शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

वेगळ्या विदर्भासाठी स्वतंत्र आघाडी करण्यास तयार; आशिष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 10:22 IST

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आणि शेतकरी हितासाठी आमदारकीचा राजीनामा देईल, असा खणखणीत इशारा काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख यांनी दिला.

ठळक मुद्देस्वामीनाथन आयोगाची पुनश्च मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेगळे विदर्भ राज्य झाल्याशिवाय विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या सुटू शकणार नाहीत. तेलंगणाच्या धर्तीवर विदर्भातील शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज उपलब्ध करून द्यावी. शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू करावा, असे सूतोवाच करीत स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आणि शेतकरी हितासाठी आमदारकीचा राजीनामा देईल, असा खणखणीत इशारा काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख यांनी दिला. सोबतच वेगळ्या विदर्भाच्या नावाने स्वतंत्र आघाडी करण्यास तयार असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार, असेही त्यांनी सांगितले.काटोलच्या नगर भवन येथे बुधवारी (दि. ३) आयोजित स्नेहमीलन कार्यक्रमात ते बोलत होते. विदर्भ राज्याची निर्मिती ही काळाची गरज असून विदर्भ राज्य झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे सांगत आ. देशमुख म्हणाले, विदर्भात तयार झालेल्या विजेने मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्टत झगमगाट होतो. परंतु त्याच विदर्भातील शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळत नाही, हा कुठला न्याय आहे. काही वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या तेलंगण शासनाने सर्व शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज देण्याची घोषणा केली. त्यामुळे तेथील शेतकरी सुजलाम सुफलाम होईल, बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे.त्याविरुद्ध आपल्या विदर्भात स्थिती आहे. मुबलक उद्योगधंदे नसल्याने कित्येक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. विदर्भातील युवक गुन्हेगारीकडे वळत आहे. हे चित्र बदलण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य होणे गरजेचे आहे, असे मत आ. देशमुख यांनी याप्रसंगी व्यक्त केले.शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू करावा, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पुरुषोत्तम धोटे, पंचायत समिती सभापती संदीप सरोदे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव बन्सोड, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख, डॉ. प्रेरणा बारोकर, उपसभापती योगेश चाफले, पीरिपाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद ढोके, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत मानकर, राष्टवादीचे अंगद भैस्वार, दिनकर राऊत, विदर्भ माझा पक्षाचे समीर उमप, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप ठाकरे, शहराध्यक्ष मारोतराव बोरकर, राजू सरोदे, नगरसेवक संदीप वंजारी, दिनेश निंबाळकर, सोपान हजारे आदी उपस्थित होते.प्रास्ताविक संदीप सरोदे यांनी केले. संचालन विजय महाजन यांनी केले. दिलीप तिजारे यांनी आभार मानले.

- तर मी बंडखोर!भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात विदर्भ राज्य वेगळे करू असे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुकीत भाजपला यश मिळून केंद्र आणि राज्यात सत्ता प्राप्त करूनही स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत काहीच हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. निवडणूक काळात मतदारांना मीसुद्धा काही आश्वासने दिली होती. त्याची पूर्तता करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून विदर्भ राज्याची निर्मिती, शेतमालाला योग्य भाव आदी मुद्दे उपस्थित केले. या मुद्यांमुळे मी बंडखोर ठरत असेल तर तेसुद्धा मला मान्य आहे. मात्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे आ. देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुख