शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सीमेवरील सैनिक, अंतराळवीरांसाठी आता रेडी टू इट ‘बिर्याणी’, ‘हलवा’ अन् ‘एनर्जी बार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2023 08:00 IST

Nagpur News 108 th Indian science Congress अंतराळात जाणारे ॲस्ट्रोनॉट्स यांनादेखील घरी बनणारे काही विशिष्ट पदार्थ खायची इच्छा असते. मात्र, ते शक्य होत नाही. त्यांचा विचार करून ‘डीआरडीओ’ने ‘रेडी टू इट’ पदार्थच विकसित केले आहेत.

ठळक मुद्दे‘डिफेन्स’ तंत्रज्ञान बनविणाऱ्या ‘डीआरडीओ’ची कमाल

योगेश पांडे

नागपूर : ‘डीआरडीओ’ची ओळख ही ‘डिफेन्स’ क्षेत्रातील तंत्रज्ञान बनविणारी संस्था अशीच असली तरी तेथील वैज्ञानिकांनी एक अनोखा प्रयोग राबवून तो प्रत्यक्षात आणला आहे. सीमेवरील सैनिक, अंतराळात जाणारे ॲस्ट्रोनॉट्स यांनादेखील घरी बनणारे काही विशिष्ट पदार्थ खायची इच्छा असते. मात्र, ते शक्य होत नाही. त्यांचा विचार करून ‘डीआरडीओ’ने ‘रेडी टू इट’ पदार्थच विकसित केले आहेत. यात अगदी ‘व्हेज बिर्याणी’, ‘हलवा’ अन ‘एनर्जी बार’ यांचादेखील समावेश आहे.

१०८ व्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’मध्ये ‘डीआरडीओ’च्या ‘डिफेन्स फूड रिसर्च लेबॉरेटरी’कडून त्यांच्या प्रयोग व उपकरणांची विशेष प्रदर्शनी लावण्यात आली आहे. त्यात ‘रेडी टू इट’ पदार्थदेखील ठेवण्यात आले आहेत. सैन्यातील अनेक जवानांना दुर्गम भागात अनेक दिवस काढावे लागतात. शिवाय ‘ऑपरेशन्स’साठी गेल्यावर बरेच दिवस मिळेल ते खाऊन काढावे लागतात. त्यांची अडचण लक्षात घेता ‘डीआरडीओ’तर्फे अतिशय कमी वजनाचे ‘रेडी टू इट’ पदार्थ विकसित करण्यात आले आहेत. वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत हे पदार्थ विकसित केले आहे. पदार्थांना नैसर्गिक चव मिळेल व त्यातून सैनिकांना आवश्यक ती अन्नपदार्थांची तत्वे मिळतील याचीदेखील खबरदारी बाळगण्यात आली आहे. ‘डीआरडीओ’तर्फे त्याला ‘एमआरई रेशन’ (मिल्स रेडी टू इट) असे नाव देण्यात आले आहे. हे पदार्थ एका वर्षापर्यंतदेखील टिकू शकतात, अशी माहिती ‘डीआरडीओ’च्या वैज्ञानिकांनी दिली.

 

‘आर्मी’सोबतच ‘नेव्ही’साठीदेखील फायदेशीर

संबंधित पदार्थ हे केवळ ‘आर्मी’तील जवानच नव्हे तर नौदलातील जवानांसाठीदेखील अतिशय फायदेशीर आहे. या जवानांना युद्धवाहू नौकेवर सर्व रेशन नेण्याऐवजी हे ‘पॅकेट्स’देखील नेता येतील व त्यामुळे जहाजावरील वजन निश्चित कमी होऊ शकेल.

‘रोटॉर्ट’ तंत्रज्ञानाचा उपयोग

हे पदार्थ बनविताना वैज्ञानिक प्रक्रियेचा उपयोग करण्यात आला आहे. यात थर्मल प्रोसेसिंग करण्यात येते व अन्नपदार्थांतील सर्व द्रव्य शोषून घेण्यात येते. यासाठी पदार्थ्यांवर ११४ ते ११८ अंश सेल्सिअस तापमानावर प्रक्रिया करण्यात येते. ज्या ‘एन्झाईम्स’मुळे अन्नपदार्थ खराब होऊ शकतात, त्यांना या प्रक्रियेत संपविण्यात येते. याला ‘रेटॉर्ट’ तंत्रज्ञान असे म्हणतात. ‘डीआरडीओ’ने या तंत्रज्ञानाचा उपयोग करत ‘बिर्याणी’, ‘हलवा’, ‘एनर्जी बार’, ‘आम बार’, ‘वरण भात’, ‘पायनॅपल ज्यूस पावडर’, ‘न्युट्री फूड बार’, ‘व्हेज पुलाव’, ‘दाल खिचडी’ इत्यादी पदार्थ तयार केले आहेत.

अंतराळात दोन मिनिटांत पदार्थ तयार

अंतराळात पाण्याचा उपयोग करताना अनेकदा अडचणी येतात. ‘स्पेस फूड’मधील पदार्थ पॅकेटसह एका विशिष्ट प्रकारच्या वॉर्मरमध्ये टाकावे लागतात. दोन मिनिटांत ते पदार्थ खाण्यायोग्य होतात.

प्रदेशांनुसार पदार्थांची निर्मिती

‘डीआरडीओ’ने सैन्यदलासाठी त्यांच्या तैनातीचे प्रदेश लक्षात घेऊन ‘एमआरई रेशन’ची निर्मिती केली आहे. वाळवंट, बर्फाळ प्रदेश, नौदल, कमांडो असे विविध गटांनुसार पदार्थ तयार करण्यात आले आहेत. ‘एमआरई’च्या एका बॉक्समधून एका सैनिकाचे एका दिवसाचे जेवण होऊ शकते.

टॅग्स :scienceविज्ञान