शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

भारताच्या विकासयात्रेत रतन टाटांचे मौलिक योगदान

By योगेश पांडे | Updated: October 10, 2024 15:50 IST

Nagpur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे श्रद्धांजली

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शोक व्यक्त करण्यात आला आहे. भारताच्या विकासयात्रेत रतन टाटा यांचे मौलिक योगदान असल्याची भावना सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी व्यक्त केली.

रतन टाटा यांच्या निधनाने सर्व भारतीयांना वेदना झाल्या आहेत. देशाने त्यांच्या स्वरुपात एक मौलिक रत्न गमावले आहे. उद्योगांच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात त्यांनी अनेक प्रभावी पुढाकार घेतले व सर्वश्रेष्ठ मापदंड प्रस्थापित केले. समाजाच्या हितासाठीदेखील ते कार्यरत होते व ते स्वत: अनेक उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे. राष्ट्राची एकता, देशाची सुरक्षा, विकासाचे मुद्दे, कर्मचाऱ्यांचे हित यासाठी रतन टाटा हे त्यांचा वेगळा विचार व कार्याने प्रेरणादायी राहिले. यशाची अनेक शिखरे गाठल्यानंतरदेखील त्यांच्या वर्तणूकीत सहजभाव, विनम्रता व आत्मियता असायची व त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हा पैलू अनुकरणीय आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असे प्रतिपादन डॉ.भागवत व होसबळे यांनी केले.

संघाशी आत्मियतेचे संबंधरतन टाटा यांचे संघाशी आत्मियतेचे संबंध होते. त्यांनी नागपुरात येऊन संघ मुख्यालयाला दोनदा भेटदेखील दिली होती. २८ डिसेंबर २०१६ रोजी अचानक नागपुरात येत त्यांनी संघकार्य जाणून घेतले होते. तर एप्रिल २०१९ मध्ये त्यांनी परत संघ मुख्यालयात भेट देत सरसंघचालकांशी चर्चा केली होती. ती त्यांची अखेरची नागपूर भेट ठरली होती.

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाMohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर