शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्मातूनच होते व्यक्तीची खरी ओळख

By admin | Updated: January 28, 2015 01:03 IST

कुठल्या धर्मात किंवा जातीत जन्म घेतला यातून व्यक्ती लहान किंवा मोठी ठरत नसते तर व्यक्तीचे कर्म आणि त्याच्या वागणुकीतूनच त्याची खरी ओळख पटते. भगवान गौतम बुद्ध

बेल्लनविला विहाराया : गौतम बुद्धांच्या विचारांवर गुंफले विचारपुष्पनागपूर : कुठल्या धर्मात किंवा जातीत जन्म घेतला यातून व्यक्ती लहान किंवा मोठी ठरत नसते तर व्यक्तीचे कर्म आणि त्याच्या वागणुकीतूनच त्याची खरी ओळख पटते. भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांमध्येदेखील हेच मानवतावादी मार्गदर्शन दिसून येते, असे मत श्रीलंका येथील श्री जयवर्देनेपुरा विद्यापीठाचे कुलपती प्रा. बेल्लनविला विमलरत्न राजमहा विहाराया यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित डॉ. नितीन राऊत आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेप्रसंगी ते बोलत होते. बुद्ध धम्मातील सामाजिक विचार व तत्त्वज्ञान या विषयावरील व्याख्यानाचे त्यांनी मंगळवारी पहिले पुष्प गुंफले.विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेच्या प्रसंगी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे हे प्रामुख्याने उपस्थित होते. गौतम बुद्ध यांनी मानवतेचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. आजच्या युगात त्यांच्या विचारांवर चालणे आवश्यक झाले आहे. गौतम बुद्ध यांना जाती-धर्मांमुळे मनुष्यांमध्ये करण्यात येणारा भेदभाव अमान्य होता. सर्व व्यक्ती समान आहेत हाच संदेश त्यांनी दिला. शिवाय समाजव्यवस्थेत महिलांचे स्थानदेखील पुरुषांच्या बरोबरीचे असल्याचे त्यांचे विचार सांगतात. कुटुंबात पती व पत्नी दोघांचाही दर्जा समान असून त्यांना समान आदर मिळाला पाहिजे अला स्त्री-पुरुष एकतेचा संदेश गौतम बुद्धांच्या शिकवणीतून येतो असे विहाराया यांनी प्रतिपादन केले. बुद्ध धम्माचे तत्त्वज्ञान स्वातंत्र्य आणि समानतेवर आधारीत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी याच मार्गावर चालून भारतातील कोट्यवधी नागरिकांना समान दर्जा मिळवून दिला. आज इतर धर्म व संप्रदायातील तसेच पाश्चिमात्य देशांतील व्यक्तींनादेखील बुद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाची रुची असून अनेक जण त्याचे धडे घेत आहेत असे विहाराया यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठातील अधिकारी, विभागांतील प्राध्यापक, कर्मचारी व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.(प्रतिनिधी)