा कतरा मिलती है...’ अशी अनेक गाणी मनात तरळू लागतात. एक भावनांना शब्दरूप देणारा जादूगर तर दुसरी सुरेल स्वरांनी या शब्दांना पुन्हा भावना देणारी आशा. एखाद्या कार्यक्रमासाठी हे दोघे येणार म्हटल्यावर ती तर रसिकांसाठी अविस्मरणीय पर्वणीच. अशा कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाहून तुम्ही मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी गेलात, पण हे दोघे आलेच नाहीत तर..? हाच प्रश्न आम्हालाही एका कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाहून पडला आहे. साहित्यिक अमृता प्रीतम यांच्यावरील होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी म्हणून आशाताई व गुलजार यांच्या नावाचा उल्लेख असल्याने आणि आयोजकांसह कुणालाच काही कल्पना नसल्याने हा प्रश्न उपस्थित झाला आहे.हिंदी आणि पंजाबी साहित्य जगताला एका वेगळ््या उंचीवर पोहोचविणाºया आणि स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वाधिक नावाजलेली लेखिका व कवयित्री म्हणून ज्यांचा उल्लेख होतो, त्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त अमृता प्रीतम यांच्या साहित्य कृतीवर आधारित हा कार्यक्रम येत्या ७ आॅक्टोबरला सायंकाळी ६ वाजता चिटणवीस सेंटर येथे होत आहे. आयोजकांमध्ये चिटणवीस सेंटरसह विदर्भ साहित्य संघ या साहित्य जगतातील नामवंत संस्थेचाही समावेश आहे. यात सहभागी म्हणून ज्यांच्या नावांचा उल्लेख आहे, त्यात पहिले नाव आशा भोसले यांचे व शेवटचे नाव संपूर्णसिंह कालरा म्हणजेच गुलजार यांचे आहे. साहजिकच या दोन नावांमुळे कुणाच्याही भुवया उंचावणारच. त्यामुळे याबाबत आयोजकांना विचारावे म्हणून विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाºयांना विचारणा केली. त्यांनाही याबाबत नीटसे माहिती नव्हते. ‘ते येणार नाहीत, कदाचित त्यांची गाणी आणि कविता सादर होणार असण्याची शक्यता आहे’ असे उडते उत्तर त्यांच्याकडून मिळाले. पण तसा स्पष्ट उल्लेख करता आला असता. मग ही कार्यक्रम पत्रिका कुणी तयार केली, संमती कुणी दिली आणि छापून आल्यानंतरही कुणाच्याच कसे लक्षात आले नाही, हा प्रश्न पडतो. चिटणवीस सेंटरशी याबाबत बोलणे होऊ शकले नाही. इतर सहभागी वक्त्यांना याबाबत विचारले असता त्यांनीही याविषयी काही कल्पना नसल्याचे सांगितले. इतर नावे लहान आहेत, असे म्हणण्याचे कारण नाही, पण वि.सा. संघ किंवा आयोजकांना तसे म्हणायचे आहे का, हे त्यांचे त्यांनीच समजून घ्यावे. सांस्कृतिक आणि विशेषत: साहित्यिक कार्यक्रमांसाठी प्रेक्षक येत नाहीत. पण गर्दी खेचण्यासाठी अशाप्रकारे नामवंत व्यक्तींच्या नावांचा उल्लेख करायचा आणि वेळेवर स्वत:च स्वत:ची फजिती करून घ्यायची, ही मानसिकता समजण्यापलीकडे आहे. कदाचित साहित्य जगतालाही सवंग लोकप्रियता मिळविण्याची लागण झाली आहे का, हा विचार शेवटी मनात येतोच.विदर्भ साहित्य संघाने यापूर्वीच हा कार्यक्रम आयोजित केला आहे. ही संकल्पना आवडल्याने चिटणवीस सेंटरतर्फे तो पुन्हा आयोजित केला जात आहे. आशा भोसले आणि गुलजार यांच्या नावांच्या उल्लेखाबाबत अधिक कल्पना नाही. कदाचित त्यांची गाणी आणि कविता सादर होतील. पण हा कार्यक्रम अतिशय चांगला आहे. श्रोत्यांनी नक्की उपस्थित राहावे.- मनोहर म्हैसाळकर, अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ

टॅग्स :Vidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघ