शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी सज्ज राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 23:21 IST

नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या तोतलाडोह प्रकल्पात जेमतेम २१ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच तारखेला ३२ टक्के जलसाठा होता. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे वेकोलीला देण्यात येणारे १० एमएलडी पाणी थांबविण्यात यावे. संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी आताच नियोजन करून सज्ज राहण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीत गडकरी यांनी मंगळवारी दिले. महापालिका मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देनितीन गडकरी यांचे निर्देश : वेकोलीला देण्यात येणारे पाणी थांबवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या तोतलाडोह प्रकल्पात जेमतेम २१ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच तारखेला ३२ टक्के जलसाठा होता. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे वेकोलीला देण्यात येणारे १० एमएलडी पाणी थांबविण्यात यावे. संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी आताच नियोजन करून सज्ज राहण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीत गडकरी यांनी मंगळवारी दिले. महापालिका मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीत जिलाधिकारी अश्विन मुदगल यांनी कन्हान नदीत पावसाळ्यात पाणी अडविण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावर तातडीने कार्यवाही करा, विचार करण्यासाठी वेळ शिल्लक नसल्याचे गडकरी यांनी सांगितले. पावसाळ्यात नदीपात्रात पाणी अडविले तर ४० ते ५० द.ल.घ.मी. पाण्याचा साठा उपलब्ध होणार आहे.अमृत योजनेवर २७३.४८ कोटींचा खर्चकेंद्र सरकारच्या अमृत योजनेच्या माध्यमातून नागपूर शहरालगतच नेटवर्क नसलेल्या भागात पाणीपुरवठा योजना राबविली जाणार आहे. २७३.४८ कोटींची ही योजना असून यात केंद्र सरकारचा ३३.३३ टक्के म्हणजेच ९१.२६ कोटी, राज्य सरकार १६.६७ टक्के म्हणजेच ४५.६४ कोटी तर महापालिक ेचा वाटा ५० टक्के वाटा राहणार असून १३६ कोटी खर्च करावे लागतील. या कामाचे १ आॅगस्टला कार्यादेश देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रमहापालिकेच्या सर्व दहा झोनमध्ये १६० ठिकाणी विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार आहे. येथे उद्यान, खेळण्याची साधने, वृक्षारोपण व मनोरंजनाची साधने राहणार आहेत. यासाठी जागा उपलब्ध नसल्यास महापालिकेच्या शाळांचा वापर केला जाणार आहे. २०१५-१६ या वर्षात १६ केंद्र उभारण्यात आली. २०१६-१७ या वर्षात ८९ तर २०१७-१८ या वर्षात ३५ केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यावर ४.४३ कोटींचा खर्च केला जाणार आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीwater shortageपाणीटंचाई