शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भाजपला विदर्भ राज्य बनविण्याची हीच खरी वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 22:13 IST

युती तुटल्यामुळे विदर्भ राज्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही वेळ साधून केंद्रातील भाजपा सरकारने संसदेत ठराव मांडून विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आली.

ठळक मुद्देविदर्भ राज्य आंदोलन समितीचे ‘विदर्भ मिशन २०२३’ : सहा महिने श्रुंखलाबद्ध आंदोलन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शिवसेनेची भाजप सोबत असलेली युती आता संपुष्टात आली असून हा पक्ष केंद्र सरकारमधील एनडीएच्या घटक दलामधून बाहेर पडला. शिवसेनेने कायम विदर्भ राज्य निर्मितीला विरोध केला आहे व त्यांच्या विरोधामुळे भाजपनेही विदर्भाच्या जनतेला दिलेले वचन मोडले. मात्र युती तुटल्यामुळे विदर्भ राज्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही वेळ साधून केंद्रातील भाजपा सरकारने संसदेत ठराव मांडून विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आली.समितीच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक शनिवारी आमदार निवास येथे पार पडली. बैठकीमध्ये पारित झालेल्या ठरावाबाबत अ‍ॅड. वामनराव चटप व राम नेवले यांनी पत्रकारांना माहिती दिली. भाजपसाठी विदर्भ राज्याचे आश्वासन पाळण्याची हीच खरी वेळ आहे, असे चटप म्हणाले. अशावेळी राज्यातील संभाव्य सरकारने विरोध केला तर राज्यात अराजक परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा त्यांनी दिला. बैठकीत इतरही ठराव मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिल माफी व तातडीची मदत देण्याची मागणी करण्याचा ठराव करण्यात आला. विदर्भात विजेचे दर निम्मे करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.विदर्भ राज्याच्या निर्मितीसह इतर मागण्यांसाठी येत्या २ डिसेंबरपासून १ मे पर्यंत शृंखलाबद्ध आंदोलन करण्यची घोषणा समितीने केली आहे. २ डिसेंबर रोजी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सेवाग्राम येथे सामूहिक उपोषण करून भाजपला सद्बुद्धी देण्यासाठी गांधीजींना साकडे घालणार आहे. त्यानंतर २४ डिसेंबरला जिल्हा व तालुकास्तरावर एक दिवसाचे आत्मक्लेश आंदोलन करण्यात येईल. १५ जानेवारीपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये मुख्य अभियंता महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. १५ ला अकोला, १७ ला अमरावती, २० जानेवारीला नागपूर, २२ जानेवारी चंद्रपूर व २४ जानेवारीला गोंदिया येथे आंदोलन होईल. १५ फेब्रुवारी २०२० ला विदर्भातील सर्व तालुक्यात रास्ता रोको आंदोलन आणि आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात १ मे रोजी विदर्भ बंदची घोषणा यावेळी करण्यात आली. या आंदोलनाला ‘विदर्भ मिशन २०२३’ असे नाव देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला प्रबिरकुमार चक्रवर्ती, रंजना मामर्डे, अरुण केदार, देविदास लांजेवार, राजेंद्र आगरकर, अनिल तिडके, दिलीप भोयर, निळकंठ यावलकर, गुलाबराव धांडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भBJPभाजपाShiv Senaशिवसेना