शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भारताच्या विकासयात्रेत रतन टाटांचे मौलिक योगदान

By योगेश पांडे | Updated: October 10, 2024 15:50 IST

Nagpur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे श्रद्धांजली

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शोक व्यक्त करण्यात आला आहे. भारताच्या विकासयात्रेत रतन टाटा यांचे मौलिक योगदान असल्याची भावना सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी व्यक्त केली.

रतन टाटा यांच्या निधनाने सर्व भारतीयांना वेदना झाल्या आहेत. देशाने त्यांच्या स्वरुपात एक मौलिक रत्न गमावले आहे. उद्योगांच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात त्यांनी अनेक प्रभावी पुढाकार घेतले व सर्वश्रेष्ठ मापदंड प्रस्थापित केले. समाजाच्या हितासाठीदेखील ते कार्यरत होते व ते स्वत: अनेक उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे. राष्ट्राची एकता, देशाची सुरक्षा, विकासाचे मुद्दे, कर्मचाऱ्यांचे हित यासाठी रतन टाटा हे त्यांचा वेगळा विचार व कार्याने प्रेरणादायी राहिले. यशाची अनेक शिखरे गाठल्यानंतरदेखील त्यांच्या वर्तणूकीत सहजभाव, विनम्रता व आत्मियता असायची व त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हा पैलू अनुकरणीय आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असे प्रतिपादन डॉ.भागवत व होसबळे यांनी केले.

संघाशी आत्मियतेचे संबंधरतन टाटा यांचे संघाशी आत्मियतेचे संबंध होते. त्यांनी नागपुरात येऊन संघ मुख्यालयाला दोनदा भेटदेखील दिली होती. २८ डिसेंबर २०१६ रोजी अचानक नागपुरात येत त्यांनी संघकार्य जाणून घेतले होते. तर एप्रिल २०१९ मध्ये त्यांनी परत संघ मुख्यालयात भेट देत सरसंघचालकांशी चर्चा केली होती. ती त्यांची अखेरची नागपूर भेट ठरली होती.

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाMohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर