शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

संविधान वाचन बाबासाहेबांचे अभिवादन करण्यासाठीच : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 22:46 IST

ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले, त्यांचे अभिवादन करणे गरजेचे आहे. त्याची आठवण सर्व लोकप्रतिनिधींनी करावी, यासाठीच पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संविधानाचे वाचन विधानसभेत केले, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले, त्यांचे अभिवादन करणे गरजेचे आहे. त्याची आठवण सर्व लोकप्रतिनिधींनी करावी, यासाठीच पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संविधानाचे वाचन विधानसभेत केले, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.विधानभवनातील सदस्यांच्या फोटोसेशननंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आमच्यासारखा शेतकऱ्यांचा मुलगा त्यांच्यामुळेच विधानसभेत आला. सर्वसामान्य परिवारातून येऊनही जनता जनार्दनाची सेवा करण्याची संधी संविधानामुळे मिळाली. त्यामुळे संविधानाचे वाचन पहिल्याच अधिवेशनात पहिल्याच दिवशी करण्याचा नवा पायंडा घातला. जनतेसाठी काम करण्याची प्रेरणा लोकशाहीतून दिली, त्याची आठवण आणि स्मरण करता यावे यासाठी हे वाचन केले.तीन पक्षांचे सरकार असलेली विधानसभा चालविताना विरोधकही प्रचंड आक्रमक आहेत. पहिले दोन दिवस कामकाज होऊ दिले नाही. अध्यक्ष म्हणून काम करताना कसब पणाला लागले का, यावर ते म्हणाले, नवीन सरकार आल्यावर सुरुवातीला त्रास होतच असतोच. त्याप्रमाणे झाला. आता सर्व व्यवस्थित सुरू असून कामकाजही शांतपणे चालले आहे. प्रश्नोत्तरे व चर्चाही नीटपणे सुरू आहे. सर्वांचेच सहकार्य आपणास मिळत आहे.फोटोसेशन गैरहजेरी, चुकीचा अर्थ काढू नयेविधानसभा अध्यक्ष या नात्याने शुक्रवारी सकाळी फोटोसेशनसाठी नाना पटोले यांनी सर्वांना निमंत्रित केले होते. मात्र विरोधी पक्षातील अनेक ज्येष्ठ सदस्य, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अनुपस्थित होते. ते व्यक्तिगत कामाने गैरहजर असल्याने त्यांच्या नसण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये, असे आवाहन नाना पटोले यांनी केले. ते म्हणाले, सर्वच पक्षांतील वरिष्ठ नेते, आमदार उपस्थित होते. फोटोसेशनचे डिक्लेरेशन विधानसभेत केले होते. संदेशही विधिमंडळाच्या यंत्रणेमार्फत पाठविला होता. मात्र कुणी वैयक्तिक कामाने गैरहजर असतील तर चुकीचा अर्थ लावला जाऊ नये. माझ्यासाठी सत्तापक्ष आणि विपक्ष दोघेही सारखेच आहेत. त्यामुळे आपण त्या राजकारणात पडू इच्छित नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर